शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

दत्त दालमियाचे ११ लाखांचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले- पोर्ले येथील दत्त दालमिया साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे ...

पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले- पोर्ले येथील दत्त दालमिया साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून कारखान्याच्या इतिहासात गाळपाचा उच्चांक गाठला. कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाला आल्याने उद्दिष्टापेक्षा जादा लाखांचा टप्पा पार करता आला. यंदा कार्यक्षेत्रातील ऊसपुरवठ्यात पंचवीस टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रती असलेल्या धोरणात्मक निर्णयाचे व ऊस बिलाबाबत विश्वासार्हतेचे हे फलित आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून दालमिया कारखान्याला ऊसपुरवठा करण्यात शेतकरी प्राधान्य देत आहेत. यावर्षी सातारा आणि सांगली जिल्ह्यांतूनदेखील मोठ्या प्रमाणात ऊस आणून गाळपाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडता आला. दोन-तीन लाख मेट्रिक टनाची उपल्बधता असलेला कारखाना यापूर्वी मकरसंक्रांतीला दीड-दोन लाख टन गाळप करून बंद पडायचा. कंपनीच्या धोरणात्मक निर्णयांमुळे दालमिया कंपनीने ऊस उचलण्यासाठी शेतकरी वाट पाहत असल्याने कारखाना समाप्तीसाठी कंपनी गुढीपाढव्याचा मुहूर्त साधत आहे. साधारणपणे २००५ च्या हंगामात लोकरी मावा, महापूर आणि आर्थिक संकटामुळे लाखाचा टप्पा पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाची आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. कोरोनाचे संकट आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे टाकून बसलेल्या टोळ्यांच्या कमतरतेमुळे अकरा लाखांचा शेवटचा टप्पा सर्वांसाठी कसोटीचा होता.

एकूण दिवस- १४४

एकूण गाळप - ११,००,३०६ मेट्रिक टन

उत्पादित साखर - १३,८६,८५० क्विंटल

सोबत संग्रहित कारखान्याचा फोटो वापरावा.