शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

दंगाधोपा केल्यास उमेदवारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे : अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 4:14 PM

  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात दंगाधोपा करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास ...

ठळक मुद्देजिल्ह्यात ७५ अतिसंवेदनशील, १५८ उपद्रवी गावे पाच हजार पोलिसांची जिल्ह्यावर नजर

 

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात दंगाधोपा करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. जिल्ह्यात ७५ अतिसंवेदनशील व १५८ उपद्रवी गावे आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर पाच हजार पोलीस नजर ठेवून आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २१) मतदान होत आहे. चारच दिवस राहिल्याने प्रचाराला गती आली आहे. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात अनेक छुप्या घडामोडी घडू शकतात. अशावेळी दंगाधोपा केल्यास उमेदवारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना दिले आहेत. कोल्हापूर दक्षिण, कागल, शाहूवाडी-पन्हाळा, करवीर, इचलकरंजी मतदारसंघांतील ७५ अतिसंवेदनशील व १५८ उपद्रवी गावांचा समावेश आहे. त्या ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू असून ते कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मतदानाच्या पूर्वसंध्येला पाच हजार सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाईल. दंगल काबू, राज्य राखीव, केंद्रीय दल, रेल्वे पोलीस यांच्यासह ओडिसा, कर्नाटक, गोव्यातील १० विशेष पथके दोन दिवसांत बंदोबस्तासाठी दाखल होणार आहेत. कोल्हापूर दक्षिण, कागल परिसरात पोलिसांचे विशेष लक्ष असून दिवसरात्र गस्त सुरू आहे. एखादा अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून जिल्ह्यात येत्या चार दिवसांत कडक नाकाबंदीसह ‘कोम्बिंग आॅपरेशन’ करण्याचे आदेश दिले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.मोबाईल बंदीजिल्ह्यात तीन हजार ३२१ मदान केंद्रांमध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांतर्फे मतदान केंद्राच्या परिसराची पाहणी केली जाणार आहे. मतदान केंद्रासह परिसरात मोबाईलचा वापर केल्यास तो जप्त करून गुन्हा दाखल केला जाणार आहे.हालचालींवर लक्षमतदानाच्या अखेरच्या टप्प्यात फोडाफोडीचे राजकारण होत असते. अशावेळी पैशांची देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामध्ये बहुतांश उमेदवार गुंडांचा वापर करत असतात. त्यामुळे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह शहरासह, उपनगर, गावागावांतील राजकीय पुढाऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.-------------------------एकनाथ पाटील

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाPoliceपोलिस