शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला हरवणे हेच पहिले टार्गेट - डी राजा 

By विश्वास पाटील | Updated: February 21, 2024 16:04 IST

मोदींना वाटते की लोकांचा विचार हायजॅक करता येतो

कोल्हापूर : भाजप देशासाठी विनाशकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. देश आर्थिक संकटात सापडला आहे. तरीही भाजप आरएसएसच्या आदेशानुसार काम करीत आहे. त्यांची विचारधारा जात, धर्म, प्रदेशामध्ये फूट पाडणारी आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार डी. राजा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले, देशात हुकूमशाही वाढते आहे. आपण आपले स्वातंत्र्य गमावत जात आहे. मोदी पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा करीत आहे. मात्र, ते पराभूत होऊ शकतात. आम्ही इंडिया आघाडीसोबत आहे. जागा वाटपात आम्हालाही स्थान द्यावे, अशी मागणी केली आहे. भाजप हटाव, देश बचावसाठी आम्ही एकत्रपणे लढणार आहोत. राष्ट्रीय स्तरावर प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. आघाडीसोबत येण्यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. भाजपला पराभूत करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवून नियोजन केले आहे.भाजपला हुकूमशाही शासन हवे आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे असंविज्ञानिक असल्याचे घोषित केले आहेत. यामध्ये पारदर्शकता नव्हती.निवडणूक आयोगाच्या कामकाजावरच शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएम यंत्रावर शंका उपस्थित केली जात आहे. सर्व मतांची व्हीव्हीपॅटवरून मतमोजणी करावी, अशी आमची मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोदी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. देशात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. भूकबळी वाढत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगाराचे प्रश्न गंभीर बनले आहेत.

वन नेशन वन निवडणूक विरोधातडी राजा म्हणाले, वन नेशन वन निवडणूक संविधान संघ राज्याच्या विरोधात आहे. ते अव्यवहार्य आहे. संसदीय व्यवस्था रद्द करणे हे भयंकर आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया