शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

खंडपीठासाठी कोल्हापुरात १० ऑगस्टला वकील परिषद, सहा जिल्ह्यातील वकील उपस्थित राहणार

By उद्धव गोडसे | Updated: July 16, 2024 18:28 IST

बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

कोल्हापूर : खंडपीठाच्या मागणीकडे सरकार आणि न्यायालयीन यंत्रणेचे लक्ष्य वेधण्यासाठी १० ऑगस्टला कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे वकील परिषद होईल. जिल्हा न्याय संकुलातील सभागृहात शनिवारी (दि. १६) झालेल्या जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परिषदेसाठी सहा जिल्ह्यातील सुमारे अडीच ते तीन हजार वकील उपस्थित राहणार असून, आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत यांनी दिली.

कोल्हापुरात खंडपीठ होण्याचा निर्णय सध्या मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या कोर्टात आहे. यावर तातडीने निर्णय व्हावा, यासाठी कोल्हापुरात वकील परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीच्या ६ जुलैच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार शनिवारी झालेल्या बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत याविषयी चर्चा झाली. ॲड. समीउल्ला पाटील यांनी आंदोलन तीव्र करण्यासाठी प्रसंगी आमरण उपोषण करण्याची तयारी दर्शवली.

ॲड. प्रकाश मोरे यांनी लोक न्यायालयाच्या कामांवर बहिष्कार टाकण्याचा पर्याय सूचवला. ॲड. सतीश खोतलांडे यांनी जेलभरो करून आरपारची लढाई लढण्याची गरज व्यक्त केली. ॲड. किरण पाटील, अजित मोहिते, रणजीत गावडे, राणाप्रताप सासणे, आसावरी कुलकर्णी यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवावी, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे यांनी परिषद यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

सर्वानुमते १० ऑगस्टला कोल्हापुरात वकील परिषद घेण्याचा निर्णय बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांनी जाहीर केला. तसेच सर्व माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील सहा जिल्ह्यातील बार असोसिएशनशी संपर्क साधून परिषद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी असोसिएशनचे बहुतांश माजी अध्यक्ष, पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय