शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

गारगोटीत बियाणे खरेदीसाठी झुंबड देशी वाणांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:46 IST

गारगोटी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. हा बाजार पावसाळी बी-बियाण्यांनी फुलला होता, तर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्दे दुर्मीळ, पावसाळ्यात येणारी विविध प्रकारची वेलवर्गीय, फळवर्गीय पिके

गारगोटी : गारगोटी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. हा बाजार पावसाळी बी-बियाण्यांनी फुलला होता, तर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

अतिशय दुर्मीळ असणारी आणि फक्त पावसाळ्यात येणारी ही विविध प्रकारची वेलवर्गीय आणि फळवर्गीय पिके आहेत. यांची चव संशोधित आणि संकरित वाणापेक्षा अविट असते. यामुळे शेती सेवा केंद्रात मिळणाºया बियाण्यांपेक्षा या वाणांना ग्रामीण भागातील शेतकरी अधिक पसंती देतात. काही जातींची वाण आता नष्ट झाली आहेत. काळाच्या ओघात उरलेल्या वाणांना किती दिवस तग मिळतो असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बदलणाºया पिकांच्या पद्धतीने भारतीय जनजीवनावर विपरीत परिणाम जाणवू लागले आहेत. हरितक्रांती करण्याच्या नावाखाली वारेमाप रासायनिक खतांचा वापर करून जमिनींचे आणि पर्यायाने आपले आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जुन्या वाणांकडे भारतीय माणसाला वळावे लागणार आहे. त्यामुळेच या बाजारपेठा टिकणे आवश्यक आहे.शेतकरी स्त्रियांनी वर्षभर पारंपरिक पद्धतीने काळजीपूर्वक या बियाण्यांची साठवण केलेली असते. बी-बियाणे विक्रीमुळे थोडाफार आर्थिक लाभ होत असल्याने शेतकरी महिला अशी बियाणी राख, गाडगी, यातून साठवून ठेवतात. केवळ दोन ते तीन आठवडा बाजारात खरेदी-विक्री होते. शेती व परसबागेत पेरणीसाठी ही बियाणी वापरली जात असल्याने खरेदीसाठी शेतकरी व परसबाग करणारे लोक ती खरेदी करतात,तर ज्वारी, वर्णा, मसूर,शेंगदाणे खाण्यासाठी लोक खरेदी करतात.मृग नक्षत्राच्या काळात उपलब्धबाजारात वर्षभर कोणत्याही बी-बियाणे दुकानातून न मिळणारी दुर्मीळ बियाणी फक्त मृग नक्षत्राच्या काळात उपलब्ध होत असल्याने सर्वांना या बिवाळ्या (बियाण्यांची) बाजाराची प्रतीक्षा लागलेली असते. यामध्ये प्रामुख्याने बांधावरची ज्वारी, वरणा, जगदाळे, काटे भेंडी, बावची, मोठा भोपळा, कोहळा, मिरची, दिडका, काकडी, पडवळ, चवाळी, घेवडा, देशी शेंगदाणे, तोंदली, वाळकी, तुरा जोंधळा, तूर, हळदीचे, आल्याचे गड्डे, अशी पारंपरिक बियाणी उपलब्ध होतात. 

भारतीय कृषी संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. अनेक प्रकारच्या पारंपरिक बियाण्यांची येथे लागवड केली जात आहे; पण जादा उत्पन्न मिळवण्यासाठी सुधारित आणि संकरित बी-बियाणे वापरण्याकडे शेतकरी वळला असल्यामुळे काही बियाणांच्या जाती नष्ट होत आहेत. पावसाळ्यात बांधावर आणि शेतात येणाºया पिकांची चव जिभेवर रेंगाळते. ही बियाणी शासनाने जतन करणे आवश्यक आहे, अन्यथा काळाच्या ओघात ती पडद्याआड होतील.- सात्तापा पाटील (कृषितज्ज्ञ, म्हसवे, ता. भुदरगड)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार