शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद पॅटर्न निर्माण करणाऱ्या डी.ए. पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 11:36 IST

: बारावीच्या परीक्षेत ह्यविवेकानंद पॅटर्न निर्माण करत राज्यात कोल्हापूरचा नावलौकिक करणारे विवेकानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. दादासाहेब आप्पा तथा डी.ए. पाटील (वय ८६) यांचे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माणगाव (ता. हातकणंगले) येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, उत्तम प्रशासक, कर्तबगार प्राचार्य अशी राज्यभर ओळख असणारे व्यक्तिमत्त्व हरपले. त्यांच्या पश्चात मुलगा रवींद्र, मुलगी सुनंदा हुक्कीरे, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ठळक मुद्देविवेकानंद पॅटर्न निर्माण करणाऱ्या डी.ए. पाटील यांचे निधन वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास : कर्तबगार प्राचार्य हरपले

 रूकडी-माणगाव /कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेत ह्यविवेकानंद पॅटर्न निर्माण करत राज्यात कोल्हापूरचा नावलौकिक करणारे विवेकानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. दादासाहेब आप्पा तथा डी.ए. पाटील (वय ८६) यांचे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माणगाव (ता. हातकणंगले) येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, उत्तम प्रशासक, कर्तबगार प्राचार्य अशी राज्यभर ओळख असणारे व्यक्तिमत्त्व हरपले. त्यांच्या पश्चात मुलगा रवींद्र, मुलगी सुनंदा हुक्कीरे, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.प्राचार्य पाटील गेल्या दोन वर्षांपासून स्मृतिभ्रंश विकाराने त्रस्त होते. गेल्या आठवड्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यातच त्यांची गुरुवारी सायंकाळी माणगाव येथील निवासस्थानी प्राणज्योत मालवली. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्राचार्य पाटील यांना शिक्षणाची आवड होती. रांगडापणा, शिस्तबध्दता, कष्ट करण्याची तयारी ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्टे होती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. बापूजी साळुंखे यांचा त्यांना सहवास लाभला होता.

बापूजींच्या मुशीत घडलेल्या प्राचार्य पाटील यांनी प्राचार्यपदावरून काम करताना संस्थेच्या वैभवात भर घालणारी कामगिरी केली. हिंदी विषयात एम.ए झाल्यानंतर माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली. कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज हायस्कूल येथे सहायक शिक्षक म्हणून काम केले.

पुढे ए.पी. मगदूम हायस्कूल माणगाव येथे मुख्याध्यापक झाले. तासगाव कॉलेजमध्ये प्राध्यापकपदी काम केले. तळमावले येथे प्राचार्यपदाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांनी ३० वर्षाहून अधिक काळ प्राचार्यपदी काम केले. करडी शिस्त, प्रशासनावर पकड, गुणवत्तेचा ध्यास आणि संस्थेचा विकास या चतुसूत्रीनुसार ते कार्यरत होते.

प्राचार्यपदाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी रचनात्मक कार्य केले. ग्रंथालय, महाविद्यालयाच्या इमारती उभा केल्या. ठिकठिकाणी प्राचार्यपद उत्तमरित्या सांभाळल्यानंतर संस्थेने त्यांना कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सोपविली. या महाविद्यालयाचा त्यांनी कायापालट करत राज्यात दबदबा निर्माण केला. विवेकानंद पॅटर्न निर्माण करत त्यांनी बारावी बोर्ड परीक्षेच्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकविले.

बारावीच्या गुणवत्ता यादीत चमकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी हे विवेकानंद महाविद्यालयाचे असायचे. गुणी शिक्षकांना हेरुन त्यांच्याकडून उच्च दर्जाची कामगिरी करून घेण्याची त्यांची खासियत होती. शिक्षणक्षेत्राबरोबर ते शेतीही करत होते. त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले. शिक्षणक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना राज्य सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार, इचलकंरजीतील फाय फाउंडेशन, दक्षिण भारत जैन सभेचा कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कारासह विविध संस्थांनी पुरस्कारांनी सन्मानित केले होते.

कार्याचा गौरवविद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देत प्राचार्य पाटील यांनी महाविद्यालयाची गुणवत्ता वाढवली. बारावीसह त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीसह कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात महाविद्यालयाला अव्वलस्थानी ठेवले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संस्थेने विवेकानंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला त्यांचे नाव दिले.ग्रामीण भागातील अनेकांना नोकरी दिली३५ वर्षांच्या सेवेनंतर सन १९९६ मध्ये प्राचार्य पाटील हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांना पुन्हा पाच वर्षे संस्थेने काम करण्याची संधी दिली. विवेकानंद महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर प्राचार्य पाटील यांनी डॉ. डी.वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य म्हणून सात वर्षे धुरा सांभाळली. विवेकानंद शिक्षण संस्थेत आजीव सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी ग्रामीण भागातील अनेकांना नोकरी दिली. माणगाव येथील एपीएम हायस्कूलचे ते संस्थापक होते. त्यांनी माणगाव येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये पत्नीच्या स्मरणार्थ सभागृह बांधून दिले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय