शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: 'कुणबी'चा दाखला, हेलपाटे मारुन थकला; १९६७ पूर्वीचा पुरावा शोधताना दमछाक

By भीमगोंड देसाई | Updated: September 7, 2023 13:28 IST

सर्वसामान्य, गरीब कुणबींना लालफितीचे कवच भेदणे शक्य होत नसल्याने ते दाखला काढण्याचा नादच सोडून देत आहेत

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : मराठा समाजातील कुणबी असलेल्यांना जातीचा दाखला काढताना लालफितीचे कवच भेदावे लागत आहे. केवळ शासकीय शुल्कावरच दाखला काढताना महसूलमधील यंत्रणेकडून अडवणूक होते. दाखल्यासाठी सर्वांत महत्त्वाचा कागद समजला जाणारा सन १९६७ पूर्वीचा पुरावा शोधताना त्याची प्रचंड दमछाक होते. परिणामी सर्वसामान्य, गरीब कुणबींना लालफितीचे कवच भेदणे शक्य होत नसल्याने ते दाखला काढण्याचा नादच सोडून देत आहेत.कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याआधी जन्म झालेल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइक (वडील / चुलते / आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा आदी) यापैकी कुठल्याही एका नातेवाइकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे बंधनकारक आहे. अर्जदार किंवा नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यात कुणबी नोंद असणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्म मृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर १४ मध्ये ठेवली जात होती. ही आवश्यक कागदपत्रे मिळवणे प्रचंड किचकट आणि वेळकाढूपणाचे आहे. यासाठी तलाठी, सर्कल, तहसील कार्यालय, ग्रामपंचायतींमध्ये हेलपाटे मारून संबंधिताच्या चप्पल तुटतात.महसुली पुराव्यासाठी कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी (सह ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, सातबारा उतारे, आठ अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अंमलात येण्याआधी असणारे क. ड. ई. पत्र, खासरा आणि हक्क पत्रक किंवा इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख असावा. नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकांची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा पुराव्यासाठी चालतो. रक्त संबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाजकल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हेसुद्धा जातीचा पुरावा म्हणून ग्राह्य मानला जातो. (पूर्वाध)

गृह चौकशी अहवाल चालतो, पण तो टाळला जातोजातीचा उल्लेख असणारा सक्षम पुरावा उपलब्ध न झाल्याने अर्जदाराचा अर्ज फेटाळला जातो. म्हणून एखाद्या अर्जदाराचा जातीविषयी पुरावा उपलब्ध होत नसेल तर सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत संबंधित अर्जदाराच्या कुटुंबाची सखोल गृहचौकशी करून त्याच्या जातीच्या दाव्याची खातरजमा करावी, असा शासन निर्णय २००४ मध्ये करण्यात आला आहे.यानुसार तहसीलदार, सर्कलतर्फे अर्जदाराचे कुटुंब, शाळा, कागदोपत्री, जमीनविषयक बाबी, जातीविषयक चालीरिती, प्रथा, परंपरा, कुलदैवत, इत्यादींची गृहचौकशी करून त्याच्या कायमस्वरुपी वास्तव्य, जातीबाबत खातरजमा केली जाते. मात्र, या शासन आदेशाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात नाही.

सेतू केंद्रातून अर्ज करणे गरजेचेसेतू, नागरी सुविधा केंद्रात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो. त्यावर दहा रुपये किमतीचे कोर्ट फी स्टॅम्प लावावा लागतो. केंद्रातील अर्ज तहसील, प्रांताधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी जातो. पात्र असेल तर प्रांताधिकारी जातीचा दाखला देतात. त्याची पडताळणी समाजकल्याण विभागाकडील समितीकडून होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण