शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
3
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
4
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
5
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
6
'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
7
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
8
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
9
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
10
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
11
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
12
Rohit Sharmaची पत्नी रितिकाच्या हातातल्या महागड्या पर्सची रंगली चर्चा, किंमत ऐकून थक्क व्हाल
13
"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल
14
'या' विमान कंपनीची नवी ऑफर: प्रवाशांना मोठी भेट; मोठ्यांना १,४९९ रुपयांपासून तर मुलांना १ रुपयांत विमान प्रवास
15
Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच
16
Bornhan: मकर संक्रांत ते रथसप्तमी: बाळाची पहिली संक्रांत? मग 'बोरन्हाण' घालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!
17
Travel : एकटं फिरायचंय? टेन्शन सोडा! सोलो ट्रॅव्हलिंगसाठी 'ही' ५ ठिकाणे आहेत सर्वात बेस्ट
18
"हा साप मला चावलाय, माझ्यावर उपचार करा" सापाला खिशात घालून रिक्षा चालकानं गाठलं रुग्णालय
19
'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
20
Harsha Richhariya : "आता बस्स झालं, तुमचा धर्म तुमच्याकडेच ठेवा, मी सीता नाही..."; हर्षा रिछारियाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील दराप्रमाणे साखर खरेदीची मागणी-‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:35 IST

 जयसिंगपूर : साखरेचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिले मिळणे अडचणीचे ठरत आहे. ठरल्याप्रमाणे राज्यशासनाने बाजारातील ३२ रुपये किलोप्रमाणे १० लाख टन साखर खरेदी करावी, अशी मागणी मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. भूविकास बँकेतील शेतकºयांची थकीत कर्जे माफ करावीत, अशीदेखील मागणी यावेळी करण्यात आली.अनेक साखर ...

ठळक मुद्देदर पडल्याने बिले मिळण्यात अडचण

 जयसिंगपूर : साखरेचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिले मिळणे अडचणीचे ठरत आहे. ठरल्याप्रमाणे राज्यशासनाने बाजारातील ३२ रुपये किलोप्रमाणे १० लाख टन साखर खरेदी करावी, अशी मागणी मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. भूविकास बँकेतील शेतकºयांची थकीत कर्जे माफ करावीत, अशीदेखील मागणी यावेळी करण्यात आली.

अनेक साखर कारखान्यांनी अंतिम दरदेखील देण्यास नकार दिला आहे. मध्यंतरी साखरेचे दर ३६०० रुपये प्रतिक्विंंटल होते. मात्र, सध्या २८०० रुपयांवर येऊन ठेपले आहेत. याचाच परिणाम शेतकºयांच्या बिलावर झाला आहे. शेतकºयांच्या बिलात प्रतिटन ५०० रुपयांची बेकायदेशीर कपात केली आहे. त्यामुळे शेतकºयांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला असून, साखर कारखाने शेतकºयांना उर्वरित बिले देण्यास नकार देत आहेत. साखरेच्या दरात हस्तक्षेप करीत राज्य सरकारने ३२ रुपये किलोप्रमाणे १० लाख टन साखर खरेदी करण्याचे आश्वासन देखील दिले होते.

मात्र, अद्यापही यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे साखरेचे दर वारंवार कोसळत आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना करावी. तसेच भूविकास बँकेतील ३७ हजार थकबाकीदार शेतकरी असून, त्यांच्या थकीत कर्जाची आकडेवारी ९४६ कोटी इतकी आहे. सध्या राज्यातील भूविकास बँक अवसायनात काढण्यात आली आहे. अनेक साखर कारखान्यांनी शेतकºयांना बँकेच्या माध्यमातून कर्जाचे वाटप केले असून, शेतकºयांनी पण साखर कारखान्यांकडे भरणा केला आहे. मात्र, कारखान्यांनी तसेच संस्थांनी बँकेकडे कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे तो बोजा शेतकºयांच्या सात-बारावर चढलेला आहे. सध्याच्या कर्जमाफीत याचा समावेश केला नाही.

ओटीएस अंतर्गत ९४६ कोटी रुपयांचे कर्ज २३३ कोटी होते. हे कर्ज शासनाने भरल्यास ३७ हजार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे. तरी शासनाने त्वरित यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्यावतीने सहकारमंत्री देशमुख यांना देण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य सावकार मादनाईक, भगवान काटे, जालिंंदर पाटील, सागर चिपरगे उपस्थित होते.

मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना निवेदन देताना सावकर मादनाईक. शेजारी प्रा. जालिंदर पाटील, भगवान काटे उपस्थित होते.