शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जलयुक्त चौकशीचा निर्णय केवळ राजकीय सूडबुध्दीने, कोणाचाही बाप काढलेला नाही : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 15:22 IST

chandrkant patil, bjp, kolhapur, राज्यात जलयुक्त शिवारमधून ६ लाख ४१ हजार ५६० कामे झाली. त्यातील केवळ ११२८ म्हणजे ०.१७ टक्के कामे तपासून कॅगने ही योजना अव्यवहार्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यासाठी केवळ शासनाचा पैसा खर्च झाला नाही. प्रचंड लोकसहभाग यामध्ये होता. अनेक गावच्या पाणीपातळीत वाढ झाली. अनेक जिल्ह्यातील टँकर कमी झाले. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांच्या चौकशीचा निर्णय केवळ आणि केवळ राजकीय सूडबुध्दीने घेतला असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देजलयुक्त चौकशीचा निर्णय केवळ राजकीय सूडबुध्दीने  : चंद्रकांत पाटील कोणाचाही बाप मी काढलेला नाही. ती आमची संस्कृती नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्यात जलयुक्त शिवारमधून ६ लाख ४१ हजार ५६० कामे झाली. त्यातील केवळ ११२८ म्हणजे ०.१७ टक्के कामे तपासून कॅगने ही योजना अव्यवहार्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यासाठी केवळ शासनाचा पैसा खर्च झाला नाही. प्रचंड लोकसहभाग यामध्ये होता. अनेक गावच्या पाणीपातळीत वाढ झाली. अनेक जिल्ह्यातील टँकर कमी झाले. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांच्या चौकशीचा निर्णय केवळ आणि केवळ राजकीय सूडबुध्दीने घेतला असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.विविध प्रश्नांवर भूमिका मांडण्यासाठी पाटील यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, सरकार तीन पक्षांचे आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांनी चौकशी करून जिथे चुकीचे काम झाले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. मेट्रोच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय अतिशय अव्यवहार्य असून साडे चार वर्षे हा प्रकल्प रखडणार असून त्याचा मोठा आर्थिक फटका हा प्रवाशांना बसणार आहे.मराठी भाषेतील शब्द अनेकांना कळत नाहीत. कोणाचाही बाप मी काढलेला नाही. ती आमची संस्कृती नाही. आम्हीही तुमचे बाप आहोत याचा मराठीत होणारा अर्थ कळत नसेल तर मी काय करणार आणि नरेंद्र मोदी यांचे म्हणाल तर १३० कोटी जनता आहे त्यांना बाप म्हणायला. विद्यार्थ्यांची सध्या मानसिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१२१ असे शैक्षणिक वर्ष जाहीर करून ही कोंडी फोडावी.एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाही. सध्याच त्यांच्याशी माझे दोन वेळा बोलणे झाले. आहे. खडसे असो किंवा देवेंद्र फडणवीस हे दोघेही मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा एकत्र बसू तेव्हा यातून नक्की मार्ग निघेल असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूरBJPभाजपा