शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

देवाप्पा पावला... साहित्य अकादमी देऊन गेला; कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण'ला पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 06:42 IST

धरणग्रस्त विस्थापितांच्या आवाजाचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : धरणासाठी घर, जमीन, जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित होणारी मनं, जाताना जिव्हाळ्याच्या जनावरांची सोबत हवी असतेच; पण त्यात वांझोटी जनावरं काय कामाची? ही भावना दृढ होऊन जंगलात सोडून दिलेल्या म्हशी रानटी झाल्याने मालक देवाप्पा व त्यांच्यातील होणारा संघर्ष याचा धांडोळा घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. 

चांदोली धरणाच्या निर्मितीवेळी झोळंबी आणि परिसरातील विस्थापित गावांच्या मनाचा मागोवा घेणाऱ्या, विस्थापितांची परवड वाचकांच्या मनावर खोलवर रुजवणाऱ्या खोत यांच्या या कादंबरीने साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवत मराठी साहित्यात मानाचे पान जोडले आहे. खोत यांच्यासह आतापर्यंत कोल्हापूर जिल्हातील आठ साहित्यिकांना हा पुरस्कार मिळाला आहे.भारतातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्य रचनांसाठी बुधवारी साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी दिल्लीत पुरस्कारांची घोषणा केली. गोव्यातील कोकणी साहित्यिक प्रकाश पर्येकार यांना ‘वर्सल’ या कथासंग्रहासाठी पुरस्कार जाहीर झाला. १२ मार्च २०२४ रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होईल. 

निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झालेले खोत हे कळे विद्यामंदिर येथे शिक्षक आहेत. 

हा पुरस्कार म्हणजे विस्थापितांचा आवाज आहे. जबाबदारीने लिहिणाऱ्या, काम करणाऱ्या प्रत्येक सृजनशील व्यक्तीची दखल घेणे, हेच खरे समाजहित आहे. मानव व पर्यावरण यांच्यातील संघर्ष कादंबरीत मांडला आहे.- कृष्णात खोत, लेखक

टॅग्स :sahitya akademi awardसाहित्य अकादमी पुरस्कार