शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

गारगोटीत बियाणे खरेदीसाठी झुंबड देशी वाणांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:46 IST

गारगोटी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. हा बाजार पावसाळी बी-बियाण्यांनी फुलला होता, तर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्दे दुर्मीळ, पावसाळ्यात येणारी विविध प्रकारची वेलवर्गीय, फळवर्गीय पिके

गारगोटी : गारगोटी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. हा बाजार पावसाळी बी-बियाण्यांनी फुलला होता, तर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

अतिशय दुर्मीळ असणारी आणि फक्त पावसाळ्यात येणारी ही विविध प्रकारची वेलवर्गीय आणि फळवर्गीय पिके आहेत. यांची चव संशोधित आणि संकरित वाणापेक्षा अविट असते. यामुळे शेती सेवा केंद्रात मिळणाºया बियाण्यांपेक्षा या वाणांना ग्रामीण भागातील शेतकरी अधिक पसंती देतात. काही जातींची वाण आता नष्ट झाली आहेत. काळाच्या ओघात उरलेल्या वाणांना किती दिवस तग मिळतो असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बदलणाºया पिकांच्या पद्धतीने भारतीय जनजीवनावर विपरीत परिणाम जाणवू लागले आहेत. हरितक्रांती करण्याच्या नावाखाली वारेमाप रासायनिक खतांचा वापर करून जमिनींचे आणि पर्यायाने आपले आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जुन्या वाणांकडे भारतीय माणसाला वळावे लागणार आहे. त्यामुळेच या बाजारपेठा टिकणे आवश्यक आहे.शेतकरी स्त्रियांनी वर्षभर पारंपरिक पद्धतीने काळजीपूर्वक या बियाण्यांची साठवण केलेली असते. बी-बियाणे विक्रीमुळे थोडाफार आर्थिक लाभ होत असल्याने शेतकरी महिला अशी बियाणी राख, गाडगी, यातून साठवून ठेवतात. केवळ दोन ते तीन आठवडा बाजारात खरेदी-विक्री होते. शेती व परसबागेत पेरणीसाठी ही बियाणी वापरली जात असल्याने खरेदीसाठी शेतकरी व परसबाग करणारे लोक ती खरेदी करतात,तर ज्वारी, वर्णा, मसूर,शेंगदाणे खाण्यासाठी लोक खरेदी करतात.मृग नक्षत्राच्या काळात उपलब्धबाजारात वर्षभर कोणत्याही बी-बियाणे दुकानातून न मिळणारी दुर्मीळ बियाणी फक्त मृग नक्षत्राच्या काळात उपलब्ध होत असल्याने सर्वांना या बिवाळ्या (बियाण्यांची) बाजाराची प्रतीक्षा लागलेली असते. यामध्ये प्रामुख्याने बांधावरची ज्वारी, वरणा, जगदाळे, काटे भेंडी, बावची, मोठा भोपळा, कोहळा, मिरची, दिडका, काकडी, पडवळ, चवाळी, घेवडा, देशी शेंगदाणे, तोंदली, वाळकी, तुरा जोंधळा, तूर, हळदीचे, आल्याचे गड्डे, अशी पारंपरिक बियाणी उपलब्ध होतात. 

भारतीय कृषी संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. अनेक प्रकारच्या पारंपरिक बियाण्यांची येथे लागवड केली जात आहे; पण जादा उत्पन्न मिळवण्यासाठी सुधारित आणि संकरित बी-बियाणे वापरण्याकडे शेतकरी वळला असल्यामुळे काही बियाणांच्या जाती नष्ट होत आहेत. पावसाळ्यात बांधावर आणि शेतात येणाºया पिकांची चव जिभेवर रेंगाळते. ही बियाणी शासनाने जतन करणे आवश्यक आहे, अन्यथा काळाच्या ओघात ती पडद्याआड होतील.- सात्तापा पाटील (कृषितज्ज्ञ, म्हसवे, ता. भुदरगड)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार