शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

दहीहंडीच्या थरारावर यंदा विरजण

By admin | Updated: August 23, 2016 00:33 IST

२0 फुटांची मर्यादा : युवा शक्तीची दहीहंडी रद्द; बक्षिसांची रक्कम गोविंदा मंडळांत वाटणार

कोल्हापूर : दहीहंडीला स्पर्श करता-करता गोविंदा खाली कोसळतो, बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो... आणि खाली पडलेल्या गोविंदाला गंभीर दुखापत होते, असे चित्र गेली काही वर्षे गोकुळाष्टमीच्या सणामध्ये अवघ्या महाराष्ट्राला पाहण्यास मिळत असे. मात्र, उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेत २० फुटांपेक्षा जादा उंचीच्या दहीहंडीला परवानगी न देण्याची सूचनाच जारी केली. त्यामुळे यंदा गुरुवारी (दि. २५) होणारी ‘दहीहंडी’ चार थरांचीच होणार आहे. गेले काही वर्षे राजकारण आणि मंडळामंडळांतील ईर्ष्येमुळे दिवसेंदिवस दहीहंडीची उंची वाढत होती. त्यातून लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या आमिषांमुळे जिल्ह्यात अनेक गोविंदा पथके तयार झाली. या गोविंदा पथकांची तयारीही गोकुळाष्टमीच्या सहा-सहा महिने अगोदर सुरू असे. मात्र, यंदा उच्च न्यायालयाने केवळ दहीहंडीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांवरून पडणाऱ्यांच्या संख्येची व त्यातून जखमी होऊन पुढे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या लक्षात घेतली. त्यानुसार यंदा तरी २० फुटांपेक्षा अधिक उंचीची दहीहंडी मंडळांना उभारता येणार नाही, असे आदेश दिले आहे. या याचिकेतील पुढील सुनावणी आॅक्टोबरमध्ये होणार आहे. बक्षिसांच्या रकमेवर परिणाममोठ्या मानवी थरांना पोलिस प्रशासन परवानगी देणार नसल्याने चुरस कमी होणार हे सर्वश्रुत झाले आहे. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव साजऱ्या करणाऱ्या काही मंडळांनी बक्षिसांची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हीच रक्कम गणेशोत्सवात वापरण्यात येईल, असे सांगितले जात आहे.पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी ‘युवाशक्ती’ची दहीहंडी यंदा रद्द करण्यात आली आहे; कारण दहीहंडी हा थरारक खेळ आहे. ५० फुटांवरील थरार केवळ २० फुटांवर आणण्याचा निर्णय झाल्याने या खेळातील चुरस संपली आहे. दरवर्षी या उत्सवात सहभागी होण्यासाठी मुले सहा महिने अगोदर सराव करतात. या निर्णयामुळे त्यांची मेहनत वाया जाणार आहे. त्यामुळे यावर्षी दहीहंडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. बक्षिसाची रक्कम सर्व गोविंदा मंडळांमध्ये समान वाटप केली जाईल.- खासदार धनंजय महाडिक न्यायालयाने थरांची अट लावल्याने यंदा दहीहंडीची चुरसच कमी झाली आहे. त्यामुळे जे मंडळ प्रथम येईल त्या मंडळास दहीहंडी फोडण्याचा मान देऊ. विशेषत: वीस फुटांपेक्षा जादा उंचीची दहीहंडी उभी केली जाणार नाही. यंदा तर पाच संघांनाच आम्ही निमंत्रण दिले आहे. - किरण नकाते, नगरसेवक संयोजक, गुजरी कॉर्नर मित्र मंडळ उच्च न्यायालयाच्या अटीनुसारच मंडळांना दहीहंडी साजरी करावी लागणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातील दहीहंडी साजरी करणाऱ्या मोठ्या मंडळांना १४९ नुसार नोटीस पाठवून दिल्या आहेत. त्यात न्यायालयाचे आदेश मंडळांनी जर पाळले नाहीत, तर सर्वच सदस्यांवर गुन्हे नोंद केले जातील. त्यामुळे मंडळांनी न्यायालयाच्या अटी व शर्तींचे पालन करून उत्सव साजरा करावा. - भारतकुमार राणे, शहर पोलिस उपअधीक्षक