शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रश्नी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचे आश्वासन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 17:13 IST

कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. या कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास विभागाशी संबंधित प्रश्न लवकरच ...

कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. या कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास विभागाशी संबंधित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तर, वित्त विभागाशी संबंधित विषयांबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी प्रयत्न करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रश्नी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने कोल्हापुरातील बिंदू चौकात राज्यस्तरीय बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. काल, बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच संबंधित ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी ग्रामविकास विभाग सकारात्मक निर्णय घेईल, असे सांगून मंत्री मुश्रीफ म्हणाले, किमान वेतन, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून 10 टक्के कर्मचाऱ्यांची पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती, 14 व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या आधारे सफाई कर्मचाऱ्यांना मेहनताना देणे आदी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतHasan Mushrifहसन मुश्रीफ