शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

कश्मीरमे पहले से ज्यादा शांती है, अनुभवाच्या चटक्यांवर फुंकर मारून पुढे झेपावलेल्या काश्मिरी मुलींच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:49 IST

‘‘दंगे, फसात, गोळीबार कुणामध्येही होवो, सरकारे कौन सी भी हो आम आदमीही मरता है... आम्हाला आता इथल्या परिस्थितीची सवय झाली आहे.

इंदुमती गणेशकोल्हापूर : ‘एक वक्त था जब रात को कोई दरवाजा खटखटाता था, हम जान मुठ्ठी में लेके बाहर आते थे, लोगों को इकठ्ठा करके बेमतलब तंग किया जाता था, जवानों को मारा जाता था, लडकी के साथ बुरा न हो इसिलिए १८ साल मे ही मेरी बहन की शादी करा दी गई... आज भी कभी दंगे फसाद होते है पर हमें आदत हो गई, इतना सुकून है की, पहले से जादा अमन और शांती है... कही बताई बातों पे विश्वास ना करें... निडर होके कश्मीर आईये आपका स्वागत है...’ हे शब्द आहेत काश्मीरमधील सामाजिक परिस्थितीने हाेरपळलेल्या मुलींचे. अनुभवांच्या चटक्यांवर फुंकर मारून त्या नव्या वाटा, नव्या दिशांकडे झेप घेत आहेत.बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या पुढाकारातून सध्या जम्मू-काश्मीरमधील ४० मुली कोल्हापुरात आल्या आहेत. कोल्हापुरी पाहुणचाराने त्या जाम खुश झाल्या. नवं काही बघितल्याचा आणि अनुभवल्याचा आनंद त्यांच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर आणि भुऱ्या डोळ्यांमधून तरळत होता. या मुली कुपवाडा, जम्मू, काश्मीर येथील निवासी आश्रमशाळांमध्ये राहतात. यातील सर्वात लहान मुलगी आहे पाच वर्षांची. तिला आपण संस्थेत कसे आलो माहीत नाही. अनेक मुलींचे आई किंवा वडील किंवा दोघेही काश्मीरमध्ये झालेल्या दंगली, अतिरेकी हल्ले व गोळीबार अशा दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत.सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेली बसेरा ए तबस्सुम म्हणते, ‘‘आम्ही फार वाईट परिस्थितीमधून इथपर्यंत आलो आहाेत. वडील वारले, आई कसं तरी घर चालवते. मी संस्थेत येऊन १६ वर्ष झाली. अनेक मुली चांगल्या शिकून नोकरी करत आहेत, घराची जबाबदारी पेलत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.’’ नगीना बशीर या १४ वर्षांच्या मुलीला पाच बहिणी, एक भाऊ आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. गुलशन आरा, निकिता, आफरिना अशा सगळ्या मुलींची कहाणी वेगळी आहे, पण दु:खाचा धागा एकच आहे. परिस्थितीच्या काट्यांवरून चालताना होणाऱ्या वेदना मागे सोडताना त्यांच्यामध्ये नवे ध्येय गाठण्याची इच्छा आहे आणि समान धाग्याने त्यांना बांधून ठेवले आहे.

सरकारे कौन सी भी हो, आम आदमीही मरता हैतुम्हाला काश्मीर सरकारकडून काय अपेक्षा आहे? यावर तबस्सुम ही आश्रमशाळेचे मॅनेजमेंट बघणारी मुलगी म्हणाली, ‘‘दंगे, फसात, गोळीबार कुणामध्येही होवो, सरकारे कौन सी भी हो आम आदमीही मरता है... आम्हाला आता इथल्या परिस्थितीची सवय झाली आहे. पण भविष्यात हे चित्र बदलेल, अशी आशा आहे. आमच्याकडे बेरोजगारी प्रचंड आहे. उत्पन्नाच्या साधनांवर मर्यादा आहे. राेजगार मिळाला की अर्धे प्रश्न आपोआप मिटतील.’’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJammu Kashmirजम्मू-काश्मीर