शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दादा आम्ही नक्कीच जिंकू पण...कोल्हापूर पोलीस खेळाडूंची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:33 IST

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत ३0 वेळा विजेतेपद पटकाविणाºया ‘कोल्हापूर’ संघाला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

ठळक मुद्देसततच्या कर्तव्यामुळे सरावाला मिळेना वेळ; याकरिता कोट्यवधींचा निधी खर्चमात्र, कामाचा ताण, वरिष्ठांची शेरेबाजी, कुटुंबाला दिला जाणारा अल्पवेळ, या सर्व बाबींमधून

दीपक जाधवकोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत ३0 वेळा विजेतेपद पटकाविणाºया ‘कोल्हापूर’ संघाला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या समारोपाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. त्यांनी याबाबत बक्षिसे कमी का मिळाली, याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यांनाही याचे उत्तर देता आले नाही. खरे कारण पाहता सततच्या कर्तव्यामुळे पोलीस खेळाडूंना सरावाकरिता वेळच मिळत नसल्याचे पुढे आले.

पोलीस कर्मचाºयांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून खात्यातर्फे दरवर्षी जिल्हा, परिक्षेत्रीय, तसेच राज्य व राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. याकरिता कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. हे करीत असताना पोलीस कर्मचाºयांमधील खेळाडूंना खेळापेक्षा कर्तव्यावरच अधिक वेळ खर्च करावा लागतो. त्यामुळे सरावात सातत्य नसल्याने त्याचा परिणाम स्पर्धेत होतो. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर पोलीस दलाची क्रीडा कामगिरी होय. गेल्या ४५ वर्षांत कोल्हापूर जिल्हा संघाने सुमारे ३0 वेळा विजेतेपद पटकाविले होते. मात्र, सततच्या बंदोबस्ताच्या कर्तव्यामुळे कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंची कामगिरी खालावत चालली आहे. यंदा तर ३६५ दिवसांपैकी सुमारे ३४० दिवस बंदोबस्त आणि उरलेल्या वेळेत कुटुंबासह खेळाच्या सरावासाठी दिले गेले होते. त्यामुळे कामगिरीत घसरण झाली. खरे कारण पाहता खेळाडू म्हणून भरती झालेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना वरिष्ठ अधिकारी ‘आता खेळ बंद करून कामाला लागा’ अशी शेरेबाजी करतात. मग, सरावाला वेळ कसा द्यायचा? असा यक्ष प्रश्न पोलीस खेळाडूंसमोर आहे.

जानेवारी २०१८ मध्ये नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा होणार आहेत. इतर जिल्'ातील पोलीस खेळाडूंना तीन महिने अगोदर केवळ सरावासाठी दिले जातात. त्याप्रमाणे कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंनाही द्यावेत, अशी मागणी होत आहे. मात्र, कामाचा ताण, वरिष्ठांची शेरेबाजी, कुटुंबाला दिला जाणारा अल्पवेळ, या सर्व बाबींमधून कोल्हापूरचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत कामगिरी कशी करणार, हे न उलघडणारे कोडे आहे.

विशेष म्हणजे, कोल्हापूर संघाने यापूर्वी आठ वेळा राज्यस्तरीय स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले होते. याबाबत अनेक खेळाडूंनी सरावाला वेळ मिळाला तर ‘दादा आम्ही नक्कीच जिंकू आणि कोल्हापूरचे नाव देशात नव्हे, तर सातासमुद्रापार नेऊ’ असेही बोलून दाखविले.खेळाडूंना वेळ देऊसरावात सातत्य नसल्याने खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो. हे सततच्या बंदोबस्ताचा ताणामुळे होते. ही बाब पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलून खेळाडूंना सवलत देऊ असे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.