शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी हटवा  : बिद्रे-गोरे कुटूंबियांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:42 IST

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुन प्रकरणातील तपास अधिकारी अजय कदम यांना हटवावे. त्याठिकाणी पूर्वीच्या तपास अधिकारी संगिता अल्फान्सो यांची खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे केल्याची माहिती शुक्रवारी आनंद बिद्रे व राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी हटवा संगिता अल्फान्सो यांची कायमस्वरुपी नियुक्त करा : बिद्रे-गोरे कुटूंबियांची माहिती

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुन प्रकरणातील तपास अधिकारी अजय कदम यांना हटवावे. त्याठिकाणी पूर्वीच्या तपास अधिकारी संगिता अल्फान्सो यांची खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे केल्याची माहिती शुक्रवारी आनंद बिद्रे व राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सहायक पोलीस निरीक्षक बिद्रे यांचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील आणि कुरुंदकरचा मित्र फळणीकर, कारचालक अशा चौघांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या अजय कदम करीत आहेत. त्यांना सरकारी वकीलांनी माहिती देण्यासाठी बोलविले असता गुन्ह्यामध्ये मृतदेह मिळालेला नाही.

पुरावे भक्कम नाहीत, त्यामुळे तुम्ही ही केस घेवू नका. बिद्रेच्या मृत्यच्या दाखल्याचा अहवाल महानगरपालिकेकडे देण्यासाठी नकार दिला आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे मी ३०२ खूनाचा गुन्हा दाखल असलेबाबतचा स्पष्ट अहवाल देणार नाही असे सांगितले. कुरुंदकरच्या घरामध्ये व अश्विनी बिद्रे यांच्या फलॅटमध्ये मिळालेल्या वस्तु देण्याचे आदेश झाले असताना त्या पूर्णत: दिलेल्या नाहीत. कदम यांचे संशयित करुंदकरचा भाऊ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांचे घनिष्ठ संबध आहेत. त्यामुळे सर्वोच न्यायालयाकडे अभय कुरुंदकर याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याठिकाणीसुध्दा सरकारी वकीलांना चुकीचा माहिती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संशयिताला जामीन होवू शकतो.

बिद्रे यांच्या खूनाचा तपास तांत्रिकबाबीवर आहे. त्याचे ज्ञान कदम यांना नसल्याने ते जाहीरपणे आरोपी सुटतील अशी भाषा करीत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्याला या तपासावरुन हटवावे, अशी मागणी शासनाला आम्ही केली असल्याचे बिद्रे-गोरे कुटूंबियांनी सांगितले.बिद्रे हत्यांकाडाचा निकाल हा अलिबाग (रायगड) सत्र न्यायालयाने एक वर्षांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नियमित सुनावणीसाठी, सरकारी वकीलांसह साक्षीदारांना माहिती करण्यासाठी या हत्येचा तपास संगिता अल्फान्सो यांचेकडे द्यावे. खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांचेकडेच राहावा, अशी मागणी केल्याचे बिद्रे-गोरे कुटूंबियांनी पत्रकारांना सांगितले.अश्विनी बिद्रे हत्या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी बिद्रे-गोरे कुटूंबियांनी शासनाकडे केली होती. परंतू निकम हे मूळचे जळगावचे आहेत. या गुन्ह्यातील दोन नंबरचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजेश पाटील हा खडसे यांचा भाचा आहे. ते जळगावचे आहेत.

निकम यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजिवकुमार यांना सांगितले की, पोलीसांच्या विरोधामध्ये आजपर्यंत मी लढलो नाही. त्यामुळे हा खटला मी घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे निकम हे या खटल्याचे वकील म्हणून आम्हाला नको आहेत. दूसऱ्या वकीलांचे नाव आम्ही दिले असल्याचे आनंद बिद्रे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणkolhapurकोल्हापूर