शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

दंगाधोपा केल्यास उमेदवारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे : अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 16:15 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात दंगाधोपा करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास ...

ठळक मुद्देजिल्ह्यात ७५ अतिसंवेदनशील, १५८ उपद्रवी गावे पाच हजार पोलिसांची जिल्ह्यावर नजर

 

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात दंगाधोपा करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. जिल्ह्यात ७५ अतिसंवेदनशील व १५८ उपद्रवी गावे आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर पाच हजार पोलीस नजर ठेवून आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २१) मतदान होत आहे. चारच दिवस राहिल्याने प्रचाराला गती आली आहे. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात अनेक छुप्या घडामोडी घडू शकतात. अशावेळी दंगाधोपा केल्यास उमेदवारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना दिले आहेत. कोल्हापूर दक्षिण, कागल, शाहूवाडी-पन्हाळा, करवीर, इचलकरंजी मतदारसंघांतील ७५ अतिसंवेदनशील व १५८ उपद्रवी गावांचा समावेश आहे. त्या ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू असून ते कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मतदानाच्या पूर्वसंध्येला पाच हजार सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाईल. दंगल काबू, राज्य राखीव, केंद्रीय दल, रेल्वे पोलीस यांच्यासह ओडिसा, कर्नाटक, गोव्यातील १० विशेष पथके दोन दिवसांत बंदोबस्तासाठी दाखल होणार आहेत. कोल्हापूर दक्षिण, कागल परिसरात पोलिसांचे विशेष लक्ष असून दिवसरात्र गस्त सुरू आहे. एखादा अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून जिल्ह्यात येत्या चार दिवसांत कडक नाकाबंदीसह ‘कोम्बिंग आॅपरेशन’ करण्याचे आदेश दिले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.मोबाईल बंदीजिल्ह्यात तीन हजार ३२१ मदान केंद्रांमध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांतर्फे मतदान केंद्राच्या परिसराची पाहणी केली जाणार आहे. मतदान केंद्रासह परिसरात मोबाईलचा वापर केल्यास तो जप्त करून गुन्हा दाखल केला जाणार आहे.हालचालींवर लक्षमतदानाच्या अखेरच्या टप्प्यात फोडाफोडीचे राजकारण होत असते. अशावेळी पैशांची देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामध्ये बहुतांश उमेदवार गुंडांचा वापर करत असतात. त्यामुळे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह शहरासह, उपनगर, गावागावांतील राजकीय पुढाऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.-------------------------एकनाथ पाटील

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाPoliceपोलिस