शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

दिल्लीत किसान मोर्चाला गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:58 IST

दिल्लीत किसान मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. किरण गौरवाडे (वय ५२) हे टाकळीवाडी ता. शिरोळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली, पण पहाटे तीन वाजता सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देदिल्लीत किसान मोर्चाला गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा मृत्यूगौरवाडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते

कोल्हापूर: दिल्लीत किसान मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. किरण गौरवाडे (वय ५२) हे टाकळीवाडी ता. शिरोळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली, पण पहाटे तीन वाजता सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.यासंदर्भात दिल्लीत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी, दिल्लीत देशभरातील १८0 शेतकरी संघटनांनी शुक्रवारी संसद घेराओ मोर्चा काढला. या मोर्चात कोल्हापुरातून विशेष रेल्वेने शेतकरी गेले होते. त्यांची राहण्याची सोय आंबेडकरभवन येथे करण्यात आली होती.

येथे ५00 ते ६00 शेतकरी वास्तव्यास होते. मोर्चानंतर सर्व शेतकरी झोपे गेले होते. अकराच्या सुमारास किरण गौरवाडे बाहेर आले. गॅलरीमध्ये तंबाखू खाउन थुकत असताना त्यांचा तोल जाउन चौथ्या मजल्याने ते खाली कोसळले. सर्व शेतकरी झोपी गेल्याने याची कुणालाच कांही कल्पना आली नाही.पहाटे तीनच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने सर्व शेतकऱ्याना याची कल्पना दिली. डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर तातडीने पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

ही घटना समजल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांनी धाव घेउन सर्व माहिती घेतली. श्रध्दांजली वाहिल्यानंतर दुपारी विशेष विमानाने प्रेत शिरोळकडे रवाना करण्यात आले. गौरवाडे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक  मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.

 

 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर