शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कायमचा महापूर हटवा; अन्यथा पूरग्रस्तांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST

* पुराचा धोका टाळण्यासाठी शासनाला उपाययोजना सुचविणार शिरोळ : महापूर हा मानवनिर्मित आहे. महापुरामुळे शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेचे ...

* पुराचा धोका टाळण्यासाठी शासनाला उपाययोजना सुचविणार

शिरोळ : महापूर हा मानवनिर्मित आहे. महापुरामुळे शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेचे जे नुकसान झाले याला राज्य व केंद्र सरकार जबाबदार असून, शिरोळ तालुक्यातून कायमचा महापूर हटविण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजना न झाल्यास येत्या पंधरा दिवसांनंतर तालुक्यातील जनता अन्नत्याग करणार आहे. कुरुंदवाड येथे होणाऱ्या या आंदोलनात जनावरांसह हजारो पूरग्रस्त कुटुंबे सहभागी होतील, असा इशारा ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी येथे दिला.

डॉ. मुळीक म्हणाले, महापुरामुळे शिरोळ तालुक्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या महापुराला सरकारच जबाबदार आहे. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत भौगोलिक अभ्यास होणे गरजेचे आहे. येथील पूरग्रस्त घर, शेतजमीन कधीही सोडणार नाहीत. नव्याने वाढलेली रस्त्यांची उंची हादेखील प्रश्न गंभीर आहे. नैसर्गिक पद्धतीचे ओढे, नाले खुले करण्यात येऊन पाण्याच्या प्रवाहामधील नैसर्गिक स्रोत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. कोयना धरणातील गाळदेखील काढण्यात यावा. यासह तांत्रिक व अभ्यासपूर्ण माहिती केंद्र व राज्य सरकारला पाठविणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, पूरबाधित गावातील नागरिकांना शंभर टक्के मदत मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे.

यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, धनाजीराव जगदाळे, महादेव धनवडे, पृथ्वीराज यादव, धनाजी चुडमुंगे, अमरसिंह पाटील, पिंटू फल्ले, बाबासाहेब सावगावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.