शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

CoronaVirus In Kolhapur : अनलॉकपूर्वीच कोल्हापुरात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 16:46 IST

CoronaVirus In Kolhapur : सोमवारपासून कोल्हापुरात अंशत: अनलॉक होणार असले तरी रविवारपासूनच शहरात अनलॉक झालंय असे समजून कोल्हापूर शहरवासियांनी तुफान गर्दी केली. शहरातील सर्व भाजी मंडईचा परिसर, बाजारपेठा, सर्वच रस्ते नागरीक आणि वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. कोल्हापूरकरांना अनलॉकची प्रतीक्षा लागून राहिली असून कधी एकदा पूर्ववत व्यवहार सुरू होतात याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्याचेच प्रतिबिंब रविवारी पाहायला मिळाले.

ठळक मुद्देअनलॉकपूर्वीच कोल्हापुरात गर्दी पूर्ववत व्यवहार सुरू होण्याची प्रतीक्षा

कोल्हापूर : सोमवारपासून कोल्हापुरात अंशत: अनलॉक होणार असले तरी रविवारपासूनच शहरात अनलॉक झालंय असे समजून कोल्हापूर शहरवासियांनी तुफान गर्दी केली. शहरातील सर्व भाजी मंडईचा परिसर, बाजारपेठा, सर्वच रस्ते नागरीक आणि वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. कोल्हापूरकरांना अनलॉकची प्रतीक्षा लागून राहिली असून कधी एकदा पूर्ववत व्यवहार सुरू होतात याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्याचेच प्रतिबिंब रविवारी पाहायला मिळाले.महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता ओसरत चालला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १३ शहरे ही पूर्णत: अनलॉक होत आहेत. म्हणजेच तेथील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होत आहेत. एकीकडे सर्व व्यवसाय सुरू होण्याची आस लागली असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश अनलॉकच्या स्तर चारमध्ये समावेश आहे.जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ सकाळी अकरापर्यंत होती ती आता दुपारी चारपर्यंत वाढविली आहे. त्याची अंमलबजावणी आज, सोमवारपासून होणार आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून घरात थांबलेल्या कोल्हापूरवासीयांना कधी एकदा घरातून बाहेर पडतोय, असे झाले आहे. त्याची प्रचिती रविवारीच आले.

रविवारी सकाळी शहरातील सर्वच रस्त्यांवर नागरिकांची तसेच वाहनांची गर्दी झाली. भाजी मंडई सध्या बंद ठेवल्या असल्या तरी मंडईला लागून असलेल्या रस्त्यावर विक्रेत्यांना बसण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक रस्ते नागरीक, विक्रेत्यांच्या गर्दीने फुल्ल झाले होते. वाहनांची वर्दळ वाढल्याने काही ठिकाणी कोंडी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. रविवारी बाजारपेठेत फेरफटका मारला असता फिजिकल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला होता.गेले दीड महिना शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. शहरात संचारबंदी, कडक निर्बंध, कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार बंद राहिले. सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया टप्प्याने सुरू होत असल्याने प्रत्येक व्यक्तीला, दुकानदारांना, व्यावसायिकांना कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊन पुन्हा एकदा जीवनाची विस्कटलेली घडी सुधारायची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर