शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दादा आम्ही नक्कीच जिंकू पण...कोल्हापूर पोलीस खेळाडूंची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:33 IST

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत ३0 वेळा विजेतेपद पटकाविणाºया ‘कोल्हापूर’ संघाला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

ठळक मुद्देसततच्या कर्तव्यामुळे सरावाला मिळेना वेळ; याकरिता कोट्यवधींचा निधी खर्चमात्र, कामाचा ताण, वरिष्ठांची शेरेबाजी, कुटुंबाला दिला जाणारा अल्पवेळ, या सर्व बाबींमधून

दीपक जाधवकोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत ३0 वेळा विजेतेपद पटकाविणाºया ‘कोल्हापूर’ संघाला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या समारोपाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. त्यांनी याबाबत बक्षिसे कमी का मिळाली, याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यांनाही याचे उत्तर देता आले नाही. खरे कारण पाहता सततच्या कर्तव्यामुळे पोलीस खेळाडूंना सरावाकरिता वेळच मिळत नसल्याचे पुढे आले.

पोलीस कर्मचाºयांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून खात्यातर्फे दरवर्षी जिल्हा, परिक्षेत्रीय, तसेच राज्य व राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. याकरिता कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. हे करीत असताना पोलीस कर्मचाºयांमधील खेळाडूंना खेळापेक्षा कर्तव्यावरच अधिक वेळ खर्च करावा लागतो. त्यामुळे सरावात सातत्य नसल्याने त्याचा परिणाम स्पर्धेत होतो. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर पोलीस दलाची क्रीडा कामगिरी होय. गेल्या ४५ वर्षांत कोल्हापूर जिल्हा संघाने सुमारे ३0 वेळा विजेतेपद पटकाविले होते. मात्र, सततच्या बंदोबस्ताच्या कर्तव्यामुळे कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंची कामगिरी खालावत चालली आहे. यंदा तर ३६५ दिवसांपैकी सुमारे ३४० दिवस बंदोबस्त आणि उरलेल्या वेळेत कुटुंबासह खेळाच्या सरावासाठी दिले गेले होते. त्यामुळे कामगिरीत घसरण झाली. खरे कारण पाहता खेळाडू म्हणून भरती झालेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना वरिष्ठ अधिकारी ‘आता खेळ बंद करून कामाला लागा’ अशी शेरेबाजी करतात. मग, सरावाला वेळ कसा द्यायचा? असा यक्ष प्रश्न पोलीस खेळाडूंसमोर आहे.

जानेवारी २०१८ मध्ये नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा होणार आहेत. इतर जिल्'ातील पोलीस खेळाडूंना तीन महिने अगोदर केवळ सरावासाठी दिले जातात. त्याप्रमाणे कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंनाही द्यावेत, अशी मागणी होत आहे. मात्र, कामाचा ताण, वरिष्ठांची शेरेबाजी, कुटुंबाला दिला जाणारा अल्पवेळ, या सर्व बाबींमधून कोल्हापूरचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत कामगिरी कशी करणार, हे न उलघडणारे कोडे आहे.

विशेष म्हणजे, कोल्हापूर संघाने यापूर्वी आठ वेळा राज्यस्तरीय स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले होते. याबाबत अनेक खेळाडूंनी सरावाला वेळ मिळाला तर ‘दादा आम्ही नक्कीच जिंकू आणि कोल्हापूरचे नाव देशात नव्हे, तर सातासमुद्रापार नेऊ’ असेही बोलून दाखविले.खेळाडूंना वेळ देऊसरावात सातत्य नसल्याने खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो. हे सततच्या बंदोबस्ताचा ताणामुळे होते. ही बाब पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलून खेळाडूंना सवलत देऊ असे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.