शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इचलकरंजीत कृष्णा योजनेच्या दुरुस्तीची मागणी वारणेच्या योजनेला विरोध कायम : दाबनलिका व पंप बदलून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:30 IST

इचलकरंजी : ‘मातीत गाडा, नाही तर तुरुंगात घाला; पण वारणेचे पाणी इचलकरंजीला देऊ देणार नाही’, अशी निर्वाणीची भूमिका वारणा बचाव कृती समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर जाहीर केली. याचा परिणाम आता वारणा नळ योजना लांबणीवर पडण्यात होणार आहे. दरम्यान, शहराला तीन दिवसांतून एक वेळ का होईना, ...

इचलकरंजी : ‘मातीत गाडा, नाही तर तुरुंगात घाला; पण वारणेचे पाणी इचलकरंजीला देऊ देणार नाही’, अशी निर्वाणीची भूमिका वारणा बचाव कृती समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर जाहीर केली. याचा परिणाम आता वारणा नळ योजना लांबणीवर पडण्यात होणार आहे. दरम्यान, शहराला तीन दिवसांतून एक वेळ का होईना, पाणी देणाºया कृष्णा नळ योजनेची दाबनलिका व पंप बदलून पाणीपुरवठा चालू ठेवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सुमारे तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असणाºया इचलकरंजी शहराला पंचगंगा व कृष्णा या दोन नळ योजनांमधून पाणीपुरवठा होतो. पंचगंगा नळ योजना ही चाळीस वर्षांपूर्वीची, तर कृष्णा नळ योजना अठरा वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे दोन्ही योजनांतून ४५ दशलक्ष लिटरऐवजी ३६ दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते. त्यामुळे तीन दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो.

स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी वारणा नदीवरून दानोळी येथून नळ पाणी योजना करावी, असा अभिप्राय जीवन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने दिला. म्हणून ६८.६८ कोटी रुपये खर्चाची वारणा योजना राबविण्याचे ठरले. जॅकवेल, पॉवर हाऊस, पंप हाऊस, आदींसाठी निघालेली ३५ कोटी रुपयांची निविदा कंत्राटदार आर. ए. घुले यांना मंजूर झाली. त्यांना वर्क आॅर्डर देऊन नऊ महिने उलटले आहेत.

अशा पार्श्वभूमीवर वारणा नदीतून पाणी उचलण्यासाठी दानोळी व वारणा नदीकाठावरील अनेक गावांनी विरोध दर्शविला आहे. यापूर्वी इचलकरंजीतील प्रांत कार्यालय, शिरोळ येथील तहसीलदार कार्यालय व कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठका झाल्या. मात्र, त्यामध्ये तोडगा निघाला नाही.

आता सोमवारी (दि.१५) झालेल्या बैठकीतसुद्धा वारणा बचाव कृती समितीचा कडवा विरोध कायम राहिला आहे. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, इचलकरंजी व वारणाकाठ या दोघांसाठी सन्माननीय तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली; पण वारणाकाठचा विरोध पाहता इचलकरंजीसाठी वारणा योजना नजीकच्या दोन वर्षात होणे अशक्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. दरम्यानच्या काळात कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेने जोरदार प्रयत्न करावेत, अशी मागणी आहे.धरणात पाणी असताना विरोध अनाकलनीयवारणा धरणात ३४.३६ टीएमसी पाणी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ९.५४ टीएमसी, शेती सिंचनासाठी १०.८१ टीएमसी व औद्योगिक वापरासाठी १.२७ टीएमसी इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ४.३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी दिले जाते. इचलकरंजीस पिण्याच्या पाण्यासाठी एक टीएमसी पाणी आरक्षित आहे.शेतीसाठी वापरात न आलेल्या पाण्याचा शिल्लक साठा ५.४६ टीएमसी आहे. त्यामुळे शेती सिंचनासाठी अद्यापही भरपूर पाणी शिल्लक आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या पाण्यातील शिल्लक असलेलेच पाणी इचलकरंजीसाठी उपसा करण्यात येणार आहे. मग, इचलकरंजीच्या पाण्यासाठी विरोध का? असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूक