शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोल्हापूर: ..अन् आजऱ्यातील आवंडीपैकी धनगरवाड्यातील आठ देशी गाईंचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 19:03 IST

गाईंच्या अचानक मृत्यूमुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे.

आजरा : आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाड्यातील आठ पाळीव देशी गाईंचा अचानक मृत्यू झाला. गाईंच्या अचानक मृत्यूमुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान उद्या सकाळी पशुवैद्यकीय विभागाचे पथक आवंडी धनगरवाड्याला भेट देणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. पुरुषोत्तम ढेकळे यांनी दिली आहे.आवंडी धनगरवाड्यावर प्रत्येक शेतकऱ्यांची २० ते २५ पाळीव गाई असून या धनगरवाड्यावर जवळपास २०० ते २३० गाईंचे पालनपोषण केले जाते. त्यांना जंगलामध्ये चरण्यासाठी सोडले जाते. कालपासून या ठिकाणच्या गाई चरण्यासाठी सोडलेल्या ठिकाणी व रात्री बांधलेल्या ठिकाणी आठ गाई मृतावस्थेत आढळून आल्या. अचानक घडलेल्या घटनेमुळे या ठिकाणचे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली.चालू वर्षी पाऊस नाही व चाऱ्याची उगवणही झालेली नाही. त्यातच उन्हाळ्यातही चाऱ्याची टंचाई. त्यामुळे जंगल परिसरात उगविलेल्या बकऱ्या वनस्पतीचे सेवन या गाईने केल्यामुळे मृत्यू ओढवला आहे असा प्राथमिक अंदाज पशुधन पर्यवेक्षक डॉ. आनंद पाटील यांनी व्यक्त केला आहे.फऱ्या रोगाचे लसीकरणआवंडी धनगरवाड्यावरील सर्व जनावरांचे ३० मे रोजी फऱ्या रोगाचे लसीकरण केले आहे. हे लसीकरण वर्षातून दोन वेळा केले जाते. मात्र बकऱ्या वनस्पतीचे सेवन केल्यामुळे अचानक जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. उद्या शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आवंडी धनगरवाड्याला भेट देणार आहे अशीही माहिती डॉ. पुरुषोत्तम ढेकळे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर