शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

गुंठेवारी प्रकरणाचे नियमितीकरण करण्याचे आदेश न्यायालयामार्फत द्यावेत

By admin | Updated: August 23, 2014 00:08 IST

अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांची माहिती : उच्च न्यायालयात याचिका दाखल

इचलकरंजी : परिसरातील ग्रामीण भागात गुंठेवारी प्रकरणाचे नियमितीकरण करण्यासाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे मुदतवाढ देऊन त्याप्रमाणे प्रस्ताव स्वीकारून अशा स्वरूपाची बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणे नियमित करण्याचे आदेश राज्य शासनाला द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. खोतवाडी व कोरोची येथील ग्रामस्थ अशोक सोळसे, कमल खांडेकर, उमेश खांडेकर व इतर तीन लोकांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.परिसरातील ग्रामीण भागात अनेक नागरिक शेतजमिनीचे बेकायदेशीरपणे तुकडे पाडून त्यावर घरे बांधून राहत आहेत. मात्र, शासनदरबारी असा वापर बेकायदेशीर मानला जातो. त्यामुळे २००१ मध्ये अशी गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्यासाठी गुंठेवारी विकास कायदा २००१ राज्य शासनाने अमलात आणला आणि त्यामधील तरतुदीप्रमाणे १ जानेवारी २००१ आधीची गुंठेवारी झालेली प्रकरणे सहा महिन्यांच्या आत संबंधित विभागाकडे अर्ज करून नियमित केली जाणार होती; परंतु या परिसरात या कायद्याची प्रसिद्धी योग्य प्रमाणात झाली नसल्यामुळे सुमारे तीन ते चार हजार प्रकरणे नियमित होऊ शकली नाहीत.म्हणून गुंठेवारी कायद्याप्रमाणे मुदतवाढ देऊन ही प्रकरणे नियमित करून घ्यावीत, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुदतवाढ देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांना नियोजन प्राधिकरण म्हणून आहेत; पण संबंधित अधिकारी प्रस्ताव स्वीकारण्याचे नाकारत आहेत. त्यामुळे गुंठेवारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे मुदतवाढ देऊन प्रस्ताव स्वीकारावेत, असे आदेश राज्य शासन, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे. या याचिकेवर न्यायाधीश अभय ओक व न्यायाधीश गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)