शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडला : उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:11 IST

नामदेव पाटील ।पांगिरे : सुरुवातीपासून बहुचर्चित असलेला आणि भुदरगड व कागल या दोन तालुक्यांना वरदायी ठरणारा दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडलेला असून, उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकºयांतून होत आहे.महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळांतर्गत चिकोत्रा खोºयात लघु पाटबंधारे प्रकल्पास मंजुरी मिळाली. पिंपळगाव व दिंडेवाडी चिकोत्रा खोºयात २.१८ टीएमसी पाणीसाठा ...

ठळक मुद्दे४५ टक्के काम पूर्ण राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा

नामदेव पाटील ।पांगिरे : सुरुवातीपासून बहुचर्चित असलेला आणि भुदरगड व कागल या दोन तालुक्यांना वरदायी ठरणारा दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पुनर्वसनाअभावी रखडलेला असून, उर्वरित कामास कधी मुहूर्त मिळणार? असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकºयांतून होत आहे.महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळांतर्गत चिकोत्रा खोºयात लघु पाटबंधारे प्रकल्पास मंजुरी मिळाली. पिंपळगाव व दिंडेवाडी चिकोत्रा खोºयात २.१८ टीएमसी पाणीसाठा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार झुलपेवाडी (ता. आजरा) येथे १.८६ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आले असून, उर्वरित ०.३२ टीएमसी पाणीसाठा दिंडेवाडी-बारवे प्रकल्पात साठवण्याचे ठरले. या प्रकल्पास ३१ जानेवारी २००० रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. सुरुवातीस प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी या प्रकल्पास विरोध केला होता. मात्र, तत्कालीन जिल्हाधिकारी राजगोपाल देवरा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना जमीन उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे गाजर दाखविण्यात आले. देवरा यांच्या आश्वासनानंतर काम सुरू करण्यात आले. सन २००७-०८ या हंगामात ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, तेव्हापासून आजपर्यंत काम बंद आहे.

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व अन्य इतर मागण्या पूर्ण न झाल्यामुळे काम बंद असून आधी पुनर्वसन, मगच धरण अशी भूमिका प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी घेतली आहे. त्यामुळे गेली दहा वर्षे हा प्रकल्प रखडलेला आहे. बुडीत क्षेत्र ८०.११ हेक्टर असून उपसा सिंचनाद्वारे भुदरगड तालुक्यातील दिंडेवाडी, बारवे, हेळेवाडी, नागनवाडी, पांगिरे तसेच कागल तालुक्यातील मांगनूर, हसूर बु., हसूर खु. या गावांतील ७५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून प्रकल्पग्रस्त शेतकºयांना बारवे, दिंडेवाडी, मांगनूर, हसूर बु., हसूर खु., नंद्याळ, अर्जुनवाडा, मेतके, खडकेवाडा, आलाबाद या लाभक्षेत्रातील जमीन उपलब्ध करून देण्याचे आहे. मात्र, कागल तालुक्यातील काही गावांनी जमीन देण्यास नकार देत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यामुळे पुनर्वसनाचे काम रेंगाळले.

चिकोत्रा खोºयात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून अपुरा पाऊस, कमकुवत जलस्रोत यामुळे झुलपेवाडी धरणाचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे दिंडेवाडी, बारवे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे ही काळाची गरज आहे. मात्र, यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे. 

भुदरगड तालुक्यातील पूर्वेकडील भागाचा पाण्याअभावी विकास खुंटला असून, तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हा प्रकल्प पूर्ण ह़ोेण्यास आपण सकारात्मक आहे. या प्रकल्पामुळे भुदरगड व कागल तालुक्यांतील काही गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघणार असून, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे.- प्रकाश आबिटकर, आमदार