शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत कृष्णा योजनेच्या दुरुस्तीची मागणी वारणेच्या योजनेला विरोध कायम : दाबनलिका व पंप बदलून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:30 IST

इचलकरंजी : ‘मातीत गाडा, नाही तर तुरुंगात घाला; पण वारणेचे पाणी इचलकरंजीला देऊ देणार नाही’, अशी निर्वाणीची भूमिका वारणा बचाव कृती समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर जाहीर केली. याचा परिणाम आता वारणा नळ योजना लांबणीवर पडण्यात होणार आहे. दरम्यान, शहराला तीन दिवसांतून एक वेळ का होईना, ...

इचलकरंजी : ‘मातीत गाडा, नाही तर तुरुंगात घाला; पण वारणेचे पाणी इचलकरंजीला देऊ देणार नाही’, अशी निर्वाणीची भूमिका वारणा बचाव कृती समितीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर जाहीर केली. याचा परिणाम आता वारणा नळ योजना लांबणीवर पडण्यात होणार आहे. दरम्यान, शहराला तीन दिवसांतून एक वेळ का होईना, पाणी देणाºया कृष्णा नळ योजनेची दाबनलिका व पंप बदलून पाणीपुरवठा चालू ठेवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सुमारे तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असणाºया इचलकरंजी शहराला पंचगंगा व कृष्णा या दोन नळ योजनांमधून पाणीपुरवठा होतो. पंचगंगा नळ योजना ही चाळीस वर्षांपूर्वीची, तर कृष्णा नळ योजना अठरा वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे दोन्ही योजनांतून ४५ दशलक्ष लिटरऐवजी ३६ दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते. त्यामुळे तीन दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो.

स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी वारणा नदीवरून दानोळी येथून नळ पाणी योजना करावी, असा अभिप्राय जीवन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने दिला. म्हणून ६८.६८ कोटी रुपये खर्चाची वारणा योजना राबविण्याचे ठरले. जॅकवेल, पॉवर हाऊस, पंप हाऊस, आदींसाठी निघालेली ३५ कोटी रुपयांची निविदा कंत्राटदार आर. ए. घुले यांना मंजूर झाली. त्यांना वर्क आॅर्डर देऊन नऊ महिने उलटले आहेत.

अशा पार्श्वभूमीवर वारणा नदीतून पाणी उचलण्यासाठी दानोळी व वारणा नदीकाठावरील अनेक गावांनी विरोध दर्शविला आहे. यापूर्वी इचलकरंजीतील प्रांत कार्यालय, शिरोळ येथील तहसीलदार कार्यालय व कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठका झाल्या. मात्र, त्यामध्ये तोडगा निघाला नाही.

आता सोमवारी (दि.१५) झालेल्या बैठकीतसुद्धा वारणा बचाव कृती समितीचा कडवा विरोध कायम राहिला आहे. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, इचलकरंजी व वारणाकाठ या दोघांसाठी सन्माननीय तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली; पण वारणाकाठचा विरोध पाहता इचलकरंजीसाठी वारणा योजना नजीकच्या दोन वर्षात होणे अशक्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. दरम्यानच्या काळात कृष्णा योजनेची दाबनलिका व पंप बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेने जोरदार प्रयत्न करावेत, अशी मागणी आहे.धरणात पाणी असताना विरोध अनाकलनीयवारणा धरणात ३४.३६ टीएमसी पाणी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ९.५४ टीएमसी, शेती सिंचनासाठी १०.८१ टीएमसी व औद्योगिक वापरासाठी १.२७ टीएमसी इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ४.३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी दिले जाते. इचलकरंजीस पिण्याच्या पाण्यासाठी एक टीएमसी पाणी आरक्षित आहे.शेतीसाठी वापरात न आलेल्या पाण्याचा शिल्लक साठा ५.४६ टीएमसी आहे. त्यामुळे शेती सिंचनासाठी अद्यापही भरपूर पाणी शिल्लक आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या पाण्यातील शिल्लक असलेलेच पाणी इचलकरंजीसाठी उपसा करण्यात येणार आहे. मग, इचलकरंजीच्या पाण्यासाठी विरोध का? असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूक