शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

तंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना समाजशास्त्राची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST

अकरावी प्रवेश परीक्षा सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांसमोर पेच अनिल पाटील, मुरगूड : राज्यातील सुमारे ६५ हजार विद्यार्थी यावर्षी दहावीमध्ये ...

अकरावी प्रवेश परीक्षा

सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांसमोर पेच

अनिल पाटील,

मुरगूड : राज्यातील सुमारे ६५ हजार विद्यार्थी यावर्षी दहावीमध्ये तंत्र विषय घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. यातील सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी नववी व दहावीमध्ये समाजशास्त्र या विषयाऐवजी तंत्र (टेक्निकल) विषय निवडला आहे. अकरावी प्रवेश परीक्षेमध्ये मात्र शिक्षण विभागाने समाजशास्त्र विषय सक्तीचा केला आहे. त्यामुळे या प्रवेश परीक्षेत दोन वर्षे समाजशास्त्रपासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. यावर शिक्षण विभागाने तत्काळ तोडगा काढला नाही तर या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेत २५ गुणांचा फटका बसणार आहे.

विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे यासाठी राज्यातील शेकडो माध्यमिक शाळेत तंत्र विषय आणि त्यासाठी स्वतंत्र शिक्षक, वर्कशॉपची निर्मिती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दहावीच्या बोर्ड परीक्षेत या विषयाला विशेष महत्त्व नव्हते. पण दोन वर्षांपासून या विषयाचे गुण विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणांच्या सरासरीत धरण्याचा निर्णय घेतल्याने या विभागाकडे ओढा वाढला आहे. आयटीआय आणि अभियांत्रिकीसाठी तंत्र विषय महत्त्वाचा ठरत आहे.

शिक्षण विभागाने जर विद्यार्थी तंत्र विषय घेणार असतील तर त्यांना त्या विषयाऐवजी हिंदी किंवा समाजशास्त्र या दोनपैकी एक विषय वगळण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार यावर्षी सुमारे ६५ हजार विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार विद्यार्थ्यांनी समाजशास्त्र विषय वगळला आहे. त्यामुळे नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात समाजशास्त्र या विषयाचा त्यांना गंधही नाही.

दरम्यान, यावर्षी अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने प्रवेश परीक्षेचे नियोजन केले आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी सर्व विषय आणि अभ्यासक्रम जाहीर केला आहे. यामध्ये सर्वांनाच इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. यातील सर्व प्रश्न हे दहावीच्या अभ्यासक्रमाशी निगडित असणार आहेत.

त्यामुळे समाजशास्त्र विषयाऐवजी तंत्र विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांची चांगलीच गोची झाली आहे. याबाबत शासनाने तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चौकट

विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये

या समस्येबाबत आम्ही तंत्र विभागाच्यावतीने शिक्षक आमदार तसेच शिक्षण विभाग यांच्याशी संपर्क साधला आहे. याचा अगोदर विचार व्हायला पाहिजे होता; पण तरीही तंत्र विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. शिक्षण विभाग सकारात्मक तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.

सुभाष कलागते, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अशासकीय तांत्रिक महासंघ

आमच्यावर अन्याय होऊ नये

व्यावसायिक शिक्षणामध्ये करिअर करायचे म्हणून आम्ही नववीपासून तंत्र विषय निवडला. त्यामुळे हिंदी हा विषय ठेवून समाजशास्त्र अभ्यासक्रमातून वगळला. आता सीईटीच्या परीक्षेत समाजशास्त्र या विषयावर पंचवीस गुणांवर पंचवीस प्रश्न विचारणार आहेत. आम्हाला यातील काहीच माहिती नाही, मग आमचे गुण कमी झालेस आम्हाला प्रवेश मिळण्यास अडचणी येतील. त्यामुळे भीती वाटत आहे.

साक्षी विजय सापळे, विद्यार्थिनी, मुरगूड विद्यालय, मुरगूड

तंत्र विद्यार्थ्यांनी गडबड करू नये

या समस्येबाबत तंत्र विभाग सातत्याने शिक्षण विभागाच्या संपर्कात आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. cet प्रवेश फॉर्म भरण्याची मुदत अजून आहे. लगेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यासाठी गडबड करू नये.

श्री. पी. बी. लोकरे, अधिव्याख्याता, मुरगूड विद्यालय तंत्र विभाग