शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

लॉकडाऊन काळातील कामगारांचा निम्मा पगार शासनाने द्यावा ; उद्योजकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 11:17 IST

त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतील एप्रिलचा निम्मा पगार देणे आम्हाला शक्य आहे. पण, उर्वरित पगार हा शासन अथवा ईएसआयसीने द्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, आदींसह उद्योजकांनी केली. त्यावर

ठळक मुद्देउद्योजकांची मागणी; परवानगी मिळालेल्या उद्योगांतील कामगारांनी कामावर जावे जिल्ह्याचे अर्थचक्र सुरू राहण्याच्या दृष्टीने उद्योजक आणि कामगारांनी विचार करावा, असे आवाहन गुरव यांनी केले.

कोल्हापूर : लॉकडाऊन कालावधीतील कामगारांचा निम्मा पगार देण्यास आम्ही तयार आहोत. उर्वरित निम्मा पगार हा राज्य शासन अथवा ‘ईएसआयसी’ने द्यावा, अशी मागणी उद्योजकांनी मंगळवारी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे केली. परवानगी मिळालेल्या आस्थापनातील कामगारांनी कामावर जावे, असे आवाहन गुरव यांनी यावेळी केले.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या (केईए) कार्यालयात उद्योजक आणि साहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांची बैठक झाली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. ‘एमआयडीसी’कडून परवानगी मिळालेल्या उद्योजकांनी कारखाने सुरू केले आहेत. ते कामगारांना कामावर बोलावीत आहेत; पण, काही कामगार कामावर येण्यास नकार देत आहेत.

अशा पद्धतीने अनुपस्थित राहणाऱ्या कामगारांच्या पगाराची काय कार्यवाही करावयाची, अशी विचारणा उद्योजकांनी यावेळी केली. मार्च महिन्याचा पगार आम्ही दिला आहे; पण, लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवहार बंद राहिल्याने आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतील एप्रिलचा निम्मा पगार देणे आम्हाला शक्य आहे. पण, उर्वरित पगार हा शासन अथवा ईएसआयसीने द्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, आदींसह उद्योजकांनी केली. त्यावर याबाबतचा निर्णय शासनपातळीवरील आहे. त्यामुळे तुमची मागणी शासनापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे साहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांनी सांगितले. यावेळी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष सचिन शिरगावकर, ‘केईए’चे अध्यक्ष अतुल आरवाडे, ‘मॅक’चे अध्यक्ष गोरख माळी, आदी उपस्थित होते.कामगारांनी मनातील भीती काढून टाकावीपरवानगी मिळालेल्या आस्थापनांतील कामगारांनी कामावर जाणे आवश्यक आहे. उद्योजकांनी बोलावूनही कामगार कामावर गेले नाहीत, तर उद्योजकांकडून त्यांची अनुपस्थिती मांडली जाईल, असे साहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांनी सांगितले. कोरोनावरील उपचार हे ‘ईएसआयसी’अंतर्गत होतात. त्यामुळे कामगारांनी मनातील भीती काढून टाकावी. त्यांनी कामावर जावे. जिल्ह्याचे अर्थचक्र सुरू राहण्याच्या दृष्टीने उद्योजक आणि कामगारांनी विचार करावा, असे आवाहन गुरव यांनी केले.

 

उद्योग सुरू झाल्यानंतरच अर्थचक्राला गती मिळणार आहे. ते लक्षात घेऊन कामगारांनी कामावर यावे. कामगारांचे पगार, त्यांच्या उपस्थितीबाबतचे प्रश्न शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर पाठपुरावा करून सोडविण्यात येतील.- चंद्रकांत जाधव, आमदार

 

 

 

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा