शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

पुजाऱ्यांना पंधरा दिवसांत हटवा

By admin | Updated: June 22, 2017 01:20 IST

संघर्ष समितीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; मोठ्या प्रमाणात आंदोलकांची उपस्थिती

कोल्हापूर : श्री पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर मंदिरांप्रमाणे अंबाबाई मंदिरातील तथाकथित हक्कदार पुजाऱ्यांना १५ दिवसांत मंदिर प्रवेश बंदी करण्यात यावी व त्याजागी पुजाऱ्यांची ‘पगारी नोकर’ म्हणून नियुक्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन बुधवारी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना देण्यात आले. अंबाबाई भक्तांच्यावतीने सुरू असलेल्या ‘पुजारी हटाओ’ आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून बुधवारी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. आंदोलकांची संख्या मोठी असल्याने ताराराणी सभागृहात मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी आमदार सुरेश साळोखे उपस्थित होते. यावेळी विजय देवणे म्हणाले, पुजाऱ्यांचे गैरवर्तन आणि त्यांनी शाहू महाराजांचा केलेला अपमान शाहूनगरीला मान्य नाही. न्यायालयात जाऊन प्रशासनाच्या आणि मंदिराच्या कामात आडकाठी करायची, ही श्रीपूजकांची पद्धत आहे. प्रशासनानेही ‘पुजारी हटाओ’साठी प्रयत्न केले पाहिजेत. दिलीप देसाई म्हणाले, देवीला सळ्या, पट्ट्या, एमसील लावले जाते, कानसने घासून चुरा काढला जातो. सन १९९७ मध्ये सोन्याचे नेत्र गुजरीत विकले गेले. त्या गुन्ह्याबद्दल पुजाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा झाली. देणग्यांमध्ये अपहार झाले. पुजारी देवीचे सोन्याचे पाय मुंबई, पुण्याला नेतात आणि भक्तांकडून लाखो रुपये लुटून आणतात. छत्रपतींच्या वटहुुकुमाला तथाकथित म्हणतात. शंकराचार्यांचे ग्रंथ मानत नाहीत आणि या सगळ्यांवर ‘देवस्थान’चे निर्बंध नसल्याने त्यांचे फावले आहे. वसंतराव मुळीक म्हणाले, नागचिन्ह, सिंह फोडून अंबाबाईचे लक्ष्मीकरण केले जात आहे. शिवपत्नी असताना विष्णूपत्नी करण्याचा डाव केला जात आहे. याविरोधात देवस्थान व शिवाजी विद्यापीठाने पुढाकार घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणावी. जयश्री चव्हाण यांनी महिलांना देवीच्या पूजेचा अधिकार मिळावा, अशी मागणी केली. सुभाष देसाई यांनी निवेदनाचे वाचन केले. यावेळी देवस्थानचे सदस्य शिवाजी जाधव, संगीता खाडे, शरद तांबट, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, नगरसेवक जयंत पाटील, शारंगधर देशमुख, राहुल माने, लाला भोसले, राहुल चव्हाण, नगरसेविका वहिदा सौदागर, दीपा मगदूम, माधुरी लाड, माधवी गवंडी, स्वाती यवलुजे, नीलोफर आजरेकर, माजी नगरसेवक राजू लाटकर, बाबा पाटे, अ‍ॅड. चारूलता चव्हाण यांच्यासह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दबावाखाली काम करता काय? यावेळी माजी महापौर आर. के. पोवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गेले बारा दिवस आंदोलन सुरू आहे तरी तुम्ही याबाबत तातडीने बैठक घेऊन हा विषय का सोडवला नाही, तुम्ही पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत आहात का, अशी विचारणा केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुजाऱ्यांना नोटीस काढण्यात आली आहे. मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही, असे सांगितले. ‘पुजारी हटाव’ देवस्थानचा ठराव आनंद माने म्हणाले, अंबाबाईच्या गाभाऱ्यात जाण्याचा हक्क केवळ पुजाऱ्यांचा आहे अन्य कोणालाही सोडण्यात येऊ नये, या पुजाऱ्यांच्या याचिकेला निशिकांत मेथे, मी वादी झालो आणि त्याची सुनावणी आता सुरू झाली आहे. प्रधानांचा मंदिरावरील हक्क संपुष्टात आला त्याचवेळी मुनिश्वरांसह पुजाऱ्यांचा हक्कही बरखास्त व्हायला हवा होता. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या काळात देवस्थान समितीचा पुजाऱ्यांना ‘सरकारी नोकर’ मानण्याचा ठराव झाला होता त्यावर अंमलबजावणी व्हावी. निवेदनातील प्रमुख मागण्या अशा : अंबाबाईची काठापदराची साडी ही वेशभूषा कायम ठेवावी, नवरात्रामध्येही त्यात बदल करता कामा नये. ‘श्री अंबाबाई मंदिर’ असा उल्लेख शासन दरबारी कागदपत्रात, जाहीर निवेदनात, बोर्डवर करावा, तसेच रेल्वेला ‘श्री अंबाबाई एक्स्प्रेस’ असे नाव दिले जावे. व्यसनी, शासकीय कर चुकविणारे, गुन्हे दाखल असलेल्या पुजाऱ्यांना त्वरित मंदिर प्रवेशावर बंदी घालावी व चारित्र्यसंपन्न व निर्व्यसनी अशा पुजाऱ्यांची ‘पगारी नोकर’ म्हणून नियुक्ती करावी. विद्यमान पुजाऱ्यांनी आपण हक्कदार कसे ठरलो याचे पुरावे जनतेपुढे जाहीर करावेत. मंदिरात देवीला येणारे दागिने, साड्या, रोख रक्कम खजिन्यात जमा व्हावी. सध्या देवस्थानच्या पेटीत, हुंडीत रोख रक्कम दागिने अर्पण करू न देणाऱ्या पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. मूर्ती संवर्धनाची सीडी जाहीर करावी. गाभाऱ्यात शासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. ही स्त्री देवता असल्याने स्त्रियांनीच स्नान, वस्त्रालंकार यांसारखे विधी करावेत. देवीच्या नावावर मिळविलेल्या करोडो रुपयांचा हिशेब विद्यमान पुजाऱ्यांनी द्यावा. त्याचा विनियोग समाजकार्य, तीर्थक्षेत्र आराखडा विकासासाठी व्हावा.