शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

कोल्हापूरच्या अंबाबाईचा सुवर्ण पालखी प्रदक्षिणा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 11:58 IST

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवास गुरुवारपासून प्रारंभ झाला. यंदाच्या नवरात्रौत्सवात देवीला सुवर्ण पालखीत विराजमान करुन तिची मंदिर प्रदक्षिणा पालखी काढण्यात आली. हजारो भाविकांना सुवर्ण पालखीचा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.  

कोल्हापूर, दि. 22 - करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवास गुरुवारपासून प्रारंभ झाला. यंदाच्या नवरात्रौत्सवात देवीला सुवर्ण पालखीत विराजमान करुन तिची मंदिर प्रदक्षिणा पालखी काढण्यात आली. हजारो भाविकांना सुवर्ण पालखीचा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.  हजारो भाविकांनी केलेल्या सुवर्णदानातून 2 वर्षात ही पालखी तयार करण्यात आली आहे. नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापुरात नऊ दिवस देवीचा पालखी सोहळा असतो. यापुढे आता सुवर्ण पालखीतूनच मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

यापूर्वी लाकडी पालखीतून देवीची पालखी निघत असे. मात्र यंदा सोन्याच्या पालखीतून प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पालखी प्रदक्षिणा सोहळा सुरू झाला. यावर्षी प्रथमच देवीच्या पालखी सोहळ्यासाठी सुवर्णपालखी वापरली जाणार असल्याने करवीरकरांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्यामुळेच पालखी सोहळ्यासाठी मंदिर परिसरात हजारो भाविक दाखल झाले होते. दरम्यान, भाविकांची संख्या पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये व त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७