शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यातील वाहने दरीत गायब :आंबाघाट परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 21:51 IST

गुन्हेगारी प्रकारांवर पोलिसांचा अंकुशया भागात आवश्यक आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी रत्नागिरी हद्दीत आंबाघाटात असाच खून करून टाकलेला मृतदेह सडलेला अवस्थेत आढळला. तीन वर्षांपूर्वी त्याच परिसरात गायमुखाजवळ एक अर्भक करवंदाच्या जाळीत दरीत टाकले होते. वजरे खिंडीतही खून केल्याची तीन वर्षांपूर्वीची घटना आहे.

ठळक मुद्देशाहूवाडीत गुन्हेगारीचे हॉटस्पॉट -- पोलिसांचा अंकुश हवा, फिरत्या गस्त पथकाची गरज

आर. एस. लाड ।आंबा : कोल्हापूर-रत्नागिरी सीमेवरील आंबाघाट परिसरात वाहने पेटवून देणारे प्रकार नवीन नाहीत. गुन्ह्यात वापरणारी वाहने दरीत सोडणे, पेटवून देणे या घटना अधूनमधून घडताना दिसतात. वाहन पेटवून दिले की, ते तेथेच सडते. त्याची चौकशी करावी, असे यंत्रणेला वाटत नाही. वनभोजनातील चुली विझविण्याची जाणीव नसलेली वृत्ती जंगलाना व डोंगरांना आगी लावून जाते. या घटनांकडे बघत राहणारी उदासिनता येथील जैवविविधता व ऐतिहासिक वारसा यांच्या अस्तित्वाला गालबोट लावणारी ठरत आहे.

गुन्हेगारी प्रकारांवर पोलिसांचा अंकुशया भागात आवश्यक आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी रत्नागिरी हद्दीत आंबाघाटात असाच खून करून टाकलेला मृतदेह सडलेला अवस्थेत आढळला. तीन वर्षांपूर्वी त्याच परिसरात गायमुखाजवळ एक अर्भक करवंदाच्या जाळीत दरीत टाकले होते. वजरे खिंडीतही खून केल्याची तीन वर्षांपूर्वीची घटना आहे. पाच वर्षांपूर्वी चक्रीवळणावर पेट्रोल अंगावर टाकून मृतदेहाचा कोळसा केला होता. घाटात घडणाऱ्या बहुतेक घटना सांगली, कोल्हापूर व सीमाभागातील आहेत. खून करून कोकण हद्दीतील दरीत टाकले की, पंधरा दिवसांत जंगली प्राणी त्याची विल्हेवाट लावत असल्याने पुराव्याअभावी गुन्हेगारी घटनांवर पडदा पडताना दिसतो. आंबाघाटात वाहने लुटली जात होती, तेव्हा गायमुख येथे गस्तपथक तीन वर्षे होते. तेव्हा दरोडे थांबले. आता विशाळगड फाटा व घाटाचे प्रवेशद्वार येथे गस्त घालणारी पथके जरी उभारली, तरी यावर नियंत्रण येईल.

विशाळगडावरील पोलीस औट ठाणे उरूस, अन् महाशिवरात्रीला उघडते. घाट व कोकण यांना जोडणारा आंबा व अनुस्कुरा घाटांत रत्नागिरी विभागाचे पोलीस पथक कार्यरत आहे; पण शाहूवाडी पोलिसांची ठाण्यातून देखरेख राहते. आंबा येथील पोलीस औट ठाणे गेल्या तीन दशकांपासून बंद आहे. ही इमारत कोलमडली आहे. वाढते पर्यटन, नाणीज मठातील वाढलेला भाविक वर्ग, वर्षा पर्यटनाची वाढती क्रेज पाहता या दुर्गम भागात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त व पोलीस मित्र व्यवस्थेची साखळी उभारण्याची गरज आहे. उरूस, सुट्टी, उत्सव या काळात फिरत्या गस्थ पथकाची गरज आहे.

धोकादायक धबधबा स्थळ

  • आठ वर्षांपूर्वी गडाच्या पायथ्याजवळ असलेला धबधबा पॉर्इंट येथे मद्य सेवन केलेल्या तरुणांनी थेट वाहन दरीलगत नेले. गवतावरून गाडी न वळल्याने सुमो थेट दीड हजार फूट दरीत कोसळून दहाजण जागीच ठार झाले होते. आज तेच ठिकाण तारेने बंदिस्त करून तेथे मनोरा उभारून वनविभागाने सुरक्षित निर्सग पÞॉर्इंट उभारला आहे. अशी रस्त्यालगत दरी, जलसाठे व नदीपात्रे धोकादायक अवस्थेत आहेत; पण तेथे मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होत नाही, याचे आश्चर्य वाटते.

कोकण व घाट यावर नियंत्रण ठेवण्यास ब्रिटिश काळात आंब्याच्या सड्यावर पोलीस ठाणी होती; पण आज तेच ठाणे मोडकळीस आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस