शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

कार मालकांना न सोसणारा खर्चाचा झटका --महापुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:39 IST

अशा वाहनांना येणारा दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे अनेकांनी दारातील गाडीच हलविलेली नाही.

ठळक मुद्दे: दुरुस्तीचा किमान ३५ हजार ते १० लाखांपर्यंतचा खर्च; गॅरेजचालकांना मिळेना उसंत

कोल्हापूर : महापुरात दुचाकींसह चारचाकींमध्ये पाणी शिरून लाखोंचा फटका बसला. प्रत्येकाला आपले वाहन लवकर दुरुस्त करून मिळावे, याकरिता गाड्यांच्या रांगांसह चालकमालकांनी गॅरेजसमोर एकच गर्दी केली आहे. दुचाकींच्या तुलनेत कारच्या दुरुस्तीचा झटका न सोसणारा आहे.

शहरासह करवीर, आंबेवाडी, चिखली, शिरोळ, बाजारभोगाव, पन्हाळा तालुका, आदी भागांत पुराचे पाणी शिरले. संसारोपयोगी वस्तूंसह दारातील वाहनेही त्यात बुडून गेली. पुराचे पाणी गाडीच्या चाकांपर्यंत होते, तोपर्यंत अनेकांना त्याचे गांभीर्य कळले नाही. तेच पाणी चाक ओलांडून डॅशबोर्डपर्यंत गेले आणि त्यानंतर टपासह गाडी पूर्णपणे बुडाली. यात अनेकांनी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इंजिनसह इलेक्ट्रॉनिक सर्किटही जळून गेले. त्यामुळे हजारांचा खर्च लाखांत कधी गेला, हे पूरग्रस्त गाडीमालकांना कळलेच नाही.

त्यामुळेअशा चारचाकी शहरातील विविध कंपन्यांच्या वितरकांसोबत खासगी गॅरेजांच्या दारात उभ्या आहेत.यात विमा असलेल्या वाहनधारकांना कमी प्रमाणात खर्च अपेक्षित आहे;तर ज्यांच्या विमाच नाही,अशा वाहनांना येणारा दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे अनेकांनी दारातील गाडीच हलविलेली नाही.

सद्य:स्थितीत चारचाकींमध्ये अत्याधुनिक पद्धतीचे (मॅकेट्रॉनिक्स) इंजिन, वायरिंग, आदी असल्यामुळे ते सुटे भाग बदलण्याशिवाय वाहनधारकांकडे पर्यायच उरलेला नाही. प्रत्येक वाहनाच्या प्रकारानुसार खर्चाचे आकडेही वाढत आहेत. कारण एकेका सुट्या भागाची किंमत किमान ७० ते ८० हजारांच्या घरात आहे. सुट्या भागाचे दर हे कारचालकांना अशा पद्धतीने दुरूस्ती निघाल्याने परवडणारे नाही. त्यामुळे असे वाहनधारक हवालदिल झाले आहेत.बाधित झालेले सुटे भाग असेवाहनाचे कंट्रोल युनिट, आयसी सर्किट युनिट, गिअर बॉक्समधील सेन्सर युनिट सर्किट, व्हील बेअरिंग्ज, स्टेअरिंग बेअरिंग, इंजिनमधील लो प्रेशर पंप, हाय प्रेशर पंप, अल्टरनेटर, स्टार्टरसह बेअरिंग्ज, रिमोट युनिट, साउंड सिस्टीम, सेंट्रल लॉक सिस्टीम, कुशन, सीट कव्हर, पेट्रोल इंजिनमध्ये पाणी गेल्यानंतर ते खोलून पुन्हा जोडावे लागते.

डिझेल इंजेक्शन पंप, बॅटरी, स्टार्टर, मॅकेट्रॉनिक्सचे सर्किट बोर्ड असे एक ना अनेक सुटे भाग पुराच्या पाण्यात बाधित झाले आहेत.

सुटे भाग अतिशय महागवाहनाच्या प्रकारानुसार सुट्या भागाच्या किमती असल्याने एकेका भागाची किंमत ७० ते ८० हजार रुपये आहे. अनेक वाहनांमध्ये या भागांची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे तो भाग बदलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. प्रत्येक गॅरेजसमोर अशी कित्येक वाहने उभी आहेत.त्यांची दुरुस्ती करायची की नाही अशा संभ्रमावस्थेत वाहनधारक आहेत. त्यामुळे पूरबाधित क्षेत्रात जनजीवन पूर्वपदावर येऊनही अशी वाहने घराच्या दारात अजूनही उभी आहेत. 

कमीत कमी खर्चात अशी पूरबाधित वाहने दुरुस्त करून देण्याचा प्रयत्न शहरातील मेकॅनिक बंधू करीत आहेत. अशा वाहनांकरिता गॅरेजचालक रात्री उशिरापर्यंत काम करीत आहेत. काही भाग दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे ते बदलण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे खर्च वाढत आहे.- सुधीर महाजन, समन्वयक,कोल्हापूर जिल्हा फोर व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरcarकार