शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

चिपरी ग्रामपंचायतीमध्ये गैरकारभार

By admin | Updated: March 26, 2015 00:27 IST

वॉटर मीटर प्रकरण : सरपंच, ग्रामसेवकांवर ठपका; कारवाईसंंबंधी ‘कारणे दाखवा’ नोटीस

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर  शिरोळ तालुक्यातील चिपरी ग्रामपंचायतीने वॉटर मीटर बसविण्याच्या प्रकरणात गैरकारभार केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्यामुळे ग्रामविकास अधिकारी ए. एन. गोरे व सरपंच सुदर्शन जनगोंडा पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ग्रामसेवक गोरे यांना निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, तर सरपंच पाटील यांना पदावरून काढून का टाकू नये, अशी नोटीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी (दि. २३) दिली आहे. दोघांनाही खुलाशासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.चिपरीची लोकसंख्या सुमारे सात हजार आहे. वारणा नदीवरील योजनेद्वारे गावात पाणीपुरवठा केला जातो. गावातील नळांना मीटर बसविण्याची प्रक्रिया सन २०१२ मध्ये राबविली. निविदा काढण्यापासून मीटर बसविण्यापर्यंतच्या सर्वच टप्प्यांत शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य सुरेश मीरासाहेब भाटिया, मनोज लक्ष्मण राजगिरे, बेबीताई मोहन पांडव, सुमेर नेमीनाथ चौगुले, राजू गणपती कोळी, भगवान जानोबा कांबळे यांनी केली. तक्रारीवरून शिरोळ गटविकास अधिकारी यांच्याकडून चौकशी झाली. चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषद ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाकडून चौकशी झाली.निविदा अर्जावर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या सह्या नाहीत. मान्य दराचा उल्लेख असलेले पानही निविदा अर्जासोबत नाही. करारनामा १८०० रुपयांच्या मुद्रांकावर करणे बंधनकारक असताना १०० रुपयांच्या मुद्रांकावर केलेला आहे. अंदाजपत्रकीय रक्कम रुपये २६ लाख ३० हजार ९९९ च्या एक टक्का बयाणा रक्कम, उर्वरित चार टक्के सुरक्षा अनामत रक्कम ठेकेदारांकडून भरणा केल्याची चलने, नियमानुसार आयकर, व्हॅट, उपकर, विमा व कामानुसार इतर अनुषंगिक शासकीय वसुली व निविदा अर्ज फी भरणा केल्याचे चलन केलेले नाही. निविदा प्राधिकारी, योजनेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी नियमबाह्य निविदा प्रक्रिया राबवून मंजुरी दिल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने ठेकेदाराकडून नियमानुसार वसुली करणे आवश्यक आहे. दहा टक्के दिलेली रक्कम व्याजासह वसूल करावी, असेही चौकशी अहवालात म्हटले आहे.ठपका काय ?ग्रामपंचायतीकडील कामकाजात अनियमितता, आर्थिक अनियमितता, नियमबाह्य कार्यवाही, कर्तव्यात कसूर असा ठपका ग्रामसेवक गोरे व सरपंच पाटील यांच्यावर ठेवला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ नुसार निलंबनाची कारवाई का करू नये, याचा खुलासा नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत शिरोळ गटविकास अधिकारी यांच्यातर्फे योग्य त्या पुराव्याच्या कागदपत्रांसह करावा, असे गोरे यांच्या नोटिसीमध्ये म्हटले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममधील कलम ३९ नुसार पदावरून काढून टाकण्याची कारवाई का करू नये, असे सरपंच पाटील यांना दिलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे.