शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

"देवेंद्र फडणवीस माफी मागा, अन्यथा कोल्हापुरात पाऊल ठेवू देणार नाही!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 12:43 IST

देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराज तसेच जनतेची माफी मागितल्याशिवाय त्यांना कोल्हापुरात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, अशा शब्दांत बुधवारी शाहूप्रेमींनी देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर शाहूप्रेमींचा संतापमाफी मागा; नाहीतर कोल्हापूर बंद

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेचे युग निर्माण केले, ते समाज क्रांतिकारक होते. अशा या राजाला लोकराजा, रयतेचा राजा, राजर्षी अशा अनेक पदव्या असताना महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक त्यांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख करून महाराजांचा अवमान केला आहे. फडणवीस यांनी शाहू महाराज तसेच जनतेची माफी मागितल्याशिवाय त्यांना कोल्हापुरात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, अशा शब्दांत शाहूप्रेमींनी देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर संताप व्यक्त केला.बुधवारी राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतिदिन होता. त्यानिमित्त अनेक नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना छत्रपती शाहू महाराज यांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला आहे.

ट्विटमध्ये चूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हे ट्विट मागे घेतले. मात्र त्याबद्दल कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नाही. त्यांच्या या ट्विटवर इतिहास संशोधक, शाहूप्रेमी तसेच नागरिकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.याबाबत संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील यांनी काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांना सामाजिक लोकशाहीचे स्तंभ म्हटले आहे. फडणवीस यांनी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा इतिहास समजून घ्यावा. शाहू महाराजांचा देशभर राजर्षी म्हणून उल्लेख केला जात असताना त्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणणाऱ्या, वामनी दावा करणाऱ्या फडणवीस यांची विरोधी पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. फडणवीस जोपर्यंत शाहू महाराज व जनतेची माफी मागत नाहीत, तोपर्यंत संभाजी ब्रिगेड त्यांना कोल्हापुरात पाऊल ठेवू देणार नाही. यासह फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातूनही अनेक शाहूप्रेमींनी व नागरिकांनी फडणवीस यांच्या या ट्विटवर जहरी शब्दांत टीका केली आहे.

शाहू महाराज यांचा हेतुपुरस्सर कार्यकर्ता असा उल्लेख करणे ही महाराजांनी फार मोठी उपेक्षा आहे. शाहू महाराज हे समाज क्रांतिकारक होते. सामाजिक कार्यकर्ते, अनुयायी अनेक असतात; पण क्रांतिकारक फार कमी असतात. शाहू, फुले, आंबेडकर हे क्रांतिकारक होते. फडणवीस यांच्यासारख्या माणसाने शाहू महाराजांचा उल्लेख करताना जबाबदारीने शब्द वापरायला हवे होते.- प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक

समतेचे युगनिर्माता असलेल्या शाहू महाराज यांचा कार्यकर्ता म्हणून उल्लेख करणे म्हणजे त्यांचे अवमूल्यन आहे. शब्दांचे महत्त्व जाणणाऱ्या जबाबदार नेत्याने असा उल्लेख करणे म्हणजे त्यांच्या मनात महाराजांविषयी वेगळ्या भावना आहे. का? भारतातील शाहूप्रेमी हा अवमान खपवून घेणार नाहीत.- इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर