शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दंगाधोपा केल्यास उमेदवारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे : अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 16:15 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात दंगाधोपा करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास ...

ठळक मुद्देजिल्ह्यात ७५ अतिसंवेदनशील, १५८ उपद्रवी गावे पाच हजार पोलिसांची जिल्ह्यावर नजर

 

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात दंगाधोपा करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. जिल्ह्यात ७५ अतिसंवेदनशील व १५८ उपद्रवी गावे आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर पाच हजार पोलीस नजर ठेवून आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २१) मतदान होत आहे. चारच दिवस राहिल्याने प्रचाराला गती आली आहे. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात अनेक छुप्या घडामोडी घडू शकतात. अशावेळी दंगाधोपा केल्यास उमेदवारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना दिले आहेत. कोल्हापूर दक्षिण, कागल, शाहूवाडी-पन्हाळा, करवीर, इचलकरंजी मतदारसंघांतील ७५ अतिसंवेदनशील व १५८ उपद्रवी गावांचा समावेश आहे. त्या ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू असून ते कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मतदानाच्या पूर्वसंध्येला पाच हजार सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाईल. दंगल काबू, राज्य राखीव, केंद्रीय दल, रेल्वे पोलीस यांच्यासह ओडिसा, कर्नाटक, गोव्यातील १० विशेष पथके दोन दिवसांत बंदोबस्तासाठी दाखल होणार आहेत. कोल्हापूर दक्षिण, कागल परिसरात पोलिसांचे विशेष लक्ष असून दिवसरात्र गस्त सुरू आहे. एखादा अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून जिल्ह्यात येत्या चार दिवसांत कडक नाकाबंदीसह ‘कोम्बिंग आॅपरेशन’ करण्याचे आदेश दिले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.मोबाईल बंदीजिल्ह्यात तीन हजार ३२१ मदान केंद्रांमध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांतर्फे मतदान केंद्राच्या परिसराची पाहणी केली जाणार आहे. मतदान केंद्रासह परिसरात मोबाईलचा वापर केल्यास तो जप्त करून गुन्हा दाखल केला जाणार आहे.हालचालींवर लक्षमतदानाच्या अखेरच्या टप्प्यात फोडाफोडीचे राजकारण होत असते. अशावेळी पैशांची देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामध्ये बहुतांश उमेदवार गुंडांचा वापर करत असतात. त्यामुळे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह शहरासह, उपनगर, गावागावांतील राजकीय पुढाऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.-------------------------एकनाथ पाटील

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाPoliceपोलिस