शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

आत्महत्येपासून परावृत्त करण्यात राज्यातील समुपदेशक यशस्वी, ‘टोल फ्री’वर सर्वाधिक समुपदेशन कोल्हापुरातून 

By संदीप आडनाईक | Updated: September 25, 2024 16:50 IST

मानसिक तणावावर सकारात्मक उपाय

संदीप आडनाईक कोल्हापूर : असंख्य कारणांमुळे मानसिक तणावाखाली असणारे टेली मानसचा टोल फ्री क्रमांक फिरवितात. आकडेवारीनुसार राज्यात सर्वाधिक म्हणजे ६१११ फोन कॉल्सवर कोल्हापूर केंद्राने समुपदेशन केले आहे. कौतुकाची बाब म्हणजे या सर्व कॉल्सला योग्य उत्तरे देऊन त्या व्यक्तींना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे श्रेय त्या त्या जिल्ह्यातील समुपदेशकांनी मिळवलेले आहे. २४ सप्टेंबर रोजी ऑगस्ट अखेर घेतलेल्या आढावा बैठकीत हा सकारात्मक उपाय यशस्वी ठरल्याचे समोर आले आहे.

कर्ज, ताणतणाव, परीक्षेत अपयश, व्यसन, विसराळूपणा, वेडेपणा, चिंता, भीती, वर्तमानातील बदल, वारंवार विचार, संशय येणे, घाबरणे, आत्महत्येचा विचार, उन्माद, लैंगिक समस्या, भास होणे, उदासीनपणा, डोकेदुखी, मतिमंदत्व, स्किझोफ्रेनिया, अंगात येणे, निद्रानाश, अतिनैराश्य, बालवयातील मानसिक समस्या अशा अनेक समस्यांमुळे त्रस्त असलेले लोक या १४४१६ टेली मानस टोल फ्री नंबरवर फोन करतात.

त्यांचे समुपदेशन करण्यात पहिल्या पाच क्रमांकात कोल्हापूर आघाडीवर आहे. पुणे, सांगली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा त्यापाठोपाठ समावेश आहे. रायगड, मुंबई उपनगर, नंदुरबार, पालघर आणि यवतमाळ हे जिल्हे सर्वात शेवटी आहेत.

टेली मानसवर समुपदेशनकोल्हापूर : ६१११, पुणे : ४९२३, सांगली : ४६३९, मुंबई : ३६५२, छत्रपती संभाजीनगर : २६८०, बीड :२३३६, नाशिक : १८०३, धाराशिव : १७७७, नागपूर : १७२३, जळगाव : १४१३, सातारा : १३४५, जालना : १२९३, अहमदनगर : १२५६, अकोला : १२३०, बुलढाणा : १०६४, ठाणे : १०१६, वाशिम : १००१, चंद्रपूर : ९७५, रत्नागिरी : ९५६, नांदेड : ९१५, अमरावती : ८४०, लातूर : ८१८, हिंगोली : ७६३, धुळे : ७४०, सोलापूर : ७३०, सिंधुदुर्ग : ६००, गोंदिया : ५७४, वर्धा : ५६८, परभणी ५६२, गडचिरोली : ५४१, यवतमाळ ५३८, पालघर : ५१७, नंदुरबार : ५०८, मुंबई उपनगर : ३९९, रायगड : ३८९

केंद्र सरकारने १९८२ मध्ये टेली मानस केंद्राद्वारे समुपदेशनाचा हा कार्यक्रम सुरु केला. आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धडपडणाऱ्या समुपदेशकांची सकारात्मक बाजू यामुळे पुढे आली आहे. -डॉ. अर्पणा कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ, सेवा रुग्णालय.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र