शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

बाजारातील दराप्रमाणे साखर खरेदीची मागणी-‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:35 IST

 जयसिंगपूर : साखरेचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिले मिळणे अडचणीचे ठरत आहे. ठरल्याप्रमाणे राज्यशासनाने बाजारातील ३२ रुपये किलोप्रमाणे १० लाख टन साखर खरेदी करावी, अशी मागणी मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. भूविकास बँकेतील शेतकºयांची थकीत कर्जे माफ करावीत, अशीदेखील मागणी यावेळी करण्यात आली.अनेक साखर ...

ठळक मुद्देदर पडल्याने बिले मिळण्यात अडचण

 जयसिंगपूर : साखरेचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिले मिळणे अडचणीचे ठरत आहे. ठरल्याप्रमाणे राज्यशासनाने बाजारातील ३२ रुपये किलोप्रमाणे १० लाख टन साखर खरेदी करावी, अशी मागणी मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. भूविकास बँकेतील शेतकºयांची थकीत कर्जे माफ करावीत, अशीदेखील मागणी यावेळी करण्यात आली.

अनेक साखर कारखान्यांनी अंतिम दरदेखील देण्यास नकार दिला आहे. मध्यंतरी साखरेचे दर ३६०० रुपये प्रतिक्विंंटल होते. मात्र, सध्या २८०० रुपयांवर येऊन ठेपले आहेत. याचाच परिणाम शेतकºयांच्या बिलावर झाला आहे. शेतकºयांच्या बिलात प्रतिटन ५०० रुपयांची बेकायदेशीर कपात केली आहे. त्यामुळे शेतकºयांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला असून, साखर कारखाने शेतकºयांना उर्वरित बिले देण्यास नकार देत आहेत. साखरेच्या दरात हस्तक्षेप करीत राज्य सरकारने ३२ रुपये किलोप्रमाणे १० लाख टन साखर खरेदी करण्याचे आश्वासन देखील दिले होते.

मात्र, अद्यापही यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे साखरेचे दर वारंवार कोसळत आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना करावी. तसेच भूविकास बँकेतील ३७ हजार थकबाकीदार शेतकरी असून, त्यांच्या थकीत कर्जाची आकडेवारी ९४६ कोटी इतकी आहे. सध्या राज्यातील भूविकास बँक अवसायनात काढण्यात आली आहे. अनेक साखर कारखान्यांनी शेतकºयांना बँकेच्या माध्यमातून कर्जाचे वाटप केले असून, शेतकºयांनी पण साखर कारखान्यांकडे भरणा केला आहे. मात्र, कारखान्यांनी तसेच संस्थांनी बँकेकडे कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे तो बोजा शेतकºयांच्या सात-बारावर चढलेला आहे. सध्याच्या कर्जमाफीत याचा समावेश केला नाही.

ओटीएस अंतर्गत ९४६ कोटी रुपयांचे कर्ज २३३ कोटी होते. हे कर्ज शासनाने भरल्यास ३७ हजार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे. तरी शासनाने त्वरित यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्यावतीने सहकारमंत्री देशमुख यांना देण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य सावकार मादनाईक, भगवान काटे, जालिंंदर पाटील, सागर चिपरगे उपस्थित होते.

मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना निवेदन देताना सावकर मादनाईक. शेजारी प्रा. जालिंदर पाटील, भगवान काटे उपस्थित होते.