शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:09 IST

‘सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे’, ‘तुकडीतील विद्यार्थी संख्येची अट शिथिल करा’, अशा घोषणा देत कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यावतीने तहसीलदार गुरू बिराजदार यांनी निवेदन स्वीकारले.

ठळक मुद्देकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलनसर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : ‘सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे’, ‘तुकडीतील विद्यार्थी संख्येची अट शिथिल करा’, अशा घोषणा देत कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यावतीने तहसीलदार गुरू बिराजदार यांनी निवेदन स्वीकारले.गेल्यावर्षी १२वीच्या परीक्षा बहिष्कार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाशी चर्चा करून निर्णय घेतले; परंतु घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नसल्याने महासंघाने पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन केले. प्रलंबित मागण्या आणि सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी झालेल्या सभेत संघाचे सचिव प्रा. अविनाश तळेकर, जिल्हा समन्वयक एस. बी. उमाटे यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात अध्यक्ष ए. डी. चौगले, शिवाजीराव होडगे, अशोक पाटील, ए. पी. कदम, आर. पी. टोपले, एस. आर. पाटील, आदी सहभागी झाले.

प्रलंबित मागण्या

  1. कायम विनाअनुदानित शाळांची यादी अनुदानासह जाहीर करा.
  2. सन २०११ पासून नवीन प्रस्तावीत वाढीव पदांना मंजुरी द्यावी.
  3.  नोव्हेंबर २००५ पूर्वी आणि नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
  4.  शिक्षकांची मान्यता होताच वेतन सुरू करावे.
  5.  आय. टी. विषयास अनुदान द्यावे. 

मे २०१२ नंतरच्या १४१ पदांना ‘एनओसी’मे २०१२ नंतरच्या पायाभूत पदावरील नियुक्त शिक्षकांना मान्यता द्यावी, अशी मागणी संघातर्फे सातत्याने केली जात आहे. त्याला प्रतिसाद देत शासनाने कोल्हापूरमधील अशा १४१ पदांबाबत शासनाने ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिली आहे; त्यामुळे या शिक्षकांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या मान्यतेची शिबिरे लवकरच होतील, अशी माहिती प्रा. उमाटे आणि तळेकर यांनी यावेळी दिली. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर