शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळातील कामगारांचा निम्मा पगार शासनाने द्यावा ; उद्योजकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 11:17 IST

त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतील एप्रिलचा निम्मा पगार देणे आम्हाला शक्य आहे. पण, उर्वरित पगार हा शासन अथवा ईएसआयसीने द्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, आदींसह उद्योजकांनी केली. त्यावर

ठळक मुद्देउद्योजकांची मागणी; परवानगी मिळालेल्या उद्योगांतील कामगारांनी कामावर जावे जिल्ह्याचे अर्थचक्र सुरू राहण्याच्या दृष्टीने उद्योजक आणि कामगारांनी विचार करावा, असे आवाहन गुरव यांनी केले.

कोल्हापूर : लॉकडाऊन कालावधीतील कामगारांचा निम्मा पगार देण्यास आम्ही तयार आहोत. उर्वरित निम्मा पगार हा राज्य शासन अथवा ‘ईएसआयसी’ने द्यावा, अशी मागणी उद्योजकांनी मंगळवारी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे केली. परवानगी मिळालेल्या आस्थापनातील कामगारांनी कामावर जावे, असे आवाहन गुरव यांनी यावेळी केले.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या (केईए) कार्यालयात उद्योजक आणि साहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांची बैठक झाली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. ‘एमआयडीसी’कडून परवानगी मिळालेल्या उद्योजकांनी कारखाने सुरू केले आहेत. ते कामगारांना कामावर बोलावीत आहेत; पण, काही कामगार कामावर येण्यास नकार देत आहेत.

अशा पद्धतीने अनुपस्थित राहणाऱ्या कामगारांच्या पगाराची काय कार्यवाही करावयाची, अशी विचारणा उद्योजकांनी यावेळी केली. मार्च महिन्याचा पगार आम्ही दिला आहे; पण, लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवहार बंद राहिल्याने आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतील एप्रिलचा निम्मा पगार देणे आम्हाला शक्य आहे. पण, उर्वरित पगार हा शासन अथवा ईएसआयसीने द्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, आदींसह उद्योजकांनी केली. त्यावर याबाबतचा निर्णय शासनपातळीवरील आहे. त्यामुळे तुमची मागणी शासनापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे साहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांनी सांगितले. यावेळी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष सचिन शिरगावकर, ‘केईए’चे अध्यक्ष अतुल आरवाडे, ‘मॅक’चे अध्यक्ष गोरख माळी, आदी उपस्थित होते.कामगारांनी मनातील भीती काढून टाकावीपरवानगी मिळालेल्या आस्थापनांतील कामगारांनी कामावर जाणे आवश्यक आहे. उद्योजकांनी बोलावूनही कामगार कामावर गेले नाहीत, तर उद्योजकांकडून त्यांची अनुपस्थिती मांडली जाईल, असे साहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांनी सांगितले. कोरोनावरील उपचार हे ‘ईएसआयसी’अंतर्गत होतात. त्यामुळे कामगारांनी मनातील भीती काढून टाकावी. त्यांनी कामावर जावे. जिल्ह्याचे अर्थचक्र सुरू राहण्याच्या दृष्टीने उद्योजक आणि कामगारांनी विचार करावा, असे आवाहन गुरव यांनी केले.

 

उद्योग सुरू झाल्यानंतरच अर्थचक्राला गती मिळणार आहे. ते लक्षात घेऊन कामगारांनी कामावर यावे. कामगारांचे पगार, त्यांच्या उपस्थितीबाबतचे प्रश्न शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर पाठपुरावा करून सोडविण्यात येतील.- चंद्रकांत जाधव, आमदार

 

 

 

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा