शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मागणी १६ हजारांची, आले २४००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी गेल्या दहा दिवसांत १६ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी नियंत्रण कक्षाकडे झाली; त्यांपैकी केवळ दोन हजार ...

कोल्हापूर : कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी गेल्या दहा दिवसांत १६ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी नियंत्रण कक्षाकडे झाली; त्यांपैकी केवळ दोन हजार ४०० इंजेक्शनचा पुरवठा कोल्हापूरसाठी झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या इंजेक्शनचा तुटवडा आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, आता रोजच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हजारावर पोहोचली आहे. गंभीर रुग्णांवर रेमडेसिविर इंजेक्शनद्वारे उपचार केले जात आहेत. या इंजेक्शनचा काळाबाजार रोखून पुरवठा नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षात १३ तारखेपासून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. गेल्या १० दिवसांत या कक्षाकडे तब्बल १६ हजारांवर रेमडेसिविरची मागणी हॉस्पिटल्सनी नोंदवली आहे. मात्र या इंजेक्शनचा तुटवडाच एवढा आहे की, केवळ दोन हजार ४०० इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे.

नियंत्रण कक्षात हॉस्पिटलच्या प्रतिनिधींबरोबर रुग्णांचे नातेवाईक हेलपाटे मारत आहेत; पण इंजेक्शन केवळ हॉस्पिटलनाच पुरवण्यात येत असून त्यांच्याकडून ते रुग्णांना दिले जात आहे. चार-पाच दिवस पाठपुरावा केल्यानंतर मागणीच्या ५० टक्के इंजेक्शन एका हॉस्पिटलला मिळत आहे.

--

आत्ताच ही स्थिती; पुढे काय..?

कोरोनाचा कहर सुरू होऊन दहा-पंधरा दिवस झाले तर ही स्थिती आहे. मे महिन्यात तर परिस्थिती बिकट असेल असेच एकूण वातावरण आहे. या आणीबाणीच्या काळात गंभीर, अतिगंभीर किंवा खरंच गरज असलेल्या रुग्णांसाठी रेमडेसिविरची मागणी केली जावी अशी अपेक्षा आहे. मात्र सरसकट मागणीमुळेही कृत्रिम टंचाई होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

--

गतवर्षी पाससाठी, यंदा इंजेक्शनसाठी फोन

गेल्या वर्षीच्या तुलनेत रेमडेसिविरसाठी खूप लवकर मागणी सुरू झाली आहे. जिल्हाबंदीमुळे गेल्या वर्षी सर्वाधिक फोन व दबाव ई-पास मिळविण्यासाठी टाकला जात होता. आता त्याची जागा रेमेडेसिविरने घेतली आहे. या इंजेक्शनसाठी नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांकडे लोकप्रतिनिधींपासून ते अधिकारी, ओळखीच्या लोकांचे फोन येत आहेत.

---