शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

Kolhapur: निधी असूनही कामे रेंगाळली, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची सद्य:स्थिती 

By भारत चव्हाण | Updated: February 26, 2025 17:53 IST

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

भारत चव्हाण कोल्हापूर : महानगरपालिकेचे कोणतेही विकास काम निविदेत दिलेल्या मुदतीत पूर्ण होत नसल्याचे अनुभव प्रत्येक कामातून येत आहे. सन २०२० मध्ये ७९ कोटी ९६ लाख खर्चाच्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता झाली, परंतु चार वर्षे उलटली, तरी पहिल्या टप्प्यातीलच काम अद्याप अपूर्ण आहे. या कामावर कोणा अधिकाऱ्यांचे वैयक्तिक नियंत्रण नसल्यामुळे कामाची गती मंदावली असल्याने उर्वरित कामे पूर्ण कधी होणार, असा सवाल विचारला जात आहे.एखाद्या व्यक्तीने स्वत:चे घर बांधायला काढले की, केव्हा एकदा पूर्ण होईल आणि त्या घरात राहायला जाईन, याची उत्सुकता लागून राहिलेली असते. पण, अंबाबाई मंदिर परिसर विकास कामांतर्गत होत असलेल्या तळमजल्यासह पाच मजले पार्किंग व सहा व सातव्या मजल्यावरील भक्तनिवासच्या इमारतीबद्दल महापालिकेच्या कोणत्याच अधिकाऱ्याला काहीच देणे-घेणे राहिलेले नाही. ठेकेदार कोल्हापूरचा आहे आणि त्यांनी तळमळ दाखविली, म्हणून तर पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे झुकलेले आहे.पहिल्या टप्प्यातील काम एक वर्षात पूर्ण करायचे होते, आता पाच वर्षे उलटून गेली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामही एक वर्षात पूर्ण करायचे आहे, पण पाच महिने होऊन गेल्यावर आता कुठे तिसऱ्या मजल्याचे स्लॅब जोडायला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. जर अशीच कामाची गती असेल, तर काम पूर्ण होणार कधी आणि त्या इमारतीचा पर्यटक, भाविकांना उपयोग होणार कधी हा प्रश्न आहे.

निविदा, वर्क ऑर्डरमध्ये वर्ष सरलेपहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे गेले की दुसऱ्या टप्प्यातील कामाना निधी सोडला जातो. दुसऱ्या टप्प्यातील सुचविलेल्या कामांकरिता ४० कोटींचा निधी वितरीत करण्यास फेब्रुवारी २०२४ मध्ये मान्यता झाली. त्यानंतर आठ महिन्यांनी म्हणजेच दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. पाच महिन्यांनी कामाला सुरुवात झाली आहे.

दुसऱ्या टप्प्यात ही कामे होणारदुसऱ्या टप्प्यात नव्याने बांधलेल्या वाहनतळ इमारतीत तिसरा, चौथा, पाचवा मजल्यावर पार्किंग आणि सहाव्या व सातव्या मजल्यावर भक्त निवास, तसेच ५० लोक बसतील, असे उपहारगृह या कामांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला होता, परंतु फेब्रुवारीत कामाला सुरुवात झाली आहे.

गाडीअड्डा वाहनतळ सुरुवात नाहीव्हिनस कॉर्नरजवळील गाडीअड्डा येथे वाहनतळ विकसित करण्याच्या कामाचा दुसऱ्या टप्प्यातील आराखड्यात समावेश आहे, परंतु या ठिकाणी अद्याप कामालाच हात लागलेला नाही.

कामावर नियंत्रणाचा अभावमहालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंमलबजावणी करण्याकरिता अधिकाऱ्यांनी आठवडा, दोन आठवड्यातून एकदा पाहणी, आढावा बैठक घ्यायला पाहिजे, पण कोणाचेही या कामाकडे लक्ष नाही. कोणावर नियंत्रण राहिलेले नाही. वर्कऑर्डर झाली की, सगळ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. निधी असूनही कामे रेंगळली आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर