शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यासह पर्यावरणास पूरक ठरतेय सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:27 IST

- सचिन भोसले कोल्हापूर : जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे पुन्हा जुन्या गोष्टींना महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. सायकल ...

- सचिन भोसले

कोल्हापूर : जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे पुन्हा जुन्या गोष्टींना महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. सायकल ते मोपेड व्हाया मोटारसायकल ते चारचाकी आणि पुन्हा सायकल असे अक्षरश: सायकल या शब्दाप्रमाणे गोल सर्कल पूर्ण होत आहे. सलग दोनवेळा कोरोनाची लाट आल्यानंतर अनेकांना व्यायामाचा प्रश्न होता. त्यात सायकलचे पॅडल पुन्हा मारण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात सायकलिंगचे ग्रुप बनू लागले आहेत. विशेषत: लॉकडाऊन काळात सायकलची तडाखेबंद विक्री झाली.

विशेषत: लॉकडाऊन काळात घरी बसून अनेकांचे वजन वाढले. त्यामुळे अनेकांनी स्थूलता कमी करण्यासाठी महागड्या सायकली खरेदी केल्या. कोल्हापुरातील उपनगरांतील अनेक रस्ते जणू सायकलचे ट्रॅकच बनले होते. अनेक रस्त्यांवर, कॉलनीत सायकलपटूंचे जथेच्या जथेच बाहेर पडत होते. पूर्वी शाळा, महाविद्यालय, थिएटर, सरकारी कचेऱ्यांमध्ये सायकल स्टँड असायचे. गेल्या काही वर्षांचा अपवाद वगळता, अनेक स्टँडची जागा दुचाकी आणि चारचाकी पार्किंगने घेतली आहे. मुलगा आठवीला गेला की, अनेक पालक मुलांना शाळेला जाण्यासाठी सायकल घेत असत. दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पाल्याला हिरो, हर्क्युलस, बीएसए अशा नामांकित कंपन्यांची सायकल भेट म्हणून देत असत. मात्र, काळाच्या ओघात त्यांची जागा मोपेड, दुचाकी, मोटारसायकल आणि चारचाकीने घेतली. त्याचबरोबर शरीराचा व्यायामही थांबला. काळाचा महिमा म्हणा किंवा गरज म्हणून, आता नव्याने अनेक घरात सायकली दिसत आहेत. विशेषत: एका घरात मुलगा, आई, बाबा आणि मुलगी यांच्या चार सायकली दिसत आहेत. अनेकांना अभिनेता आमिर खानचा ‘जो जीता वही सिकंदर’ हा चित्रपट आज पुन्हा हवा-हवासा वाटत आहे. या चित्रपटानंतर सायकलमध्ये गियरची क्रेझ आली. रेसर, रेंजर अशा सायकलीही आल्या. जीममध्येही सायकल आली. मात्र ती एकाच जागी असणारी सायकल होय. ही केवळ बसून तेथेच पॅडल मारून व्यायाम करण्यासाठी होती. त्यातही सुधारणा होऊन अनेक पर्यावरणप्रेमींनी मोकळ्या रस्त्यांवर सायकल चालवून पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे. याची जागृती करणारे क्लब, ग्रुप वाढले आहेत. विनाइंधन सायकलचे महत्त्वही अनेकजण आपल्या जनजागृती मोहिमेत विषद करू लागले आहेत.

रविवारी ट्रीप सुरू झाली...

पूर्वी शनिवारी शाळा सुटल्यानंतर त्याचदिवशी दुपारी किंवा रविवारी सकाळी कोल्हापुरातील अनेक शाळकरी, महाविद्यालयीन युवक पन्हाळा, जोतिबा, न्यू पॅलेस अशा ठिकाणी ट्रीप काढत असत. आता तीच प्रथा सुरू होऊन दर रविवारी जोतिबा, कात्यायनी, पन्हाळा, राधानगरी अशा विविध ठिकाणी ग्रुपने ट्रीप काढणारे क्लब आणि ग्रुप निर्माण झाले आहेत. व्यायामासह शुद्ध ऑक्सिजन या ट्रीपमधून मिळतो. त्यामुळे असे ग्रुप कोल्हापुरात वाढू लागले आहेत.

फायदे असे...

- सायकलिंगमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

- सायकलिंगमुळे शरीर तंदुरुस्त राहते. शरीरातील हालचाली वेगवान झाल्यामुळे रक्ताभिसरण वाढते. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. स्नायू बळकटीकरण होते. वजन नियंत्रणात राहते. शुद्ध हवा आणि व्यायामाचा आनंद मिळतो.

साडेतीन लाखांच्या सायकली कोल्हापुरात...

कोल्हापुरातील आर्यनमन आकाश कोरगावकर, आदित्य शिंदे, चेतन चव्हाण, अक्षय चौगुले, नितीश कुलकर्णी, अशा अनेकजणांकडे साडेतीन लाखांच्या सायकली आहेत. या सायकलींचा वापर ते आर्यनमॅनसारख्या खडतर स्पर्धेच्या तयारीसाठी करीत आहेत. तसेच अनेक हौशी सायकलपटूंकडेही साडेतीन ते पाच लाखांपर्यंतच्या सायकली आहेत. पोलीस खात्यातील एक उच्चपदस्थ अधिकारीही सायकलप्रेमी आहे. त्याच्याकडे जवळजवळ १२ सायकली आहेत. त्यांच्या किमती ८० हजारांपासून पाच लाखांपर्यंत आहेत. ते अधिकारी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याशी संबंधित आहेत.