शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

बंदी असताना मिरवणूक काढली म्हणून नंदकुमार वळंजूसह १०० जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका काढू नयेत, अशा सक्त सूचना दिल्या असताना सुध्दा मिरवणूक काढून सामाजिक अंतर राखण्याच्या ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका काढू नयेत, अशा सक्त सूचना दिल्या असताना सुध्दा मिरवणूक काढून सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांची पायमल्ली केली, म्हणून येथील शिवाजी चौक तरुण मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह १०० व्यक्तींवर शुक्रवारी सायंकाळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवाजी चौक तरुण मंडळ व करवीर गर्जना ढाेल पथकातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

शुक्रवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाने काही नियम घालून दिले आहेत. गणेश आगमन मिरवणूक तसेच विसर्जन मिरवणूक काढू नये, अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तरीही शिवाजी चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत पापाची तिकटी, माळकर चौक ते शिवाजी चौक अशी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत करवीर गर्जना ढोल पथक होते. प्रशासनाच्या आदेशाचा भंग करून सामाजिक अंतर न पाळल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू, सुहास भेंडे, दीपक गाडवे, नंदकिशोर जमदाडे, महंमद पठाण, पंडितराव पोवार, प्रमोद सुतार, नितीन पाटील, तसेच करवीर गर्जना ढोल पथकातील प्रतीक ओतारी, अक्षय पाटील, आकाश चव्हाण, विवेक माळी यांच्यासह सुमारे १०० ते १२५ लोकांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार मुरलीधर रेडेकर यांनी फिर्याद दिली असून या सर्वांविरुध्द भादंविस कलम ३४० - २०२१, १८८, २६९ व ३४ सह साथरोग, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.