शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

ही दोस्ती तुटायची नाय! ज्या चौकात धार्मिक दंगल; तिथे हिंदू-मुस्लीम ऐक्य, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 18:08 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये दंगलीच्या घटना घडत आहेत.

कोल्हापूर - छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत सर्वधर्म समभाव या विचारांवर चालणाऱ्या लोकांची कमी नाही. त्यातीलच दोन मित्र, दिलीप चौगुले आणि गनी तांबोळी, या दोघांचा धर्म वेगळा परंतु मैत्री धर्माहून अधिक मजबूत आहे. मागील २३ वर्षापासून कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पान शॉप चालवतात. कधीही त्यांचा धर्म व्यवसायाच्या आड आला नाही. कोल्हापूरात जिथं धार्मिक हिंसा घडली, दगडफेक झाली त्याच भागात हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले दोघे मित्र पानाचे दुकान चालवतात. 

दिलीप चौगुले आणि गनी तांबोळी हे ३५ वर्षापासून मित्र आहेत. प्रत्येक सुखदुखात एकमेकांसोबत ताकदीने उभे राहतात. सुरुवातीला गनी तांबोळी पान विकत होता तर दिलीप चौगुले याचे पानाचे दुकान होते. या व्यवसायातून दोघेही एकमेकांना चांगले ओळखू लागले. हळूहळू या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मामू पानाचे दुकान सुरू करत व्यवसायात भागीदारी केली. मागील २३ वर्षापासून ते या व्यवसायात आहेत. दोघेही प्रामाणिकपणे काम करतात. कायम एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जातात. 

दोन्ही कुटुंबांमध्ये जात-धर्म कधीच येत नाहीते दोघे एकमेकांची चेष्टा करतात आणि आनंद वाटून घेतात. दोघांचे कुटुंबही त्यांच्याशी जोडले गेले आहे. जवळच्या नात्यापेक्षाही मोलाचे नाते त्यांनी बांधले आहे. चौगुले आणि तांबोळी कुटुंबातील सदस्य एकाच कुटुंबातील असल्यासारखे राहतात. दोन कुटुंबांमध्ये जात-धर्म कधीच येत नाही. 'रमजान' असो की 'दिवाळी', दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होऊन सण साजरे करतात. एकाच्या कपाळावर कुंकू आणि दुसऱ्याच्या डोक्यावर गोलाकार पांढरी टोपी हा त्यांचा रोजचा पेहराव.

दंगल झालेल्या भागात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अवघ्या काही अंतरावर चौगुले आणि तांबोळी काका गेल्या २३ वर्षांपासून जात-धर्म बाजूला ठेवून पान दुकान चालवत आहेत. दुकानात पान खायला येणारा प्रत्येक ग्राहक त्यांच्या समन्वयाचे कौतुक करतो. कोल्हापुरात पर्यटनासाठी येणारे अनेक पर्यटक कुतुहलाने चौगुले, तांबोळी चाचा यांचे फोटो काढतात.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये दंगलीच्या घटना घडत आहेत. ज्या कोल्हापुरात अनेक दशके पुरोगामी विचारांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात त्या कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम दंगलीमुळे या विचाराला तडा गेला आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पण दुसरीकडे चौगुले, तांबोळी यांच्यासारख्या कट्टर मित्रांची मैत्री पाहता पुरोगामी विचारसरणीला अजून तडा गेलेला नाही, असे नक्कीच म्हणता येईल. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर