शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Kolhapur : अनलॉकपूर्वीच कोल्हापुरात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 16:46 IST

CoronaVirus In Kolhapur : सोमवारपासून कोल्हापुरात अंशत: अनलॉक होणार असले तरी रविवारपासूनच शहरात अनलॉक झालंय असे समजून कोल्हापूर शहरवासियांनी तुफान गर्दी केली. शहरातील सर्व भाजी मंडईचा परिसर, बाजारपेठा, सर्वच रस्ते नागरीक आणि वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. कोल्हापूरकरांना अनलॉकची प्रतीक्षा लागून राहिली असून कधी एकदा पूर्ववत व्यवहार सुरू होतात याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्याचेच प्रतिबिंब रविवारी पाहायला मिळाले.

ठळक मुद्देअनलॉकपूर्वीच कोल्हापुरात गर्दी पूर्ववत व्यवहार सुरू होण्याची प्रतीक्षा

कोल्हापूर : सोमवारपासून कोल्हापुरात अंशत: अनलॉक होणार असले तरी रविवारपासूनच शहरात अनलॉक झालंय असे समजून कोल्हापूर शहरवासियांनी तुफान गर्दी केली. शहरातील सर्व भाजी मंडईचा परिसर, बाजारपेठा, सर्वच रस्ते नागरीक आणि वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. कोल्हापूरकरांना अनलॉकची प्रतीक्षा लागून राहिली असून कधी एकदा पूर्ववत व्यवहार सुरू होतात याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्याचेच प्रतिबिंब रविवारी पाहायला मिळाले.महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता ओसरत चालला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १३ शहरे ही पूर्णत: अनलॉक होत आहेत. म्हणजेच तेथील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होत आहेत. एकीकडे सर्व व्यवसाय सुरू होण्याची आस लागली असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश अनलॉकच्या स्तर चारमध्ये समावेश आहे.जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ सकाळी अकरापर्यंत होती ती आता दुपारी चारपर्यंत वाढविली आहे. त्याची अंमलबजावणी आज, सोमवारपासून होणार आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून घरात थांबलेल्या कोल्हापूरवासीयांना कधी एकदा घरातून बाहेर पडतोय, असे झाले आहे. त्याची प्रचिती रविवारीच आले.

रविवारी सकाळी शहरातील सर्वच रस्त्यांवर नागरिकांची तसेच वाहनांची गर्दी झाली. भाजी मंडई सध्या बंद ठेवल्या असल्या तरी मंडईला लागून असलेल्या रस्त्यावर विक्रेत्यांना बसण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक रस्ते नागरीक, विक्रेत्यांच्या गर्दीने फुल्ल झाले होते. वाहनांची वर्दळ वाढल्याने काही ठिकाणी कोंडी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. रविवारी बाजारपेठेत फेरफटका मारला असता फिजिकल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला होता.गेले दीड महिना शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. शहरात संचारबंदी, कडक निर्बंध, कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार बंद राहिले. सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया टप्प्याने सुरू होत असल्याने प्रत्येक व्यक्तीला, दुकानदारांना, व्यावसायिकांना कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊन पुन्हा एकदा जीवनाची विस्कटलेली घडी सुधारायची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर