शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

गाळ, पाणी बाहेर काढण्यात दिवस सरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागातील पाणी ओसरल्यानंतर घराकडे तसेच दुकानाकडे धाव घेतलेल्या नागरिकांचा सोमवारचा दिवस गाळ उपसण्यात आणि ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागातील पाणी ओसरल्यानंतर घराकडे तसेच दुकानाकडे धाव घेतलेल्या नागरिकांचा सोमवारचा दिवस गाळ उपसण्यात आणि पाणी बाहेर ढकलण्यातच सरला. सलग तीन वर्षे संकटात असलेल्या पूरग्रस्त शहरवासीयांना आपल्या घरातील प्रापंचिक साहित्य तसेच दुकानातील विक्रीच्या साहित्याचे झालेले नुकसान पाहून गहिवरुन आले.

अवघ्या तीन दिवसात प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पंचगंगा नदीला महापूर आला. एका रात्रीत नदीने धोक्याची पातळी गाठली. तीन दिवसात इतके पाणी येईल याचा कोणालाच अंदाच आला नव्हता. त्यामुळे अनेक नागरिकांना तसेच शहरातील दुकानदार, व्यावसायिकांना आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविता आले नाही. अनेक कुटुंबे तर कपडे आणि अत्यावश्यक साहित्यासह घराबाहेर पडले.

महापुराचे पाणी ओसरल्यानंतर सोमवारी सकाळी निवाराकेंद्रातून वास्तव्यास असलेल्या पूरग्रस्तांनी आपापल्या घराकडे, दुकानाकडे धाव घेतली. महापुराने झालेले प्रापंचिक साहित्य, धान्य, कपडे यांचे झालेले नुकसान पाहून अनेकांची मने हेलावून गेली. अगदी हताश झालेल्या मानाने त्यांनी आपल्या घरातील स्वच्छता मोहीम सुरू केली. अख्खे कुटुंब घरातील गाळ व साचलेले पाणी बाहेर काढत होते. पाण्यात खराब झालेले साहित्य रस्त्यावर आणून टाकत होते. अनेक दुकानदारांनी स्वत: तसेच कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली.

शहरातील अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये महापुराचे पाणी शिरले असून बारा ते पंधरा फूट साचलेले पाणी उपसण्यासाठी मोटारी लावण्यात आलेल्या आहेत. दिवसभर शहरात हे चित्र पहायला मिळाले. पूरग्रस्तांना सावरण्यासाठी पुढील काही दिवस लागणार आहेत.

-महापालिकेमार्फत स्वच्छता-

महापालिका प्रशासनाने पूरग्रस्त भागात सोमवारी तातडीने स्वच्छता मोहीम, औषध फवारणी हाती घेण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुध्दा आपल्या वाहनातून पाण्याच्या फवाऱ्याद्वारे प्रमुख रस्त्यावर साचलेला गाळ बाजूला केला जात होता. शहरात बऱ्याच ठिकाणी असा गाळ साचला आहे.