शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वहिनींचे तळ्यात-मळ्यात, मेहुण्या-पाहुण्यांचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:21 IST

कॉँग्रेसकडून शनिवारी आमदार शशिकांत शिंदे, अण्णासाहेब डांगे, सुरेश पाटील या निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती शासकीय विश्रामगृहात घेतल्या. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे उपस्थित होते

ठळक मुद्देराष्टवादी काँग्रेसच्या मुलाखती । १५ आॅगस्टपर्यंत उमेदवारांची घोषणा - शशिकांत शिंदे

कोल्हापूर : चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी ‘आगामी विधानसभा लढविणारच’ असे स्पष्ट न सांगता कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ‘आपण की नंदाताई बाभूळकर या लढणार हे निश्चित करू,’ अशी तळ्यात-मळ्यात भूमिका घेतली. राधानगरी-भुदरगडमधून के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीवर दावा केला.

राष्टÑवादी कॉँग्रेसकडून शनिवारी आमदार शशिकांत शिंदे, अण्णासाहेब डांगे, सुरेश पाटील या निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती शासकीय विश्रामगृहात घेतल्या. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे उपस्थित होते. सकाळी ११ वाजता कागलमधून हसन मुश्रीफ व भैया माने यांनी मुलाखत दिली. त्यानंतर आमदार संध्यादेवी कुपेकर व एम. जे. पाटील यांनी मुलाखत दिली.

‘दक्षिण’मधून रोहित पाटील, महादेव माने, निरंजन कदम यांनी; तर ‘करवीर’मधून मधुकर जांभळे, सोनाजी पाटील यांनी मुलाखत दिली. हातकणंगलेमधून भास्कर शेटे, अनिल कांबळे, लखन बेनाडे यांनी मागणी केली. इचलकरंजीतून नितीन माने व बाळासाहेब देशमुख यांनी, तर शिरोळमधून राजेंद्र पाटील-यड्रावकर व चंगेजखान पठाण यांनी मुलाखत दिली. यड्रावकर यांना उमेदवारी देणार असाल तर आपला आग्रह राहणार नसल्याचे पठाण यांनी सांगितले.

राधानगरी-भुदरगडमधून ए. वाय. पाटील यांनी समर्थकांसह मुलाखत दिली. गेली २५-३० वर्षे शरद पवार यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून काम करीत आहे. के. पी. पाटील हे चार वेळा लढले. त्यांतील दोन वेळा ते पराभूत झाले. आता आपले वय ६० असल्याने पुढे संधी नाही. त्यात राधानगरीत सर्वाधिक मतदान असताना संधी मिळत नसल्याने नाराजी आहे, असे ए. वाय. पाटील यांनी सांगितले.

‘भोगावती’चे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई, उमेश भोईटे यांना घेऊनच के. पी. पाटील मुलाखतस्थळी पोहोचले. या सर्वांनी के. पी. पाटील यांना उमेदवारीची मागणी केली. दरम्यान, शशिकांत शिंदे म्हणाले, दहाही मतदारसंघांत पक्षाकडे ताकदीचे उमेदवार आहेत. १५ आॅगस्टपर्यंत घोषणा केली जाईल.‘उत्तर’मधून व्ही. बी. पाटील यांची मागणीकोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ आघाडीमध्ये कोणाला सुटणार हा पेच असताना उद्योगपती व्ही. बी. पाटील यांनी येथून लढण्याची तयारी केली आहे. त्यांनी राष्टÑवादीकडे तशी मागणी केली असून त्यांच्यासह आर. के. पोवार, हसिना फरास, आदिल फरास, रोहित पाटील, जहिदा मुजावर, महेंद्र चव्हाण यांनी मागणी केली. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर