शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडे कारखान्याच्या गळीत हंगामास मनाई कायम

By admin | Updated: November 21, 2014 00:53 IST

पुढील सुनावणी बुधवारी : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिज्ञापत्र दाखल नाही

म्हाकवे : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे प्रा.लि. या साखर कारखान्यास गळीत हंगाम सुरू करण्यास उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला मनाई आदेश कायम ठेवला आहे. पुढील सुनावणी बुधवारी (दि. २६) होणार आहे.घोरपडे साखर कारखान्याच्या विरोधात दाखल केलेल्या जनसुनावणीवर आज, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कारखान्याचे वकील जहांगीरदार यांनी कारखान्याने हंगाम सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व शासकीय मान्यता घेतल्या आहेत. त्यामुळे मनाई आदेश उठवून हंगाम सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती केली.परंतु याचिकाकर्ते कृष्णात धामणकर व इतर तीन याचिकेच्या बाबतीत युक्तिवाद करताना अ‍ॅड. विजयसिंह थोरात यांनी चिकोत्रा धरण हे परिसरातील गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी व शेतीसाठी बारमाही पाणीपुरवठा व्हावा यासाठी बांधले आहे. उद्योगधंद्यासाठी पाण्याची तरतूदच नाही. तरीसुद्धा या कारखान्याची उभारणी चिकोत्रा तिरावर केवळ एक कि.मी. अंतरावर झाली आहे. तसेच या कारखान्यामुळे चिकोत्रा नदीच्या काठावरील सुमारे २० ते २५ गावांतील लोकांना पाणीपुरवठ्याचा फटका बसणार आहे. हा कारखाना डोंगर पठारावर असल्याने त्यामुळे प्रदूषणात भरच पडणार आहे.त्याचबरोबर बेलेवाडी येथील उभारणी झालेल्या ४६६ गट नंबरची मालकी कारखान्याची नसून यामध्ये हिस्सेदार मारुती पाटील व इतरही हिस्सेदारांचा समावेश आहे. तसेच बरीच कामे बेकायदेशीर व प्रदूषणाबाबत घेतलेल्या अनेक परवानग्या या बेकायदेशीर असल्याचे मंडलिक कारखान्याच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रतिज्ञापत्र दाखल न झाल्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला करण्याचे आदेश देत कारखान्याच्या गळीत हंगामाला मनाई कायम ठेवली आहे.तारीख पे तारीख ‘संभ्रम’गेल्या दोन महिन्यांपासून घोरपडे कारखान्याविरोधात दाखल झालेल्या सुनावणीसंदर्भात अंतरिम निर्णय न होता तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे या कारखान्याचा गळीत हंगाम लांबणीवर पडत आहे. या कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन झाल्यामुळे दररोज कारखान्याचा लाखो रुपयांचा तोटा होत आहे. तसेच शेतकरी, ऊसतोड, वाहतूकदार, कर्मचाऱ्यांतही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.