शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कश्मीरमे पहले से ज्यादा शांती है, अनुभवाच्या चटक्यांवर फुंकर मारून पुढे झेपावलेल्या काश्मिरी मुलींच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:49 IST

‘‘दंगे, फसात, गोळीबार कुणामध्येही होवो, सरकारे कौन सी भी हो आम आदमीही मरता है... आम्हाला आता इथल्या परिस्थितीची सवय झाली आहे.

इंदुमती गणेशकोल्हापूर : ‘एक वक्त था जब रात को कोई दरवाजा खटखटाता था, हम जान मुठ्ठी में लेके बाहर आते थे, लोगों को इकठ्ठा करके बेमतलब तंग किया जाता था, जवानों को मारा जाता था, लडकी के साथ बुरा न हो इसिलिए १८ साल मे ही मेरी बहन की शादी करा दी गई... आज भी कभी दंगे फसाद होते है पर हमें आदत हो गई, इतना सुकून है की, पहले से जादा अमन और शांती है... कही बताई बातों पे विश्वास ना करें... निडर होके कश्मीर आईये आपका स्वागत है...’ हे शब्द आहेत काश्मीरमधील सामाजिक परिस्थितीने हाेरपळलेल्या मुलींचे. अनुभवांच्या चटक्यांवर फुंकर मारून त्या नव्या वाटा, नव्या दिशांकडे झेप घेत आहेत.बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या पुढाकारातून सध्या जम्मू-काश्मीरमधील ४० मुली कोल्हापुरात आल्या आहेत. कोल्हापुरी पाहुणचाराने त्या जाम खुश झाल्या. नवं काही बघितल्याचा आणि अनुभवल्याचा आनंद त्यांच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर आणि भुऱ्या डोळ्यांमधून तरळत होता. या मुली कुपवाडा, जम्मू, काश्मीर येथील निवासी आश्रमशाळांमध्ये राहतात. यातील सर्वात लहान मुलगी आहे पाच वर्षांची. तिला आपण संस्थेत कसे आलो माहीत नाही. अनेक मुलींचे आई किंवा वडील किंवा दोघेही काश्मीरमध्ये झालेल्या दंगली, अतिरेकी हल्ले व गोळीबार अशा दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत.सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेली बसेरा ए तबस्सुम म्हणते, ‘‘आम्ही फार वाईट परिस्थितीमधून इथपर्यंत आलो आहाेत. वडील वारले, आई कसं तरी घर चालवते. मी संस्थेत येऊन १६ वर्ष झाली. अनेक मुली चांगल्या शिकून नोकरी करत आहेत, घराची जबाबदारी पेलत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.’’ नगीना बशीर या १४ वर्षांच्या मुलीला पाच बहिणी, एक भाऊ आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. गुलशन आरा, निकिता, आफरिना अशा सगळ्या मुलींची कहाणी वेगळी आहे, पण दु:खाचा धागा एकच आहे. परिस्थितीच्या काट्यांवरून चालताना होणाऱ्या वेदना मागे सोडताना त्यांच्यामध्ये नवे ध्येय गाठण्याची इच्छा आहे आणि समान धाग्याने त्यांना बांधून ठेवले आहे.

सरकारे कौन सी भी हो, आम आदमीही मरता हैतुम्हाला काश्मीर सरकारकडून काय अपेक्षा आहे? यावर तबस्सुम ही आश्रमशाळेचे मॅनेजमेंट बघणारी मुलगी म्हणाली, ‘‘दंगे, फसात, गोळीबार कुणामध्येही होवो, सरकारे कौन सी भी हो आम आदमीही मरता है... आम्हाला आता इथल्या परिस्थितीची सवय झाली आहे. पण भविष्यात हे चित्र बदलेल, अशी आशा आहे. आमच्याकडे बेरोजगारी प्रचंड आहे. उत्पन्नाच्या साधनांवर मर्यादा आहे. राेजगार मिळाला की अर्धे प्रश्न आपोआप मिटतील.’’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJammu Kashmirजम्मू-काश्मीर