शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडला : उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:11 IST

नामदेव पाटील ।पांगिरे : सुरुवातीपासून बहुचर्चित असलेला आणि भुदरगड व कागल या दोन तालुक्यांना वरदायी ठरणारा दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडलेला असून, उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकºयांतून होत आहे.महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळांतर्गत चिकोत्रा खोºयात लघु पाटबंधारे प्रकल्पास मंजुरी मिळाली. पिंपळगाव व दिंडेवाडी चिकोत्रा खोºयात २.१८ टीएमसी पाणीसाठा ...

ठळक मुद्दे४५ टक्के काम पूर्ण राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा

नामदेव पाटील ।पांगिरे : सुरुवातीपासून बहुचर्चित असलेला आणि भुदरगड व कागल या दोन तालुक्यांना वरदायी ठरणारा दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडलेला असून, उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकºयांतून होत आहे.महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळांतर्गत चिकोत्रा खोºयात लघु पाटबंधारे प्रकल्पास मंजुरी मिळाली. पिंपळगाव व दिंडेवाडी चिकोत्रा खोºयात २.१८ टीएमसी पाणीसाठा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार झुलपेवाडी (ता. आजरा) येथे १.८६ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आले असून, उर्वरित ०.३२ टीएमसी पाणीसाठा दिंडेवाडी-बारवे प्रकल्पात साठवण्याचे ठरले. या प्रकल्पास ३१ जानेवारी २००० रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. सुरुवातीस प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी या प्रकल्पास विरोध केला होता. मात्र, तत्कालीन जिल्हाधिकारी राजगोपाल देवरा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना जमीन उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे गाजर दाखविण्यात आले. देवरा यांच्या आश्वासनानंतर काम सुरू करण्यात आले. सन २००७-०८ या हंगामात ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, तेव्हापासून आजपर्यंत काम बंद आहे.

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व अन्य इतर मागण्या पूर्ण न झाल्यामुळे काम बंद असून आधी पुनर्वसन, मगच धरण अशी भूमिका प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी घेतली आहे. त्यामुळे गेली दहा वर्षे हा प्रकल्प रखडलेला आहे. बुडीत क्षेत्र ८०.११ हेक्टर असून उपसा सिंचनाद्वारे भुदरगड तालुक्यातील दिंडेवाडी, बारवे, हेळेवाडी, नागनवाडी, पांगिरे तसेच कागल तालुक्यातील मांगनूर, हसूर बु., हसूर खु. या गावांतील ७५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून प्रकल्पग्रस्त शेतकºयांना बारवे, दिंडेवाडी, मांगनूर, हसूर बु., हसूर खु., नंद्याळ, अर्जुनवाडा, मेतके, खडकेवाडा, आलाबाद या लाभक्षेत्रातील जमीन उपलब्ध करून देण्याचे आहे. मात्र, कागल तालुक्यातील काही गावांनी जमीन देण्यास नकार देत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यामुळे पुनर्वसनाचे काम रेंगाळले.

चिकोत्रा खोºयात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून अपुरा पाऊस, कमकुवत जलस्रोत यामुळे झुलपेवाडी धरणाचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे दिंडेवाडी, बारवे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे ही काळाची गरज आहे. मात्र, यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे. 

भुदरगड तालुक्यातील पूर्वेकडील भागाचा पाण्याअभावी विकास खुंटला असून, तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हा प्रकल्प पूर्ण ह़ोेण्यास आपण सकारात्मक आहे. या प्रकल्पामुळे भुदरगड व कागल तालुक्यांतील काही गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघणार असून, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे.- प्रकाश आबिटकर, आमदार