शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘हृदयस्पर्शी’ साहित्याची निर्मिती व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 01:00 IST

कोल्हापूर : मन हे हृदयाच्या स्थानी असते. त्यामुळे साहित्य हे हृदयस्पर्शी असले पाहिजे. अशा चांगल्या साहित्यातून समाजाची उन्नती घडते, असे प्रतिपादन करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांनी रविवारी केले.कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्या विद्यमाने आयोजित विभागीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख ...

कोल्हापूर : मन हे हृदयाच्या स्थानी असते. त्यामुळे साहित्य हे हृदयस्पर्शी असले पाहिजे. अशा चांगल्या साहित्यातून समाजाची उन्नती घडते, असे प्रतिपादन करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांनी रविवारी केले.कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्या विद्यमाने आयोजित विभागीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मनस्विनी प्रभूणे, डॉ. रमेश जाधव, संजीवनी तोफखाने उपस्थित होत्या.शंकराचार्य म्हणाले, केवल साहित्य अजरामर होऊन चालत नाही तर साहित्यिकही अजरामर झाला पाहिजे साहित्यात सर्व रस असतात पण ते कोणत्या अर्थाने वापरायचे हे प्रत्येकावर अवलंबून असते. संकेताप्रमाणे ‘शब्द’ वापरले तर ते अर्थासह प्रभावी ठरतात. आजच्या साहित्यात ज्ञानोपासक दिसत नाहीत. ज्ञान आत्मसात करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे.डॉ. ल. रा. नसिराबादकर म्हणाले, या साहित्य संमेलनातून साहित्यप्रेमी व रसिकांचा सुंदर मेळ साधला आहे. संमेलनातून आपल्याला साहित्यांचे विविध पैलू उलगडता येतात.दरम्यान, साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात डॉ. आशुतोष देशपांडे यांनी सुनील पाटील यांची मुलाखत घेतली. दुसºया सत्रात झालेल्या परिसंवादात ‘सामाजिक जीवनात ग्रंथालयांचे स्थान’ या विषयावर डॉ. एस. इनामदार यांनी ग्रंथालयांच्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. प्रकाश कल्लोळी मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी पालकांनी सजग राहायला हवे. ई-ग्रंथालय ही नवीन संकल्पना आत्मसात केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तिसºया सत्रात परिसरातील साहित्यिक व साहित्य संस्था या विषयावर झालेल्या परिसंवादास भारत सरकारच्या भटक्या विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते उपस्थित होते. यावेळी डॉ. पी. जी. कुलकर्णी, प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी ‘साहित्य परंपरा’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी रजनी हिरळीकर होत्या. चौथ्या सत्रात झालेल्या कवी संमेलनात सुखदा कु लकर्णी, किरण चव्हाण, जगदीश पाटील, डॉ. दिनेश फडणीस, गुरुनाथ हिर्लेकर, सुरेखा वाडकर, इशा इनामदार, मृदुला बापट, दीपाली चव्हाण, किरण चव्हाण यांनी काव्य सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी मीरा सहस्त्रबुद्धे होत्या. दीपक गाडवे यांनी प्रास्ताविक केले. आशुतोष देशपांडे यांनी परिचय करून दिला. श्रीकृष्ण साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.