शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

दादा आम्ही नक्कीच जिंकू पण...कोल्हापूर पोलीस खेळाडूंची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:33 IST

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत ३0 वेळा विजेतेपद पटकाविणाºया ‘कोल्हापूर’ संघाला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

ठळक मुद्देसततच्या कर्तव्यामुळे सरावाला मिळेना वेळ; याकरिता कोट्यवधींचा निधी खर्चमात्र, कामाचा ताण, वरिष्ठांची शेरेबाजी, कुटुंबाला दिला जाणारा अल्पवेळ, या सर्व बाबींमधून

दीपक जाधवकोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत ३0 वेळा विजेतेपद पटकाविणाºया ‘कोल्हापूर’ संघाला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या समारोपाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. त्यांनी याबाबत बक्षिसे कमी का मिळाली, याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यांनाही याचे उत्तर देता आले नाही. खरे कारण पाहता सततच्या कर्तव्यामुळे पोलीस खेळाडूंना सरावाकरिता वेळच मिळत नसल्याचे पुढे आले.

पोलीस कर्मचाºयांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून खात्यातर्फे दरवर्षी जिल्हा, परिक्षेत्रीय, तसेच राज्य व राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. याकरिता कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. हे करीत असताना पोलीस कर्मचाºयांमधील खेळाडूंना खेळापेक्षा कर्तव्यावरच अधिक वेळ खर्च करावा लागतो. त्यामुळे सरावात सातत्य नसल्याने त्याचा परिणाम स्पर्धेत होतो. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर पोलीस दलाची क्रीडा कामगिरी होय. गेल्या ४५ वर्षांत कोल्हापूर जिल्हा संघाने सुमारे ३0 वेळा विजेतेपद पटकाविले होते. मात्र, सततच्या बंदोबस्ताच्या कर्तव्यामुळे कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंची कामगिरी खालावत चालली आहे. यंदा तर ३६५ दिवसांपैकी सुमारे ३४० दिवस बंदोबस्त आणि उरलेल्या वेळेत कुटुंबासह खेळाच्या सरावासाठी दिले गेले होते. त्यामुळे कामगिरीत घसरण झाली. खरे कारण पाहता खेळाडू म्हणून भरती झालेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना वरिष्ठ अधिकारी ‘आता खेळ बंद करून कामाला लागा’ अशी शेरेबाजी करतात. मग, सरावाला वेळ कसा द्यायचा? असा यक्ष प्रश्न पोलीस खेळाडूंसमोर आहे.

जानेवारी २०१८ मध्ये नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा होणार आहेत. इतर जिल्'ातील पोलीस खेळाडूंना तीन महिने अगोदर केवळ सरावासाठी दिले जातात. त्याप्रमाणे कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंनाही द्यावेत, अशी मागणी होत आहे. मात्र, कामाचा ताण, वरिष्ठांची शेरेबाजी, कुटुंबाला दिला जाणारा अल्पवेळ, या सर्व बाबींमधून कोल्हापूरचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत कामगिरी कशी करणार, हे न उलघडणारे कोडे आहे.

विशेष म्हणजे, कोल्हापूर संघाने यापूर्वी आठ वेळा राज्यस्तरीय स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले होते. याबाबत अनेक खेळाडूंनी सरावाला वेळ मिळाला तर ‘दादा आम्ही नक्कीच जिंकू आणि कोल्हापूरचे नाव देशात नव्हे, तर सातासमुद्रापार नेऊ’ असेही बोलून दाखविले.खेळाडूंना वेळ देऊसरावात सातत्य नसल्याने खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो. हे सततच्या बंदोबस्ताचा ताणामुळे होते. ही बाब पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलून खेळाडूंना सवलत देऊ असे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.