शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

जलयुक्त चौकशीचा निर्णय केवळ राजकीय सूडबुध्दीने, कोणाचाही बाप काढलेला नाही : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 15:22 IST

chandrkant patil, bjp, kolhapur, राज्यात जलयुक्त शिवारमधून ६ लाख ४१ हजार ५६० कामे झाली. त्यातील केवळ ११२८ म्हणजे ०.१७ टक्के कामे तपासून कॅगने ही योजना अव्यवहार्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यासाठी केवळ शासनाचा पैसा खर्च झाला नाही. प्रचंड लोकसहभाग यामध्ये होता. अनेक गावच्या पाणीपातळीत वाढ झाली. अनेक जिल्ह्यातील टँकर कमी झाले. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांच्या चौकशीचा निर्णय केवळ आणि केवळ राजकीय सूडबुध्दीने घेतला असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देजलयुक्त चौकशीचा निर्णय केवळ राजकीय सूडबुध्दीने  : चंद्रकांत पाटील कोणाचाही बाप मी काढलेला नाही. ती आमची संस्कृती नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्यात जलयुक्त शिवारमधून ६ लाख ४१ हजार ५६० कामे झाली. त्यातील केवळ ११२८ म्हणजे ०.१७ टक्के कामे तपासून कॅगने ही योजना अव्यवहार्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यासाठी केवळ शासनाचा पैसा खर्च झाला नाही. प्रचंड लोकसहभाग यामध्ये होता. अनेक गावच्या पाणीपातळीत वाढ झाली. अनेक जिल्ह्यातील टँकर कमी झाले. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांच्या चौकशीचा निर्णय केवळ आणि केवळ राजकीय सूडबुध्दीने घेतला असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.विविध प्रश्नांवर भूमिका मांडण्यासाठी पाटील यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, सरकार तीन पक्षांचे आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांनी चौकशी करून जिथे चुकीचे काम झाले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. मेट्रोच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय अतिशय अव्यवहार्य असून साडे चार वर्षे हा प्रकल्प रखडणार असून त्याचा मोठा आर्थिक फटका हा प्रवाशांना बसणार आहे.मराठी भाषेतील शब्द अनेकांना कळत नाहीत. कोणाचाही बाप मी काढलेला नाही. ती आमची संस्कृती नाही. आम्हीही तुमचे बाप आहोत याचा मराठीत होणारा अर्थ कळत नसेल तर मी काय करणार आणि नरेंद्र मोदी यांचे म्हणाल तर १३० कोटी जनता आहे त्यांना बाप म्हणायला. विद्यार्थ्यांची सध्या मानसिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१२१ असे शैक्षणिक वर्ष जाहीर करून ही कोंडी फोडावी.एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाही. सध्याच त्यांच्याशी माझे दोन वेळा बोलणे झाले. आहे. खडसे असो किंवा देवेंद्र फडणवीस हे दोघेही मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा एकत्र बसू तेव्हा यातून नक्की मार्ग निघेल असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूरBJPभाजपा