शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

‘हृदयस्पर्शी’ साहित्याची निर्मिती व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 01:00 IST

कोल्हापूर : मन हे हृदयाच्या स्थानी असते. त्यामुळे साहित्य हे हृदयस्पर्शी असले पाहिजे. अशा चांगल्या साहित्यातून समाजाची उन्नती घडते, असे प्रतिपादन करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांनी रविवारी केले.कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्या विद्यमाने आयोजित विभागीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख ...

कोल्हापूर : मन हे हृदयाच्या स्थानी असते. त्यामुळे साहित्य हे हृदयस्पर्शी असले पाहिजे. अशा चांगल्या साहित्यातून समाजाची उन्नती घडते, असे प्रतिपादन करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांनी रविवारी केले.कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्या विद्यमाने आयोजित विभागीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मनस्विनी प्रभूणे, डॉ. रमेश जाधव, संजीवनी तोफखाने उपस्थित होत्या.शंकराचार्य म्हणाले, केवल साहित्य अजरामर होऊन चालत नाही तर साहित्यिकही अजरामर झाला पाहिजे साहित्यात सर्व रस असतात पण ते कोणत्या अर्थाने वापरायचे हे प्रत्येकावर अवलंबून असते. संकेताप्रमाणे ‘शब्द’ वापरले तर ते अर्थासह प्रभावी ठरतात. आजच्या साहित्यात ज्ञानोपासक दिसत नाहीत. ज्ञान आत्मसात करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे.डॉ. ल. रा. नसिराबादकर म्हणाले, या साहित्य संमेलनातून साहित्यप्रेमी व रसिकांचा सुंदर मेळ साधला आहे. संमेलनातून आपल्याला साहित्यांचे विविध पैलू उलगडता येतात.दरम्यान, साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात डॉ. आशुतोष देशपांडे यांनी सुनील पाटील यांची मुलाखत घेतली. दुसºया सत्रात झालेल्या परिसंवादात ‘सामाजिक जीवनात ग्रंथालयांचे स्थान’ या विषयावर डॉ. एस. इनामदार यांनी ग्रंथालयांच्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. प्रकाश कल्लोळी मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी पालकांनी सजग राहायला हवे. ई-ग्रंथालय ही नवीन संकल्पना आत्मसात केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तिसºया सत्रात परिसरातील साहित्यिक व साहित्य संस्था या विषयावर झालेल्या परिसंवादास भारत सरकारच्या भटक्या विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते उपस्थित होते. यावेळी डॉ. पी. जी. कुलकर्णी, प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी ‘साहित्य परंपरा’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी रजनी हिरळीकर होत्या. चौथ्या सत्रात झालेल्या कवी संमेलनात सुखदा कु लकर्णी, किरण चव्हाण, जगदीश पाटील, डॉ. दिनेश फडणीस, गुरुनाथ हिर्लेकर, सुरेखा वाडकर, इशा इनामदार, मृदुला बापट, दीपाली चव्हाण, किरण चव्हाण यांनी काव्य सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी मीरा सहस्त्रबुद्धे होत्या. दीपक गाडवे यांनी प्रास्ताविक केले. आशुतोष देशपांडे यांनी परिचय करून दिला. श्रीकृष्ण साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.