शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

विभागात कृषिपंपांची ७४७ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 1:13 AM

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वीज बिले भरण्यास शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने कृषिपंपांच्या थकबाकीचा आकडा वाढत ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वीज बिले भरण्यास शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने कृषिपंपांच्या थकबाकीचा आकडा वाढत चालला आहे. सद्य:स्थितीत राज्यात २५ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यात कोल्हापूर विभागाचा वाटा ७४७ कोटींवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरात या थकबाकीत १२५ कोटी रुपयांची भर पडली आहे. कोल्हापूर, सांगलीसारख्या सधन जिल्ह्यांनी बिले भरण्यास टाळाटाळ केल्याने ‘महावितरण’च्या कारभाराचा डोलारा सांभाळायचा कसा, असा प्रश्न उभा ठाकला आहे.सध्या पाणी व कोळशाच्या अपुºया पुरवठ्यामुळे वीजनिर्मिती घटल्याने राज्यात २५00 मेगावॅटचा तुटवडा आहे. परिणामी राज्यभरात भारनियमन सुरू असून शेतीपंपासाठीच्या पुरवठ्यातही दोन तासांनी कपात केली आहे. शेतीपंपाची थकबाकी वसूल होत नसल्यानेही त्यांच्या पुरवठ्यात कपात केली जात आहे. आॅगस्टअखेर कोल्हापूर विभागात ६२३ कोटींची थकबाकी होती. आतापर्यंत ती ७४७ कोटींवर गेली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यांची १६४, तर सांगलीची ५८२ कोटी इतकी थकबाकी झाली आहे.इतर जिल्ह्यांपेक्षा ही थकबाकी कमी असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. सोलापूर, नगर, लातूर, नाशिक, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांत प्रत्येकी हजार ते १५०० कोटींच्या वर थकबाकी असून वसुली होत नसल्याने त्याचा सेवेस फटका बसत आहे. कृषी संजीवनी योजनेसारखी सवलत पुन्हा लागू होईल, या अपेक्षेने बिले भरण्याकडे कानाडोळा होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.वसुलीला ब्रेक‘महावितरण’ने वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली, पण ही कनेक्शन तोडू नयेत, असे आदेश राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी काढले आहेत. ट्रान्स्फॉर्मर जळाला तर २५ हजारांच्या आत थकबाकी असणाºयांना तीन हजार, तर त्यावरील थकबाकी असणाºयांकडून पाच हजार रुपये भरून ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करून वीजजोडणी पूर्ववत करण्याचेही आदेशात म्हटले आहे. यानंतर वसुली थांबली असून, विभागात एप्रिलपासून केवळ नऊ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत.जिल्हा कृषिपंप थकबाकीकोल्हापूर १ लाख ४३ हजार २६१ १६४ कोटीसांगली २ लाख २५ हजार ८६४ ५८२ कोटी