शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

आजऱ्यातील ३५० हेक्टरवर पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:25 IST

दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने आजरा तालुक्यातील ऊस व भात पिकांचे अंदाजे ३०० ते ३५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान ...

दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने आजरा तालुक्यातील ऊस व भात पिकांचे अंदाजे ३०० ते ३५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदी व ओढ्याचे पाणी बांध तोडून पिकात घुसल्यामुळे नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील १४८ घरांची पडझड झाली असून अंदाजे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.

पावसाने व्हिक्टोरीया पुलावर सर्वत्र खड्डे पडल्यामुळे पुलाला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाने हाजगोळी बंधाऱ्याशेजारी रस्त्यावर खड्डा पडला आहे. आजरा-कोल्हापूर रस्त्यावरील मुंमेवाडीजवळही रस्त्यावर खड्डा पडल्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. चाफवडे येथील नवीनच बांधलेल्या पुलाचा भराव वाहून गेला आहे. जेऊर ओढ्यावरील पुलाचा भराव वाहून गेल्यामुळे नागरिकांना पाण्यातून ये-जा करावी लागत आहे.

पावसाने तालुक्यातील ८८ कुटुंबातील ३६० नागरिकांना त्यांच्या जनावरांसह स्थलांतरित केले आहे. आजपर्यंत तालुक्यातील १४८ घरांची पडझड झाली असून अंदाजे ३५ लाखांचे नुकसान झाले.

गवसे येथील सचिन पाटील यांच्या गॅस गोडाऊनची संरक्षक भिंत कोसळल्याने तर निंगुडगे येथील सुनंदा धोंडीबा कांबळे यांचे संपूर्ण घर पडल्यामुळे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले आहे. करपेवाडीतील शेतकऱ्याची म्हैस वाहून गेल्याने ती आंबेओहोळच्या धरणात झाडाला अडकून बसली होती.

कुक्कुटपालन शेडमध्ये पावसाचे पाणी जाऊन तालुक्यातील अंदाजे १३ हजार कोंबड्या दगावल्या आहेत. सोहाळे, साळगाव व मडिलगे गावात पुराचे पाणी घुसले तर गजरगाव गावाला हिरण्यकेशी नदीच्या पुरामुळे बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शेतांमध्ये पाण्याबरोबर दगड-गोटे वाळू येऊन पिकांवर पडली आहेत. याचा सर्वात जास्त फटका ऊस व भात पिकाला बसला आहे.

फोटो ओळी :

गवसे (ता. आजरा) येथे शेतात पुराचे पाणी घुसून झालेले ऊस पिकांचे नुकसान झाले आहे.