शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील दराप्रमाणे साखर खरेदीची मागणी-‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:35 IST

 जयसिंगपूर : साखरेचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिले मिळणे अडचणीचे ठरत आहे. ठरल्याप्रमाणे राज्यशासनाने बाजारातील ३२ रुपये किलोप्रमाणे १० लाख टन साखर खरेदी करावी, अशी मागणी मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. भूविकास बँकेतील शेतकºयांची थकीत कर्जे माफ करावीत, अशीदेखील मागणी यावेळी करण्यात आली.अनेक साखर ...

ठळक मुद्देदर पडल्याने बिले मिळण्यात अडचण

 जयसिंगपूर : साखरेचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिले मिळणे अडचणीचे ठरत आहे. ठरल्याप्रमाणे राज्यशासनाने बाजारातील ३२ रुपये किलोप्रमाणे १० लाख टन साखर खरेदी करावी, अशी मागणी मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. भूविकास बँकेतील शेतकºयांची थकीत कर्जे माफ करावीत, अशीदेखील मागणी यावेळी करण्यात आली.

अनेक साखर कारखान्यांनी अंतिम दरदेखील देण्यास नकार दिला आहे. मध्यंतरी साखरेचे दर ३६०० रुपये प्रतिक्विंंटल होते. मात्र, सध्या २८०० रुपयांवर येऊन ठेपले आहेत. याचाच परिणाम शेतकºयांच्या बिलावर झाला आहे. शेतकºयांच्या बिलात प्रतिटन ५०० रुपयांची बेकायदेशीर कपात केली आहे. त्यामुळे शेतकºयांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला असून, साखर कारखाने शेतकºयांना उर्वरित बिले देण्यास नकार देत आहेत. साखरेच्या दरात हस्तक्षेप करीत राज्य सरकारने ३२ रुपये किलोप्रमाणे १० लाख टन साखर खरेदी करण्याचे आश्वासन देखील दिले होते.

मात्र, अद्यापही यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे साखरेचे दर वारंवार कोसळत आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना करावी. तसेच भूविकास बँकेतील ३७ हजार थकबाकीदार शेतकरी असून, त्यांच्या थकीत कर्जाची आकडेवारी ९४६ कोटी इतकी आहे. सध्या राज्यातील भूविकास बँक अवसायनात काढण्यात आली आहे. अनेक साखर कारखान्यांनी शेतकºयांना बँकेच्या माध्यमातून कर्जाचे वाटप केले असून, शेतकºयांनी पण साखर कारखान्यांकडे भरणा केला आहे. मात्र, कारखान्यांनी तसेच संस्थांनी बँकेकडे कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे तो बोजा शेतकºयांच्या सात-बारावर चढलेला आहे. सध्याच्या कर्जमाफीत याचा समावेश केला नाही.

ओटीएस अंतर्गत ९४६ कोटी रुपयांचे कर्ज २३३ कोटी होते. हे कर्ज शासनाने भरल्यास ३७ हजार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे. तरी शासनाने त्वरित यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्यावतीने सहकारमंत्री देशमुख यांना देण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य सावकार मादनाईक, भगवान काटे, जालिंंदर पाटील, सागर चिपरगे उपस्थित होते.

मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना निवेदन देताना सावकर मादनाईक. शेजारी प्रा. जालिंदर पाटील, भगवान काटे उपस्थित होते.