शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्रामपंचायतीने बिल थकवलं; 'जलजीवन' व्हेंटिलेटरवर, योजनेच्या सौरऊर्जेला ब्रेक

By समीर देशपांडे | Updated: March 18, 2024 16:34 IST

महावितरणच्या ‘नाहरकत’ची अडचण

समीर देशपांडेकोल्हापूर : वीजबिल कमी यावे म्हणून गावची जलजीवन योजना सौरऊर्जेवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी निविदाही काढण्यात आली. परंतु सौरऊर्जा नेट मिटरिंगवेळी ग्रामपंचायतीच्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरणकडून ‘नाहरकत दाखला’ मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यभरातील अनेक पाणी योजना अंतिम टप्प्यात असताना हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जलजीवन योजनांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. निधीची कमतरता नसणारा हा कार्यक्रम राबवताना योजना राबवणाऱ्या ग्रामपंचायतीच कमी पडताहेत असे दिसून येत आहे. तरीही अनेक ग्रामपंचायतींनी योजना पूर्ण केली. योजना झाल्यानंतर वीजबिलाचा खर्च कमी यावा म्हणून अनेक गावांनी सौरऊर्जेवर योजना चालवण्यासाठी तशा निविदा काढल्या. नेट मिटरिंग करून किमान या योजनेचा निम्मा खर्च तरी सौरऊर्जेच्या माध्यमातून कमी होईल यासाठी प्रशासनानेही या बाबीला पाठबळ दिले. परंतु हाच मुद्दा आता अनेक ठिकाणी अडचणीचा झाला आहे. कारण ग्रामपंचायतीच्या वीज थकबाकीमुळे नेट मिटरिंगसाठी महावितरणकडून नाहरकत दाखला मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अनेक योजना अंतिम टप्प्यात आल्या आहेत. याच्या वीजपुरवठ्यासाठी जेव्हा महावितरणकडे अर्ज केला जातो तेव्हा त्या कनेशक्नवर असलेली थकबाकी पूर्ण भरल्याशिवाय सौरऊर्जेसाठी आवश्यक असलेला नाहरकत दाखला दिला जात नाही. त्यामुळे ही थकबाकी कशी भरायची असा प्रश्न ग्रामपंचायतींसमोर उभा ठाकला आहे.

वेळखाऊ पर्यायनिविदेमध्ये सौरऊर्जेच्या पर्यायाचा उल्लेख असल्याने आता जरी हायब्रीड म्हणजे नियमित वीज आणि सौरऊर्जा असे दोन्ही वापरायचे ठरल्यास ग्रामपंचायतीकडून तशी मागणी नोंदवून पुन्हा त्या प्रस्तावांना मान्यता देऊन मग त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

ग्रा.पं. नी थकबाकी भरण्याची गरजअनेक ग्रामपंचायती विविध कारणामुळे वीज थकबाकी ठेवत आल्या आहेत. अनेकदा गरज नसताना मोठ्या योजना मंजूर करून आणायच्या आणि नंतर बिल परवडत नाही अशी तक्रार करायची पद्धत पडली असून ही थकबाकी भरणे हाच यावरचा उपाय असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतelectricityवीजmahavitaranमहावितरण