शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

इचलकरंजीत कृष्णा योजनेच्या दुरुस्तीची मागणी वारणेच्या योजनेला विरोध कायम : दाबनलिका व पंप बदलून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:30 IST

इचलकरंजी : ‘मातीत गाडा, नाही तर तुरुंगात घाला; पण वारणेचे पाणी इचलकरंजीला देऊ देणार नाही’, अशी निर्वाणीची भूमिका वारणा बचाव कृती समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर जाहीर केली. याचा परिणाम आता वारणा नळ योजना लांबणीवर पडण्यात होणार आहे. दरम्यान, शहराला तीन दिवसांतून एक वेळ का होईना, ...

इचलकरंजी : ‘मातीत गाडा, नाही तर तुरुंगात घाला; पण वारणेचे पाणी इचलकरंजीला देऊ देणार नाही’, अशी निर्वाणीची भूमिका वारणा बचाव कृती समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर जाहीर केली. याचा परिणाम आता वारणा नळ योजना लांबणीवर पडण्यात होणार आहे. दरम्यान, शहराला तीन दिवसांतून एक वेळ का होईना, पाणी देणाºया कृष्णा नळ योजनेची दाबनलिका व पंप बदलून पाणीपुरवठा चालू ठेवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सुमारे तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असणाºया इचलकरंजी शहराला पंचगंगा व कृष्णा या दोन नळ योजनांमधून पाणीपुरवठा होतो. पंचगंगा नळ योजना ही चाळीस वर्षांपूर्वीची, तर कृष्णा नळ योजना अठरा वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे दोन्ही योजनांतून ४५ दशलक्ष लिटरऐवजी ३६ दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते. त्यामुळे तीन दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो.

स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी वारणा नदीवरून दानोळी येथून नळ पाणी योजना करावी, असा अभिप्राय जीवन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने दिला. म्हणून ६८.६८ कोटी रुपये खर्चाची वारणा योजना राबविण्याचे ठरले. जॅकवेल, पॉवर हाऊस, पंप हाऊस, आदींसाठी निघालेली ३५ कोटी रुपयांची निविदा कंत्राटदार आर. ए. घुले यांना मंजूर झाली. त्यांना वर्क आॅर्डर देऊन नऊ महिने उलटले आहेत.

अशा पार्श्वभूमीवर वारणा नदीतून पाणी उचलण्यासाठी दानोळी व वारणा नदीकाठावरील अनेक गावांनी विरोध दर्शविला आहे. यापूर्वी इचलकरंजीतील प्रांत कार्यालय, शिरोळ येथील तहसीलदार कार्यालय व कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठका झाल्या. मात्र, त्यामध्ये तोडगा निघाला नाही.

आता सोमवारी (दि.१५) झालेल्या बैठकीतसुद्धा वारणा बचाव कृती समितीचा कडवा विरोध कायम राहिला आहे. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, इचलकरंजी व वारणाकाठ या दोघांसाठी सन्माननीय तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली; पण वारणाकाठचा विरोध पाहता इचलकरंजीसाठी वारणा योजना नजीकच्या दोन वर्षात होणे अशक्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. दरम्यानच्या काळात कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेने जोरदार प्रयत्न करावेत, अशी मागणी आहे.धरणात पाणी असताना विरोध अनाकलनीयवारणा धरणात ३४.३६ टीएमसी पाणी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ९.५४ टीएमसी, शेती सिंचनासाठी १०.८१ टीएमसी व औद्योगिक वापरासाठी १.२७ टीएमसी इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ४.३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी दिले जाते. इचलकरंजीस पिण्याच्या पाण्यासाठी एक टीएमसी पाणी आरक्षित आहे.शेतीसाठी वापरात न आलेल्या पाण्याचा शिल्लक साठा ५.४६ टीएमसी आहे. त्यामुळे शेती सिंचनासाठी अद्यापही भरपूर पाणी शिल्लक आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या पाण्यातील शिल्लक असलेलेच पाणी इचलकरंजीसाठी उपसा करण्यात येणार आहे. मग, इचलकरंजीच्या पाण्यासाठी विरोध का? असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूक