शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

लॉकडाऊन काळातील कामगारांचा निम्मा पगार शासनाने द्यावा ; उद्योजकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 11:17 IST

त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतील एप्रिलचा निम्मा पगार देणे आम्हाला शक्य आहे. पण, उर्वरित पगार हा शासन अथवा ईएसआयसीने द्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, आदींसह उद्योजकांनी केली. त्यावर

ठळक मुद्देउद्योजकांची मागणी; परवानगी मिळालेल्या उद्योगांतील कामगारांनी कामावर जावे जिल्ह्याचे अर्थचक्र सुरू राहण्याच्या दृष्टीने उद्योजक आणि कामगारांनी विचार करावा, असे आवाहन गुरव यांनी केले.

कोल्हापूर : लॉकडाऊन कालावधीतील कामगारांचा निम्मा पगार देण्यास आम्ही तयार आहोत. उर्वरित निम्मा पगार हा राज्य शासन अथवा ‘ईएसआयसी’ने द्यावा, अशी मागणी उद्योजकांनी मंगळवारी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे केली. परवानगी मिळालेल्या आस्थापनातील कामगारांनी कामावर जावे, असे आवाहन गुरव यांनी यावेळी केले.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या (केईए) कार्यालयात उद्योजक आणि साहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांची बैठक झाली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. ‘एमआयडीसी’कडून परवानगी मिळालेल्या उद्योजकांनी कारखाने सुरू केले आहेत. ते कामगारांना कामावर बोलावीत आहेत; पण, काही कामगार कामावर येण्यास नकार देत आहेत.

अशा पद्धतीने अनुपस्थित राहणाऱ्या कामगारांच्या पगाराची काय कार्यवाही करावयाची, अशी विचारणा उद्योजकांनी यावेळी केली. मार्च महिन्याचा पगार आम्ही दिला आहे; पण, लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवहार बंद राहिल्याने आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतील एप्रिलचा निम्मा पगार देणे आम्हाला शक्य आहे. पण, उर्वरित पगार हा शासन अथवा ईएसआयसीने द्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, आदींसह उद्योजकांनी केली. त्यावर याबाबतचा निर्णय शासनपातळीवरील आहे. त्यामुळे तुमची मागणी शासनापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे साहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांनी सांगितले. यावेळी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष सचिन शिरगावकर, ‘केईए’चे अध्यक्ष अतुल आरवाडे, ‘मॅक’चे अध्यक्ष गोरख माळी, आदी उपस्थित होते.कामगारांनी मनातील भीती काढून टाकावीपरवानगी मिळालेल्या आस्थापनांतील कामगारांनी कामावर जाणे आवश्यक आहे. उद्योजकांनी बोलावूनही कामगार कामावर गेले नाहीत, तर उद्योजकांकडून त्यांची अनुपस्थिती मांडली जाईल, असे साहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांनी सांगितले. कोरोनावरील उपचार हे ‘ईएसआयसी’अंतर्गत होतात. त्यामुळे कामगारांनी मनातील भीती काढून टाकावी. त्यांनी कामावर जावे. जिल्ह्याचे अर्थचक्र सुरू राहण्याच्या दृष्टीने उद्योजक आणि कामगारांनी विचार करावा, असे आवाहन गुरव यांनी केले.

 

उद्योग सुरू झाल्यानंतरच अर्थचक्राला गती मिळणार आहे. ते लक्षात घेऊन कामगारांनी कामावर यावे. कामगारांचे पगार, त्यांच्या उपस्थितीबाबतचे प्रश्न शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर पाठपुरावा करून सोडविण्यात येतील.- चंद्रकांत जाधव, आमदार

 

 

 

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा