शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

आत्महत्येपासून परावृत्त करण्यात राज्यातील समुपदेशक यशस्वी, ‘टोल फ्री’वर सर्वाधिक समुपदेशन कोल्हापुरातून 

By संदीप आडनाईक | Updated: September 25, 2024 16:50 IST

मानसिक तणावावर सकारात्मक उपाय

संदीप आडनाईक कोल्हापूर : असंख्य कारणांमुळे मानसिक तणावाखाली असणारे टेली मानसचा टोल फ्री क्रमांक फिरवितात. आकडेवारीनुसार राज्यात सर्वाधिक म्हणजे ६१११ फोन कॉल्सवर कोल्हापूर केंद्राने समुपदेशन केले आहे. कौतुकाची बाब म्हणजे या सर्व कॉल्सला योग्य उत्तरे देऊन त्या व्यक्तींना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे श्रेय त्या त्या जिल्ह्यातील समुपदेशकांनी मिळवलेले आहे. २४ सप्टेंबर रोजी ऑगस्ट अखेर घेतलेल्या आढावा बैठकीत हा सकारात्मक उपाय यशस्वी ठरल्याचे समोर आले आहे.

कर्ज, ताणतणाव, परीक्षेत अपयश, व्यसन, विसराळूपणा, वेडेपणा, चिंता, भीती, वर्तमानातील बदल, वारंवार विचार, संशय येणे, घाबरणे, आत्महत्येचा विचार, उन्माद, लैंगिक समस्या, भास होणे, उदासीनपणा, डोकेदुखी, मतिमंदत्व, स्किझोफ्रेनिया, अंगात येणे, निद्रानाश, अतिनैराश्य, बालवयातील मानसिक समस्या अशा अनेक समस्यांमुळे त्रस्त असलेले लोक या १४४१६ टेली मानस टोल फ्री नंबरवर फोन करतात.

त्यांचे समुपदेशन करण्यात पहिल्या पाच क्रमांकात कोल्हापूर आघाडीवर आहे. पुणे, सांगली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा त्यापाठोपाठ समावेश आहे. रायगड, मुंबई उपनगर, नंदुरबार, पालघर आणि यवतमाळ हे जिल्हे सर्वात शेवटी आहेत.

टेली मानसवर समुपदेशनकोल्हापूर : ६१११, पुणे : ४९२३, सांगली : ४६३९, मुंबई : ३६५२, छत्रपती संभाजीनगर : २६८०, बीड :२३३६, नाशिक : १८०३, धाराशिव : १७७७, नागपूर : १७२३, जळगाव : १४१३, सातारा : १३४५, जालना : १२९३, अहमदनगर : १२५६, अकोला : १२३०, बुलढाणा : १०६४, ठाणे : १०१६, वाशिम : १००१, चंद्रपूर : ९७५, रत्नागिरी : ९५६, नांदेड : ९१५, अमरावती : ८४०, लातूर : ८१८, हिंगोली : ७६३, धुळे : ७४०, सोलापूर : ७३०, सिंधुदुर्ग : ६००, गोंदिया : ५७४, वर्धा : ५६८, परभणी ५६२, गडचिरोली : ५४१, यवतमाळ ५३८, पालघर : ५१७, नंदुरबार : ५०८, मुंबई उपनगर : ३९९, रायगड : ३८९

केंद्र सरकारने १९८२ मध्ये टेली मानस केंद्राद्वारे समुपदेशनाचा हा कार्यक्रम सुरु केला. आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धडपडणाऱ्या समुपदेशकांची सकारात्मक बाजू यामुळे पुढे आली आहे. -डॉ. अर्पणा कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ, सेवा रुग्णालय.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र