शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

कश्मीरमे पहले से ज्यादा शांती है, अनुभवाच्या चटक्यांवर फुंकर मारून पुढे झेपावलेल्या काश्मिरी मुलींच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:49 IST

‘‘दंगे, फसात, गोळीबार कुणामध्येही होवो, सरकारे कौन सी भी हो आम आदमीही मरता है... आम्हाला आता इथल्या परिस्थितीची सवय झाली आहे.

इंदुमती गणेशकोल्हापूर : ‘एक वक्त था जब रात को कोई दरवाजा खटखटाता था, हम जान मुठ्ठी में लेके बाहर आते थे, लोगों को इकठ्ठा करके बेमतलब तंग किया जाता था, जवानों को मारा जाता था, लडकी के साथ बुरा न हो इसिलिए १८ साल मे ही मेरी बहन की शादी करा दी गई... आज भी कभी दंगे फसाद होते है पर हमें आदत हो गई, इतना सुकून है की, पहले से जादा अमन और शांती है... कही बताई बातों पे विश्वास ना करें... निडर होके कश्मीर आईये आपका स्वागत है...’ हे शब्द आहेत काश्मीरमधील सामाजिक परिस्थितीने हाेरपळलेल्या मुलींचे. अनुभवांच्या चटक्यांवर फुंकर मारून त्या नव्या वाटा, नव्या दिशांकडे झेप घेत आहेत.बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या पुढाकारातून सध्या जम्मू-काश्मीरमधील ४० मुली कोल्हापुरात आल्या आहेत. कोल्हापुरी पाहुणचाराने त्या जाम खुश झाल्या. नवं काही बघितल्याचा आणि अनुभवल्याचा आनंद त्यांच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर आणि भुऱ्या डोळ्यांमधून तरळत होता. या मुली कुपवाडा, जम्मू, काश्मीर येथील निवासी आश्रमशाळांमध्ये राहतात. यातील सर्वात लहान मुलगी आहे पाच वर्षांची. तिला आपण संस्थेत कसे आलो माहीत नाही. अनेक मुलींचे आई किंवा वडील किंवा दोघेही काश्मीरमध्ये झालेल्या दंगली, अतिरेकी हल्ले व गोळीबार अशा दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत.सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेली बसेरा ए तबस्सुम म्हणते, ‘‘आम्ही फार वाईट परिस्थितीमधून इथपर्यंत आलो आहाेत. वडील वारले, आई कसं तरी घर चालवते. मी संस्थेत येऊन १६ वर्ष झाली. अनेक मुली चांगल्या शिकून नोकरी करत आहेत, घराची जबाबदारी पेलत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.’’ नगीना बशीर या १४ वर्षांच्या मुलीला पाच बहिणी, एक भाऊ आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. गुलशन आरा, निकिता, आफरिना अशा सगळ्या मुलींची कहाणी वेगळी आहे, पण दु:खाचा धागा एकच आहे. परिस्थितीच्या काट्यांवरून चालताना होणाऱ्या वेदना मागे सोडताना त्यांच्यामध्ये नवे ध्येय गाठण्याची इच्छा आहे आणि समान धाग्याने त्यांना बांधून ठेवले आहे.

सरकारे कौन सी भी हो, आम आदमीही मरता हैतुम्हाला काश्मीर सरकारकडून काय अपेक्षा आहे? यावर तबस्सुम ही आश्रमशाळेचे मॅनेजमेंट बघणारी मुलगी म्हणाली, ‘‘दंगे, फसात, गोळीबार कुणामध्येही होवो, सरकारे कौन सी भी हो आम आदमीही मरता है... आम्हाला आता इथल्या परिस्थितीची सवय झाली आहे. पण भविष्यात हे चित्र बदलेल, अशी आशा आहे. आमच्याकडे बेरोजगारी प्रचंड आहे. उत्पन्नाच्या साधनांवर मर्यादा आहे. राेजगार मिळाला की अर्धे प्रश्न आपोआप मिटतील.’’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJammu Kashmirजम्मू-काश्मीर