शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापूर बाजार समितीत कोट्यवधीच्या ठेवी, सुविधांची वाणवा; रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे शेतीमालावर धुळीचे थर

By राजाराम लोंढे | Updated: December 30, 2022 13:22 IST

धुळीचे लोट पसरत असल्याने भाजीपाला, गुळासह सर्व शेतीमालावर धुळीचे थर

राजाराम लोंढेकोल्हापूर : गेली अडीच वर्षे बाजार समितीला तसे कारभारीच नाहीत. अशासकीय मंडळाने आपण काटकसरीचा कारभार कसा करतो?, हे दाखवून नेत्यांकडून पाठ थोपटून घेण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे समितीच्या बँकेत कोट्यवधीच्या ठेवी आहेत, मात्र सुविधा देण्यात हात आखडता घेतला, त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. समिती आवारात चोवीस तास धुळीचे लोट पसरत असल्याने भाजीपाला, गुळासह सर्व शेतीमालावर धुळीचे थर साचलेले असतात.समितीमधील अडते, व्यापाऱ्यांकडून कर घेतला जातो, त्याबदल्यात त्यांना सोयी-सुविधा देणे समिती प्रशासनाला बंधनकारक आहे. मात्र, त्याकडे गेली अडीच वर्षे दुर्लक्ष केले आहे. समितीची रोजची उलाढाल सरासरी साडेचार कोटींची आहे. त्यासह इतर बाबींतून समितीला रोज ४ लाख ६५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यापैकी १० टक्केही सोयी-सुविधांवर खर्च केला जात नाही.संचालक मंडळ गेल्यापासून अडीच वर्षांत समितीच्या ठेवीत साडेआठ कोटीने वाढ झाली आहे. बँकेत कोट्यवधीच्या ठेवी आहेत, मात्र सुविधांसाठी एक रुपयाही खर्च केलेला नाही. रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे, एखादे वाहन गेले की धुळीचे लोट उसळतात. समिती आवारात रोज सरासरी १३०० वाहने येतात. त्यामुळे आवारात धुळीचे लोट कधी थांबतच नाहीत. हीच धूळ शेतीमालावर जाऊन बसते. त्याचा परिणामही प्रतीवर होतो, परिणामी दराला फटका बसतो. समितीच्या प्रशासकीय इमारतीवरही धुळीचे थर बसले आहेत.

बोळ अरुंद होऊ लागलेसमितीमधील दोन रस्त्यांना जोडणारे अनेक बोळ आहेत, त्या बोळांची अवस्था तर फारच वाईट आहेत. ते हळूहळू अरुंद होऊ लागले आहेत.

समिती आवार झुडपांनी व्यापलासमिती आवारात अस्वच्छता आहेच, त्याचबरोबर अनेक ठिकाणी झुडपे वाढल्याने रस्तेच गायब झालेले दिसतात. काही अडत दुकानांचे फलकही दिसत नाहीत.

कारभारी येणार तरी कधी?बाजार समित्यांच्या निवडणुका कोरोनापासून लांबणीवर पडल्याने कामकाज पुरते ठप्प आहे. प्रशासकीय मंडळावर काम करण्याच्या मर्यादा येतात. प्राधिकरणाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असती. मात्र, ग्रामपंचायती निवडणुकीमुळे प्रक्रिया थांबल्याने नवीन कारभारी कधी येणार? याविषयी उत्सुकता आहे.

दृष्टिक्षेपात बाजार समिती :रोजची उलाढाल : ४.५० कोटीएकूण रोजचे उत्पन्न : ४.६५ लाखसमिती येणाऱ्या वाहनांची संख्या : सरासरी १३००. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarket yardमार्केट यार्ड