शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Pahalgam Terror Attack: कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक काश्मीरमध्ये सुरक्षित, अनेकांचे नियोजन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:49 IST

ढगफुटीमुळे अडकलेले १६ पर्यटक उद्या येणार

कोल्हापूर : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे अतिरेक्यांचा हल्ला झाला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर आणि बेळगावचे सुमारे २०० पर्यटक सध्या या परिसरात पर्यटनासाठी गेले आहेत.संध्याकाळी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याची बातमी दूरचित्रवाणीवर आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांच्या छातीत धस्स झाले. प्रत्येक घरातून सातत्याने त्यांना फोन सुरू झाले. परंतु त्याठिकाणी केवळ पोस्टपेड सेवा सुरू असल्याने अनेकांचे फोन लागू शकले नाहीत. परिणामी, अनेकांच्या नातेवाइकांच्या घरात चिंतेचे वातावरण तयार झाले. सहल संयोजक रवी सरदार यांनी फोन करून ‘लोकमत’ला सांगितले की, बहुतांशी पर्यटक या पहलगामहून सुरक्षितपणे श्रीनगरला पोहोचले आहेत. सर्वजण सुरक्षित आहेत. अनेकांचे फोन लागत नसल्याने नातेवाईक चिंतेत आहेत. परंतु सर्वजण सुरक्षित असून, त्यांची काळजी न करण्याचे आवाहन सरदार यांनी केले आहे.

अनेकांचे नियोजन रद्दया घटनेमुळे कोल्हापूर आणि परिसरातून काश्मीरला जाणाऱ्या अनेकांनी आपली नियोजित सहल रद्द केली आहे. इतका भीषण दहशतवादी हल्ला झाल्याने ज्यांनी खरोखरच जाण्यासाठी आरक्षण केले आहे. त्यांनीही फेरविचार करायला सुरुवात केली आहे. या सर्वप्रकरणी केंद्र शासन नेमका काय निर्णय घेणार आहे, याचीही प्रतीक्षा असल्याचे सहलीवर जाण्यासाठी आरक्षण केलेल्या नागरिकांनी सांगितले.ढगफुटीमुळे अडकलेले १६ पर्यटक उद्या येणारजम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी पावसामुळे अडकलेले कोल्हापूरचे १६ पर्यटक सुरक्षित असून, ते उद्या, गुरुवारी कोल्हापुरात परत येतील, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली. ढगफुटीमुळे रस्ते वाहून गेले असून, रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. तसेच विमानाचे दरही वाढले आहेत. हे पर्यटक आज, बुधवारी विमानाने गोव्यात येतील व कारने गुरुवारी कोल्हापुरात येतील असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटन