शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

सत्ता हाच जागावाटपाचा निकष : विनोद तावडे

By admin | Updated: August 4, 2014 00:23 IST

मराठा आरक्षण न्यायिक स्तरावर टिकणार नाही

कोल्हापूर : राज्यातील सत्ता मिळविणे हाच महायुतीमध्ये जागावाटपाचा निकष असेल. याच मुद्द्याला धरून मित्रपक्षांसोबत उपसमित्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. पक्षीय ताकद पाहूनच मित्रपक्षांना जागा सोडली जाईल, असे स्पष्टीकरण भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज, रविवारी येथे पत्रकार परिषदेत केले. मराठा आरक्षणाची सत्ताधाऱ्यांनी घाई केली असून, न्यायिक स्तरावर ते टिकणार नाही; मात्र राज्यात सत्तापालट होताच, आरक्षण सक्षमपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही तावडे यांनी यावेळी दिली.तावडे म्हणाले, शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी गेल्या अनेक निवडणुकांत दहा हजारांचाही टप्पा ओलांडलेला नाही, अशा ३० ते ३५ जागांबाबतच बाहेरील उमेदवारांबाबत निर्णय होऊ शकतो. जनतेत स्थान असणाऱ्या, भ्रष्टाचार व अकार्यक्षमता यांपासून लांब असलेल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे भाजपमध्ये स्वागत आहे. राज्यभर ९ ते १५आॅगस्टदरम्यान ‘खुर्ची हटाव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. सत्ता आल्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर राज्य शासनाने राबविलेल्या सर्व लोकहिताच्या योजनांचा फेरआढावा घेतला जाईल. सर्व घोटाळ्यांची कालबद्ध चौकशी केली जाईल. सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल. मात्र, तोपर्यंत सीमाभागातील जनतेवर जोर व बळाचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. भविष्यात सीमाप्रश्नी शिवसेनेने भाजपला सोबत घेऊनच आंदोलन करावे, असे आवाहनही तावडे यांनी केले. (प्रतिनिधी)मराठा आरक्षणाची घाईराणे समितीने सर्वंकष अभ्यास न करताच २० टक्के मराठा आरक्षणाची घाई केली. यामध्येही मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण घुसडले.न्यायिक स्तरावर हे आरक्षण टिकणार नाही. भाजप राज्यात सत्तेवर येताच अधिक सक्षमपणे आरक्षणाची प्रक्रिया राबवील.- विनोद तावडे (विरोधी पक्षनेता)