शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी हटवा  : बिद्रे-गोरे कुटूंबियांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:42 IST

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुन प्रकरणातील तपास अधिकारी अजय कदम यांना हटवावे. त्याठिकाणी पूर्वीच्या तपास अधिकारी संगिता अल्फान्सो यांची खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे केल्याची माहिती शुक्रवारी आनंद बिद्रे व राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी हटवा संगिता अल्फान्सो यांची कायमस्वरुपी नियुक्त करा : बिद्रे-गोरे कुटूंबियांची माहिती

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुन प्रकरणातील तपास अधिकारी अजय कदम यांना हटवावे. त्याठिकाणी पूर्वीच्या तपास अधिकारी संगिता अल्फान्सो यांची खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे केल्याची माहिती शुक्रवारी आनंद बिद्रे व राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सहायक पोलीस निरीक्षक बिद्रे यांचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील आणि कुरुंदकरचा मित्र फळणीकर, कारचालक अशा चौघांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या अजय कदम करीत आहेत. त्यांना सरकारी वकीलांनी माहिती देण्यासाठी बोलविले असता गुन्ह्यामध्ये मृतदेह मिळालेला नाही.

पुरावे भक्कम नाहीत, त्यामुळे तुम्ही ही केस घेवू नका. बिद्रेच्या मृत्यच्या दाखल्याचा अहवाल महानगरपालिकेकडे देण्यासाठी नकार दिला आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे मी ३०२ खूनाचा गुन्हा दाखल असलेबाबतचा स्पष्ट अहवाल देणार नाही असे सांगितले. कुरुंदकरच्या घरामध्ये व अश्विनी बिद्रे यांच्या फलॅटमध्ये मिळालेल्या वस्तु देण्याचे आदेश झाले असताना त्या पूर्णत: दिलेल्या नाहीत. कदम यांचे संशयित करुंदकरचा भाऊ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांचे घनिष्ठ संबध आहेत. त्यामुळे सर्वोच न्यायालयाकडे अभय कुरुंदकर याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याठिकाणीसुध्दा सरकारी वकीलांना चुकीचा माहिती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संशयिताला जामीन होवू शकतो.

बिद्रे यांच्या खूनाचा तपास तांत्रिकबाबीवर आहे. त्याचे ज्ञान कदम यांना नसल्याने ते जाहीरपणे आरोपी सुटतील अशी भाषा करीत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्याला या तपासावरुन हटवावे, अशी मागणी शासनाला आम्ही केली असल्याचे बिद्रे-गोरे कुटूंबियांनी सांगितले.बिद्रे हत्यांकाडाचा निकाल हा अलिबाग (रायगड) सत्र न्यायालयाने एक वर्षांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नियमित सुनावणीसाठी, सरकारी वकीलांसह साक्षीदारांना माहिती करण्यासाठी या हत्येचा तपास संगिता अल्फान्सो यांचेकडे द्यावे. खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांचेकडेच राहावा, अशी मागणी केल्याचे बिद्रे-गोरे कुटूंबियांनी पत्रकारांना सांगितले.अश्विनी बिद्रे हत्या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी बिद्रे-गोरे कुटूंबियांनी शासनाकडे केली होती. परंतू निकम हे मूळचे जळगावचे आहेत. या गुन्ह्यातील दोन नंबरचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजेश पाटील हा खडसे यांचा भाचा आहे. ते जळगावचे आहेत.

निकम यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजिवकुमार यांना सांगितले की, पोलीसांच्या विरोधामध्ये आजपर्यंत मी लढलो नाही. त्यामुळे हा खटला मी घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे निकम हे या खटल्याचे वकील म्हणून आम्हाला नको आहेत. दूसऱ्या वकीलांचे नाव आम्ही दिले असल्याचे आनंद बिद्रे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणkolhapurकोल्हापूर