शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

गारगोटीत बियाणे खरेदीसाठी झुंबड देशी वाणांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:46 IST

गारगोटी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. हा बाजार पावसाळी बी-बियाण्यांनी फुलला होता, तर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्दे दुर्मीळ, पावसाळ्यात येणारी विविध प्रकारची वेलवर्गीय, फळवर्गीय पिके

गारगोटी : गारगोटी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. हा बाजार पावसाळी बी-बियाण्यांनी फुलला होता, तर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

अतिशय दुर्मीळ असणारी आणि फक्त पावसाळ्यात येणारी ही विविध प्रकारची वेलवर्गीय आणि फळवर्गीय पिके आहेत. यांची चव संशोधित आणि संकरित वाणापेक्षा अविट असते. यामुळे शेती सेवा केंद्रात मिळणाºया बियाण्यांपेक्षा या वाणांना ग्रामीण भागातील शेतकरी अधिक पसंती देतात. काही जातींची वाण आता नष्ट झाली आहेत. काळाच्या ओघात उरलेल्या वाणांना किती दिवस तग मिळतो असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बदलणाºया पिकांच्या पद्धतीने भारतीय जनजीवनावर विपरीत परिणाम जाणवू लागले आहेत. हरितक्रांती करण्याच्या नावाखाली वारेमाप रासायनिक खतांचा वापर करून जमिनींचे आणि पर्यायाने आपले आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जुन्या वाणांकडे भारतीय माणसाला वळावे लागणार आहे. त्यामुळेच या बाजारपेठा टिकणे आवश्यक आहे.शेतकरी स्त्रियांनी वर्षभर पारंपरिक पद्धतीने काळजीपूर्वक या बियाण्यांची साठवण केलेली असते. बी-बियाणे विक्रीमुळे थोडाफार आर्थिक लाभ होत असल्याने शेतकरी महिला अशी बियाणी राख, गाडगी, यातून साठवून ठेवतात. केवळ दोन ते तीन आठवडा बाजारात खरेदी-विक्री होते. शेती व परसबागेत पेरणीसाठी ही बियाणी वापरली जात असल्याने खरेदीसाठी शेतकरी व परसबाग करणारे लोक ती खरेदी करतात,तर ज्वारी, वर्णा, मसूर,शेंगदाणे खाण्यासाठी लोक खरेदी करतात.मृग नक्षत्राच्या काळात उपलब्धबाजारात वर्षभर कोणत्याही बी-बियाणे दुकानातून न मिळणारी दुर्मीळ बियाणी फक्त मृग नक्षत्राच्या काळात उपलब्ध होत असल्याने सर्वांना या बिवाळ्या (बियाण्यांची) बाजाराची प्रतीक्षा लागलेली असते. यामध्ये प्रामुख्याने बांधावरची ज्वारी, वरणा, जगदाळे, काटे भेंडी, बावची, मोठा भोपळा, कोहळा, मिरची, दिडका, काकडी, पडवळ, चवाळी, घेवडा, देशी शेंगदाणे, तोंदली, वाळकी, तुरा जोंधळा, तूर, हळदीचे, आल्याचे गड्डे, अशी पारंपरिक बियाणी उपलब्ध होतात. 

भारतीय कृषी संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. अनेक प्रकारच्या पारंपरिक बियाण्यांची येथे लागवड केली जात आहे; पण जादा उत्पन्न मिळवण्यासाठी सुधारित आणि संकरित बी-बियाणे वापरण्याकडे शेतकरी वळला असल्यामुळे काही बियाणांच्या जाती नष्ट होत आहेत. पावसाळ्यात बांधावर आणि शेतात येणाºया पिकांची चव जिभेवर रेंगाळते. ही बियाणी शासनाने जतन करणे आवश्यक आहे, अन्यथा काळाच्या ओघात ती पडद्याआड होतील.- सात्तापा पाटील (कृषितज्ज्ञ, म्हसवे, ता. भुदरगड)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार