शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Kolhapur: निधी असूनही कामे रेंगाळली, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची सद्य:स्थिती 

By भारत चव्हाण | Updated: February 26, 2025 17:53 IST

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

भारत चव्हाण कोल्हापूर : महानगरपालिकेचे कोणतेही विकास काम निविदेत दिलेल्या मुदतीत पूर्ण होत नसल्याचे अनुभव प्रत्येक कामातून येत आहे. सन २०२० मध्ये ७९ कोटी ९६ लाख खर्चाच्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता झाली, परंतु चार वर्षे उलटली, तरी पहिल्या टप्प्यातीलच काम अद्याप अपूर्ण आहे. या कामावर कोणा अधिकाऱ्यांचे वैयक्तिक नियंत्रण नसल्यामुळे कामाची गती मंदावली असल्याने उर्वरित कामे पूर्ण कधी होणार, असा सवाल विचारला जात आहे.एखाद्या व्यक्तीने स्वत:चे घर बांधायला काढले की, केव्हा एकदा पूर्ण होईल आणि त्या घरात राहायला जाईन, याची उत्सुकता लागून राहिलेली असते. पण, अंबाबाई मंदिर परिसर विकास कामांतर्गत होत असलेल्या तळमजल्यासह पाच मजले पार्किंग व सहा व सातव्या मजल्यावरील भक्तनिवासच्या इमारतीबद्दल महापालिकेच्या कोणत्याच अधिकाऱ्याला काहीच देणे-घेणे राहिलेले नाही. ठेकेदार कोल्हापूरचा आहे आणि त्यांनी तळमळ दाखविली, म्हणून तर पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे झुकलेले आहे.पहिल्या टप्प्यातील काम एक वर्षात पूर्ण करायचे होते, आता पाच वर्षे उलटून गेली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामही एक वर्षात पूर्ण करायचे आहे, पण पाच महिने होऊन गेल्यावर आता कुठे तिसऱ्या मजल्याचे स्लॅब जोडायला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. जर अशीच कामाची गती असेल, तर काम पूर्ण होणार कधी आणि त्या इमारतीचा पर्यटक, भाविकांना उपयोग होणार कधी हा प्रश्न आहे.

निविदा, वर्क ऑर्डरमध्ये वर्ष सरलेपहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे गेले की दुसऱ्या टप्प्यातील कामाना निधी सोडला जातो. दुसऱ्या टप्प्यातील सुचविलेल्या कामांकरिता ४० कोटींचा निधी वितरीत करण्यास फेब्रुवारी २०२४ मध्ये मान्यता झाली. त्यानंतर आठ महिन्यांनी म्हणजेच दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. पाच महिन्यांनी कामाला सुरुवात झाली आहे.

दुसऱ्या टप्प्यात ही कामे होणारदुसऱ्या टप्प्यात नव्याने बांधलेल्या वाहनतळ इमारतीत तिसरा, चौथा, पाचवा मजल्यावर पार्किंग आणि सहाव्या व सातव्या मजल्यावर भक्त निवास, तसेच ५० लोक बसतील, असे उपहारगृह या कामांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला होता, परंतु फेब्रुवारीत कामाला सुरुवात झाली आहे.

गाडीअड्डा वाहनतळ सुरुवात नाहीव्हिनस कॉर्नरजवळील गाडीअड्डा येथे वाहनतळ विकसित करण्याच्या कामाचा दुसऱ्या टप्प्यातील आराखड्यात समावेश आहे, परंतु या ठिकाणी अद्याप कामालाच हात लागलेला नाही.

कामावर नियंत्रणाचा अभावमहालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंमलबजावणी करण्याकरिता अधिकाऱ्यांनी आठवडा, दोन आठवड्यातून एकदा पाहणी, आढावा बैठक घ्यायला पाहिजे, पण कोणाचेही या कामाकडे लक्ष नाही. कोणावर नियंत्रण राहिलेले नाही. वर्कऑर्डर झाली की, सगळ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. निधी असूनही कामे रेंगळली आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर