शहरं
Join us  
Trending Stories
1
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
2
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
3
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
4
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
5
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
6
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
7
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
8
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
9
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
12
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
13
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
14
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
15
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
18
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
19
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
20
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीचा अर्ज भरण्यास ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:42 IST

नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी अद्याप शाखा आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम दिलेले नाहीत. त्यामुळे कोल्हापूर शहरातील इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ३० ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रक बदल झाला आहे.

ठळक मुद्देअद्याप चार हजार विद्यार्थ्यांनी भरले नाहीत प्राधान्यक्रम केंद्रीय प्रवेश समितीचा निर्णय

कोल्हापूर : नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी अद्याप शाखा आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम दिलेले नाहीत. त्यामुळे कोल्हापूर शहरातील इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ३० ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रक बदल झाला आहे.

शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अर्जाचा दुसरा भाग भरण्याची मुदत रविवार (दि. २३) पर्यंत होती. मात्र, कोरोना, संभाव्य महापूरजन्य परिस्थितीमुळे अद्याप सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी भाग दोनमधील शाखा आणि महाविद्यालयांचे प्राधान्य क्रम दिलेला नाही.

त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी प्रवेश समितीने अर्जाचा भाग एक आणि दोन भरण्याची मुदत दि. ३० ऑगस्टपर्यंत वाढविली आहे, अशी माहिती समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचेज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जातील भाग एकमध्ये नोंदणी केली आहे, त्यांनी भाग दोनसाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क भरावे लागणार नाही. ज्यांनी भाग दोन भरला आहे. त्यांनी ते पुन्हा भरण्याची गरज नाही.बदललेले वेळापत्रक१) अर्जाचा दुसरा भाग भरण्याची मुदत : ३० ऑगस्ट२) निवड यादी तयार करणे : ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर३) निवड यादीची प्रसिद्धी : ५ सप्टेंबर४) तक्रार निराकारणाची मुदत : ६ ते ८ सप्टेंबर५) निवड यादीनुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे : ७ ते १२ सप्टेंबरशुक्रवारपर्यंतची अर्जांची आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • कला (इंग्रजी माध्यम) : ७४
  • कला (मराठी) : १३६०
  • वाणिज्य (मराठी) : १९८०
  • वाणिज्य (इंग्रजी) : १६२०
  • विज्ञान : ५९२०

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर