शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शिरोली-उचगांव उड्डाण पूलादरम्यान रस्त्याची उंची वाढवण्यासाठी डिसेंबरअखेर प्रस्ताव

By संदीप आडनाईक | Updated: December 8, 2023 19:12 IST

नागरी कृती समितीची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

कोल्हापूर : शिरोली ते उचगांव उड्डाण पूलादरम्यान पिलर उभारुनच रस्त्याची उंची वाढवावी तसेच पूर्वीच्या रस्त्यासाठी घातलेला भराव काढून पुराचे पाणी वाहून जाण्यास मार्ग मोकळा करुन दयावा, अशी मागणीराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदारकर यांच्याकडे शुक्रवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. यासंदर्भात म्हणणे ऐकून घेउन या प्रकल्पाच्या कामाचे सर्वेक्षण करुन नियमावलीनुसार पुर्नअंदाजपत्रक तयार करण्याचा प्रस्ताव ३१ डिसेंबरपर्यंत पाठवण्याचे आश्वासन पंदारकर यांनी आंदोलकांना दिले.दरम्यान, केंद्रीय परिवहन व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी भराव न टाकता पिलर उभारुनच उंची वाढविण्याचे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना प्राधिकरणाला दिले आहे. त्याची पुर्तता करुन या महामार्ग विस्तारीकरण कामाचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणीही कृती समितीने केली आहे. उजळाईवाडी येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात प्रकल्प संचालक पंदरकर यांची शुक्रवारी कृती समितीने भेट घेउन चर्चा केली.कोल्हापूरात राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण काम सुरु आहे. शिरोली ते पंचगंगा पूल आणि तावडे हॉटेल ते उचगांव रेल्वे उड्डाण पूल या अडीच हजार मीटर मार्गावर भराव टाकून महामार्गाची उंची वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वी भराव टाकून उंची वाढवून बांधलेल्या महामार्गाच्या भरावाच्या अडथळ्यामुळे महापूरात शहर व छोटी छोटी गावे पाण्यात बुडतात. आणखी भराव टाकल्यास पूराचा फटका बसून कोल्हापूर कायमपणे पाण्यात जाईल. महामार्गाचा आराखडा न करता घाईगडबडीने काम सुरु केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या कामावर जनता लक्ष ठेवणार आहे. चुकीचे कामकाज झाल्यास रस्त्यावर उतरुन जनआंदोलन करण्याचा इशाराही नागरी कृती समितीने दिला आहे.या आंदोलनात अशोक पोवार, रमेश मोरे, उजळाईवाडी येथील राजू माने, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, चंद्रकांत सूर्यवंशी, विनय कदम, प्रकाश आमटे, प्रसाद बुलबुले, राजाभाऊ मालेकर, तानाजी चव्हाण. उजळाईवाडीचे ग्रामपंचायत सदस्य विलास कुंभार, प्रकाश सुर्यवंशी, नायकू बागणे, रंजीत पवार, महादेव जाधव, अमृत शिंदे, इंजिनिअर महेश जाधव, कादरभाई मलबारी, रफिक मुल्ला आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूक